शहरं
Join us  
Trending Stories
1
"मलाही वाटतं मी मुख्यमंत्री व्हावं, पण..."; अजित पवार यांना असं का म्हणावंसं वाटलं? नेमका विषय काय?
2
गिल ने जीता दिल! गुजरातचं धडाकेबाज 'कमबॅक', काव्या मारनचा SRH संघ स्पर्धेतून जवळपास OUT!
3
विराट कोहलीने अवनीत कौरच्या 'त्या' फोटोला केलं Like, ट्रोल झाल्यावर स्पष्टीकरण देत म्हणाला...
4
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
5
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
6
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
7
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
8
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
9
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
10
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
11
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

वाडा तालुक्यातील अनेक जंगलात वणवे, वन विभागाने लक्ष देण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2018 04:26 IST

तालुक्यात मोठ्या प्रमाणात खाजगी मालकीचे आणि वन विभागाचे जंगल आहे. पावसाने जंगलात मोठ्या प्रमाणात गवत उगवते.जानेवारी-फेब्रुवारी मध्ये हे गवत पूर्णपणे सुकलेले असते. मात्र काही ठिकाणी समाज कंटकांमुळे तर काही ठिकाणी विजेच्या तारांमधून पडणा-या आगीच्या ठिणग्यांमुळे या जंगलातील मोठा भाग खाक झाला आहे.

वाडा : तालुक्यात मोठ्या प्रमाणात खाजगी मालकीचे आणि वन विभागाचे जंगल आहे. पावसाने जंगलात मोठ्या प्रमाणात गवत उगवते.जानेवारी-फेब्रुवारी मध्ये हे गवत पूर्णपणे सुकलेले असते. मात्र काही ठिकाणी समाज कंटकांमुळे तर काही ठिकाणी विजेच्या तारांमधून पडणा-या आगीच्या ठिणग्यांमुळे या जंगलातील मोठा भाग खाक झाला आहे. ह्यांमुळे जंगलाचे मोठ्या प्रमाणात नुकसान तर होतेच त्याच बरोबर अनेक वन्यजीव, प्राणी ह्या वणव्यांमधे मृत्यू पावतात. दुर्मिळ होत चाललेल्या पक्षी-प्राण्यांच्या प्रजातीही नष्ट होतात.ह्या वणव्यांमुळे पाळीव जनावरांच्या चरण्याचा प्रश्न देखील गंभीर बनतो. दर वर्षी लागणार्या ह्या आगींमुळे जंगलातील औषधी वनस्पती देखील नष्ट होत आहेत.शासनाच्या कोटींच्या कोटी वृक्ष लागवाडीच्या संकल्पाला आणि स्वप्नांना या वणव्यांमुळे तडा जात असून वनविभाग मात्र त्यावर उपाय करण्यास असमर्थ ठरलेला आहे.अनेक भागातील जंगलांमधे काही समाजकंटकांकडून ससे, रान डुकरे, मोर आणि अन्य प्राण्यांच्या शिकारीसाठी जंगलाना आग लावली जाते.अशा समाजकंटकांचा वन विभागाने त्वरीत बंदोबस्त करण्याची गरज आहे. नाहीतर शासनाचा दर वर्षाचा कोटीच्या कोटी वृक्ष लागवडीवरील सगळा खर्च हा अशा वणव्यांमुळे वाया जाईल असे मत निसर्गप्रेमी व्यक्त करत आहेत.दर वर्षीच्या वणव्यांमुळे जंगलांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. दर वर्षी रानोमाळी-डोंगरांना मोठ्या प्रमाणात आगीने वेढलेले आपण बघतो. मात्र ह्यावर उपाय शोधण्यास वन विभागाला आजपर्यंत यश आलेले नाही.शासन वृक्षारोपणासाठी करोडो रु पये खर्च करते मात्र जंगलातील अशा वणव्यांमुळे जंगलांतील वन्यजीव आणि वनस्पती नष्ट होतात.ह्यावर वनविभागाने उपाय शोधण्याची गरज आहे.-विक्र ांत पाटील,निसर्ग प्रेमी

टॅग्स :fireआग