शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर अन् युद्धविराम...राहुल गांधींची PM मोदींना पत्राद्वारे मोठी मागणी
2
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
3
Chandrapur Tiger Attack: चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात ३ महिलांचा मृत्यू, गावकऱ्यांमध्ये घबराट
4
पर्सनल लोन फेडलं नाही तर बँक काय कारवाई करते? कर्ज घेताना काय काळजी घ्यावी?
5
हृदयद्रावक! पत्नी आणि २ महिन्यांच्या मुलाला मारुन पतीने संपवलं जीवन; मेसेजमध्ये मांडली व्यथा
6
Murali Naik : "शहीद झालो तर पार्थिव तिरंग्यात..."; मुरली नाईक यांच्या वडिलांनी सांगितली लेकाची शेवटची इच्छा
7
भारतानं पाकिस्तानात घुसून मारलं, लष्कराचा दरारा रावळपिंडीपर्यंत पोहोचला; ऑपरेशन सिंदूरवर राजनाथ सिंह स्पष्टच बोलले 
8
SIP मध्ये गुंतवणूक करताना बहुतेक गुंतवणूकदार 'या' चुका करतात; थेट परताव्यावर होतो परिणाम
9
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
10
नाशिकला अवकाळी पावसाने झोडपले; शहरात तासभर गडगडाट अन् कडकडाट
11
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
12
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
13
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
14
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
15
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
16
'मदर्स डे'निमित्त मराठी कलाकारांनी व्यक्त केलं आईवरचं प्रेम, शेअर केले खास फोटो
17
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
18
मेळघाटातील ‘त्या’ आरएफओंची राज्य महिला आयोगाकडे धाव, ‘त्या’ अधिकाऱ्याला अभय
19
'युद्धविरामचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
20
फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक

पालघरमध्ये तीन घटनांत चौघांचा बुडून मृत्यू; परिसरात हळहळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2020 02:00 IST

पालघर जिल्ह्यात विविध तीन घटनांत चौघा जणांचा बुडून मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

 बोईसर/तलासरी : पालघर जिल्ह्यात विविध तीन घटनांत चौघा जणांचा बुडून मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.बोईसर पूर्वेकडील सूर्या नदीत रविवारी बुडालेल्या सुनील संखे (४०) या युवकाचा मृतदेह सोमवारी सापडला असून या घटनेची नोंद बोईसर पोलिसांत करण्यात आली आहे. मूळचा तारापूर एमआयडीसी जवळच्या एकलारे गावचा व सध्या केपी नगर येथे वास्तव्यास असलेला सुनील संखे बोईसर येथून मित्रासोबत रविवारी बोईसर चिल्हार रस्त्यावरील गुंदले येथील सूर्या नदी बंधाऱ्यावर गेला होता. त्याचा पाय घसरून पाण्यात पडल्याचे त्याच्यासोबत असलेल्या मित्रांनी पोलिसांना सांगितले असून अधिक तपास बोईसर पोलीस करीत आहेत. तलासरी तालुक्यातील गिरगाव-डोल्हारपाडा येथील ३५ वर्षीय आदिवासी तरुण संतोष माह्या वांगड हा सोमवारी दुपारी जवळच्या झरी खाडी नदीवर गेला असताना नदीत पडून त्याचा मृत्यू झाला. गेले दोन दिवस जोरदार पाऊस पडत असल्याने नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत. त्यामुळे पाण्याचा अंदाज न आल्याने संजय नदीच्या पाण्यात बुडाला. त्यास गावकऱ्यांनी बाहेर काढून तलासरी ग्रामीण रुग्णालयात आणले, पण त्याचा मृत्यू झाला होता.वाचवायला गेला अन् स्वत:ही बुडालानालासोपारा : पूर्वेकडील तलावात दोघांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी रविवारी संध्याकाळी वालीव पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. नालासोपारा पूर्वेकडील वाकणपाडा परिसरातील रेणुकानगरमध्ये राहणारा साहिल मोहम्मद खान (१४) हा त्याच परिसरातील तलावात अंघोळीसाठी शनिवारी दुपारी गेला होता. मात्र साहिलला पोहता येत नसल्याने तो बुडू लागला. या वेळी त्याला वाचवण्यासाठी गेलेला शोएब सलीम शेख (१९) हाही पाण्यात बुडून मृत्यू पावला. या घटनेची माहिती साहिलच्या वडिलांनी वालीस पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी दोघांचे मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवले आहेत. 

टॅग्स :drowningपाण्यात बुडणेpalgharपालघर