शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
2
ईशनंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटंबाचा धक्कादायक खुलासा
3
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
4
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
5
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
6
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
7
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
8
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
9
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
10
पंचक २०२५: सावधान! २४ ते २९ डिसेंबर दरम्यान 'पंचक' काळ; 'या' ७ राशींनी राहावे अधिक सतर्क!
11
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
12
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
13
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
14
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
15
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
16
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
17
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
18
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
19
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
20
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

गोड्या पाण्यातील मासेमारी संकटात

By admin | Updated: January 2, 2016 23:54 IST

गेल्यावर्षी अनियमीत आणि सरासरी पेक्षा कमी पाऊस झाल्याने जलाशयातील जलसाठा कमी होत असून बोर्डी परिसरातील गोड्या पाण्यातील मासेमारी व्यवसाय संकटात सापडला आहे.

- अनिरुद्ध पाटील,  बोर्डीगेल्यावर्षी अनियमीत आणि सरासरी पेक्षा कमी पाऊस झाल्याने जलाशयातील जलसाठा कमी होत असून बोर्डी परिसरातील गोड्या पाण्यातील मासेमारी व्यवसाय संकटात सापडला आहे. दरम्यान स्थानिक मच्छीमार आणि या व्यवसायाशी संबंधीत स्थानिक आदिवासी मजुरांना विस्थापीत होण्याची वेळ ओढवली आहे. त्यातच भर म्हणून की काय सार्वजनिक जलस्त्रोतावर अतिक्रमण करून बांधकाम करण्याचे प्रकार वाढत आहेत.महाराष्ट्र गुजरात सीमेलगत पालघर जिल्ह्याच्या तलासरी तालुक्यातील झाई हे गाव राज्यातील प्रमुख मासेमारी केंद्र म्हणून ओळखले जाते. येथे सागरी आणि गोड्या पाण्यातील मासेमारी केली जाते. झाई ग्रामपंचायतीचे गावात तीन तलाव आहेत. ग्रामपंचायतीकडून प्रतिवर्षी तलावाचा लिलाव करून कंत्राटी पद्धतीने मत्स्यबील टाकून त्याचे संगोपन करून मासेमारी केली जाते. त्यापैकी मोठा तलावाचे एकूण क्षेत्रफळ २५ एकर असून रोहू, कटला, ग्रीगल, सिल्व्हर, ब्रिगेड, ग्रास्कोप, नंदी व कोलंबी इ. माशांचे उत्पादन घेतले जाते. बोर्डी आणि परिसरातील गावे गोड्या पाण्यातील मासेमारीकरीता प्रसिद्ध असून प्रतिवर्षी तलावाच्या लिलावामुळे ग्रामपंचायतींच्या उत्पन्नात वाढ होते. गतवर्षी राज्यात सरासरी पेक्षा कमी पर्जन्यमान झाले त्यामुळे जलस्त्रोतांमध्ये पुरेसा जलसाठा उपलब्ध नाही. त्याचा थेट परिणाम गोड्या पाण्याच्या मासेमारीवर दिसून येत आहे.आजच्या घडीला झाईतील मोठा तलाव निम्यापेक्षा अधिक सुकला आहे. इतकी भयानकता अनेक वर्षात पाहिली नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. तलावाच्या मध्यभाग कोरडा पडलेले. त्या जागेवर क्रिकेटचे सामने आयोजित केले जात आहेत. यावरून दुष्काळाचे गांभीर्य लक्षात येते. यावर्षी मासेमारी व्यवसाय पुर्णत: वाया गेला असून व्यवसायीक संकटात सापडला आहे. या व्यवसायाशी संबंधीत रोजंदारी करणाऱ्या अनेक आदिवासी कुटूंबावर बेरोजगारी ओढवून विस्थापित होण्याची स्थिती निर्माण झाली आहे. सागरी मच्छीमारांमध्ये खोल समुद्रात संघर्ष पेरण्याच्या उदासीनता इ. मुळे मच्छीमारीचा व्यवसाय संकटात सापडला आहे. गोड्या पाण्यातील मासेमारी त्यावर पर्यायी मार्ग आहे. परंतु बोर्डी परिसरातील गावांमधील तलावांच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. संबंधीत ग्रामपंचायत आणि महसूल विभागाच्या दुर्लक्षतेमुळे तलाव क्षेत्रात घट होऊन पाणी साठ्यावर परिणाम होतो. सार्वजनिक जलस्त्रोत अतिक्रमण मुक्त ठेवण्याबाबत उच्च न्यायालयाने बनविलेल्या कायदा मात्र प्रशासनाकडूनच पायदळी तुडवला जात आहे. याबाबत ठोस पाऊल उचलण्याची मागणी नागरीकांनी केली आहे. (वार्ताहर)