शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

वनात लावल्या जातात आगी, स्थानिकांचा आरोप; वाडा तालुक्यात वाढते प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 02:27 IST

जंगलांना लागलेल्या आगीमध्ये संपूर्ण जंगल होरपळून नव्याने लागवड केलेली वनसंपदा जळून खाक होते.

वसंत भोईर

वाडा : तालुक्याला २४ हजार हेक्टर क्षेत्र असलेले जंगल लाभलेले आहे. या जंगलाची राखण होण्यासाठी वाडा तालुक्यात वाडा पूर्व, वाडा पश्चिम व कंचाड असे तीन स्वतंत्र विभाग केलेले आहेत, तसेच वनविकास महामंडळ, वन्यजीव, अभयारण्य या विभागासाठी वर्ग-२च्या पाच अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करून शंभरहून अधिक कर्मचारीवर्ग नेमण्यात आलेला आहे, तसेच रोजंदारीवर काम करणारे शेकडो मजूर या कर्मचाऱ्यांच्या दिमतीला आहेत. तरीही दरवर्षी पौष महिना संपला की, माघ महिन्यात येथील जंगलांना आगी लागण्याचे प्रकार सुरू होतात. या आगी लागत नाहीत, तर लावल्या जातात, असा आरोप केला जात आहे.

जंगलांना लागलेल्या आगीमध्ये संपूर्ण जंगल होरपळून नव्याने लागवड केलेली वनसंपदा जळून खाक होते. येथील जंगलांना लागल्या जाणाऱ्या आगी या मानवनिर्मित असतानाही आजपर्यंत याबाबत एकही गुन्हा दाखल झालेला नाही. वाडा तालुक्याला लाभलेल्या वनसंपदेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पाऊलखुणा दर्शविणारा ऐतिहासिक कोहोज किल्ल्याचा समावेश आहे. २०० हेक्टरहून अधिक क्षेत्र असलेल्या या कोहोज किल्ला परिसरात लाखोंच्या संख्येने विविध प्रजातींमधील वनसंपत्ती आहे. मोठ्या प्रमाणावर वन औषधी झाडेही आहेत. मात्र, दरवर्षी येथील जंगलाला आग लागते व या आगीत हजारो नव्याने लागवड केलेली, तसेच वन औषधी वनसंपदा जळून खाक होते.येथील जंगलाची राखण करण्यासाठी वनविभागाने महाराष्ट्र वनविकास महामंडळ यांच्यावर जबाबदारी दिली आहे.वनविकास महामंडळाच्या वन अधिकाऱ्यांना या संदर्भात विचारणा केली असता, आग लागलेले क्षेत्र आमच्या अखत्यारित येत नाही, असे बोलून जबाबदारी टाळत असतात. दरम्यान, या आगी आटोक्यात आणण्यापूर्वीच या जंगलातील निम्म्याहून अधिक वनसंपदा होरपळून गेलेली असते. आग विझविण्यासाठी वन विभागाकडे अपुरे मनुष्यबळ, अपुऱ्या साधनसामुग्रीमुळे या आगी आटोक्यात येत नाहीत. आजवर आगी लावणाऱ्यांविरोधात वनविभागाने कारवाई केलेली दिसून येत नाही. 

टॅग्स :fireआग