शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

चार कंपन्या केल्या बंद, ऑन लाइन मॉनेटरिंग न बसवल्याने कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 05:30 IST

तारापुर एमआयडीसीतील चार कंपन्या बंद करण्याचे आदेश केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला दिला असून त्याने त्यांचा वीज पुरवठा खंडित करण्याचे पत्र महावितरणच्या अधिक्षक अभियंत्यांना दिले आहे.

पंकज राऊत बोईसर : तारापुर एमआयडीसीतील चार कंपन्या बंद करण्याचे आदेश केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला दिला असून त्याने त्यांचा वीज पुरवठा खंडित करण्याचे पत्र महावितरणच्या अधिक्षक अभियंत्यांना दिले आहे.कारवाई करण्यात आलेल्यांमध्ये केमको डायस्टफ, अभिलाषा टेक्स केम प्रा. ली., अमरज्योत केमिकल कॉर्पोरेशन, श्री विनायक इंडस्ट्रीज हे चार उद्योग असून हे अती प्रदूषण करणाºया उद्योगाच्या यादीतील आहेत कुठल्या प्रतिचे रासायनिक प्रदूषित सांडपाणी सामुदायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्राकडे (सी ई टी पी) पाठविण्यात येते, हे कळून यावे यासाठी अशा उद्योगांनी आॅनलाईन मॉनेटरिंग सिस्टीम बसविणे सक्तीचे असतांनाही या उद्योगांनी ती न बसविल्याने ही करवाई करण्यात आली आहे. यामुळे बाकीच्या प्रदूषणकारी उद्योगांचे धाबे दणाणले असून अशीच कारवाई आणखी काही कंपन्यांवर होण्याची शक्यता आहे.मंडळाला भीती सुनावणीचीमहाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाळाने मागील ८ महिन्यांत ६४ उद्योगावर करवाई केली असून तारापूर एमआयडीसीतील उद्योगातून व सामुदायिक केंद्रातून (सी ई टी पी) प्रक्रिया न करताच प्रचंड प्रमाणात रासायनिक प्रदूषित सांडपाणी सरळ नवापूरच्या समुद्रात आणि नाल्यामध्ये सोडले जाते आहे.त्यामुळे पर्यावरणाची हानी होत असून त्याचे अनेक परिणाम किनारपट्टी भागातील मच्छीमार व शेतजमीनीवर होत असल्याची याचिका अखिल भारतीय मांगेला समाज परिषदेने पुण्याच्या राष्ट्रीय हरित लवादा कडे दाखल केल्या नंतर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने डिसेंबर २०१६ पासून विशेष मोहीम हाती घेतली आहे.११ सप्टेंबरला राष्ट्रीय हरित लावादाकडे या संदर्भात सुनावणी असल्याने तिच्या भीतीने अजून काही उद्योगांवर करवाई होण्याची शक्यता असून त्या त्याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.