शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
6
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
7
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
8
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
9
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
10
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
11
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
12
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
13
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
14
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
15
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
16
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
17
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
18
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
19
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
20
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव

वनात लावल्या जातात आगी, स्थानिकांचा आरोप; वाडा तालुक्यात वाढते प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 02:27 IST

जंगलांना लागलेल्या आगीमध्ये संपूर्ण जंगल होरपळून नव्याने लागवड केलेली वनसंपदा जळून खाक होते.

वसंत भोईर

वाडा : तालुक्याला २४ हजार हेक्टर क्षेत्र असलेले जंगल लाभलेले आहे. या जंगलाची राखण होण्यासाठी वाडा तालुक्यात वाडा पूर्व, वाडा पश्चिम व कंचाड असे तीन स्वतंत्र विभाग केलेले आहेत, तसेच वनविकास महामंडळ, वन्यजीव, अभयारण्य या विभागासाठी वर्ग-२च्या पाच अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करून शंभरहून अधिक कर्मचारीवर्ग नेमण्यात आलेला आहे, तसेच रोजंदारीवर काम करणारे शेकडो मजूर या कर्मचाऱ्यांच्या दिमतीला आहेत. तरीही दरवर्षी पौष महिना संपला की, माघ महिन्यात येथील जंगलांना आगी लागण्याचे प्रकार सुरू होतात. या आगी लागत नाहीत, तर लावल्या जातात, असा आरोप केला जात आहे.

जंगलांना लागलेल्या आगीमध्ये संपूर्ण जंगल होरपळून नव्याने लागवड केलेली वनसंपदा जळून खाक होते. येथील जंगलांना लागल्या जाणाऱ्या आगी या मानवनिर्मित असतानाही आजपर्यंत याबाबत एकही गुन्हा दाखल झालेला नाही. वाडा तालुक्याला लाभलेल्या वनसंपदेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पाऊलखुणा दर्शविणारा ऐतिहासिक कोहोज किल्ल्याचा समावेश आहे. २०० हेक्टरहून अधिक क्षेत्र असलेल्या या कोहोज किल्ला परिसरात लाखोंच्या संख्येने विविध प्रजातींमधील वनसंपत्ती आहे. मोठ्या प्रमाणावर वन औषधी झाडेही आहेत. मात्र, दरवर्षी येथील जंगलाला आग लागते व या आगीत हजारो नव्याने लागवड केलेली, तसेच वन औषधी वनसंपदा जळून खाक होते.येथील जंगलाची राखण करण्यासाठी वनविभागाने महाराष्ट्र वनविकास महामंडळ यांच्यावर जबाबदारी दिली आहे.वनविकास महामंडळाच्या वन अधिकाऱ्यांना या संदर्भात विचारणा केली असता, आग लागलेले क्षेत्र आमच्या अखत्यारित येत नाही, असे बोलून जबाबदारी टाळत असतात. दरम्यान, या आगी आटोक्यात आणण्यापूर्वीच या जंगलातील निम्म्याहून अधिक वनसंपदा होरपळून गेलेली असते. आग विझविण्यासाठी वन विभागाकडे अपुरे मनुष्यबळ, अपुऱ्या साधनसामुग्रीमुळे या आगी आटोक्यात येत नाहीत. आजवर आगी लावणाऱ्यांविरोधात वनविभागाने कारवाई केलेली दिसून येत नाही. 

टॅग्स :fireआग