शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
2
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
3
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
4
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
5
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
6
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
7
Nuwan Thushara, IPL 2024 MI vs KKR: 'पॉवर-प्ले'मध्ये कोलकाताची 'बॅटरी डाऊन'! तुषाराने घेतल्या ३ विकेट्स, हार्दिकनेही फोडला घाम
8
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
9
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
10
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
11
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
12
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
13
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
14
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
15
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
16
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
17
संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार
18
देशातील कर प्रणालीवर राजीव बजाज यांची टीका, सरकारकडे केली 'ही' मागणी...
19
पाकिस्तान भारताची कॉपी करायला गेला, चीनच्या मदतीनं लॉन्च केलं 'मून मिशन'; झाला 'खेला'!
20
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा

विद्यार्थ्यांना हजारो रुपयांची फी भरण्याची सक्ती; पालकांची लोकप्रतिनिधींकडे धाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2020 1:46 AM

अणुऊर्जा प्रकल्पाच्या शाळा व्यवस्थापनाचा दम, पालघर विधानसभा मतदार- संघाचे आमदार   श्रीनिवास वनगा व शिवसेना जिल्हाप्रमुख राजेश शाह यांच्या माध्यमातून सदर बैठक घेण्यात आली.

पालघर : देश अणुऊर्जा उत्पादनात स्वयंसिद्ध व्हावा यासाठी आपल्या घरादारांवर नांगर फिरवून आपल्या जमिनी या प्रकल्पासाठी देणाऱ्या विस्थापित पोफरणच्या विद्यार्थ्यांकडून अणुऊर्जा प्रकल्पाच्या शाळा हजारो रुपयांची फी भरण्याची सक्ती करीत आहेत. फी भरा नाहीतर बाहेर जा, असा सज्जड दम दिला जात असल्याने पालकांनी आता शिवसेना आमदार श्रीनिवास वणगा यांच्याकडे धाव घेतली आहे.

तारापूर येथील अणुऊर्जा प्रकल्प-३ आणि ४ च्या उभारणीसाठी भूमिपुत्रांनी आपल्या जमिनी कवडीमोल भावाने दिल्या. त्यांचे पुनर्वसन पोफरण येथे करण्यात आले. तेथे ते स्वतः भेगा पडलेल्या घरात आणि आरोग्य, पाणी, विद्युतपुरवठा आदी पुरेशा सुविधा नसलेल्या भागात राहात आहेत. आजही अनेक मागण्या मान्य न केल्याने ते शासनाविरोधात न्यायालयीन लढा लढत आहेत. शिक्षणासारख्या सुविधांचा लाभही त्यांना दिला जात नसून या भागातून विस्थापित झालेल्या शेतकरी व मच्छीमार समाजातील विद्यार्थ्यांकडून हजारो रुपयांची फी मागितली जात आहे. त्यामुळे ॲटोमिक एनर्जी स्कुल व्यवस्थापन समितीने शालेय फी आकारू नये, फी माफ करून त्यामध्ये सवलत द्यावी, यासंदर्भात नुकतीच एक बैठक जिल्हाधिकारी कार्यालय पालघर येथे आयोजित करण्यात आली होती.

पालघर विधानसभा मतदार- संघाचे आमदार   श्रीनिवास वनगा व शिवसेना जिल्हाप्रमुख राजेश शाह यांच्या माध्यमातून सदर बैठक घेण्यात आली. या वेळी जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ, पालकवर्ग व तारापूर अणुऊर्जा प्रकल्पाचे संचालक ए. के. राजपूत, सामाजिक दायित्व निधीचे अधिकारी कुलकर्णी आदी बैठकीत सहभागी झाले होते. 

सकारात्मक अहवालासह पाठपुरावा करू

  • पालक व विद्यार्थी यांना ॲॅटोमिक एनर्जी स्कुल व्यवस्थापन समितीकडून फी भरण्यासाठी सतत दबाव दिला जातो, अशी तक्रार पालकवर्गाने केली. इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांना यामध्ये खास सवलत द्यावी, त्यांचे रजिस्ट्रेशन करावे, अशा मागण्या मांडण्यात आल्या. 
  • या संदर्भातील निर्णय घेण्याचे अधिकार आम्हाला नसल्याचे सांगितले. या बैठकीचा अहवाल केंद्रीय स्तराकडे सकारात्मक अहवालासह पाठवू व त्याचा पाठपुरावा करू, असे अणुऊर्जा प्रकल्प अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, हा प्रश्न हा केंद्र शासनाशी निगडित असल्याने खा. राजेंद्र गावितांनी अनेक वेळा प्रयत्न केले आहेत. मात्र त्यांनाही अणुऊर्जा प्रकल्पाच्या शाळा व्यवस्थापनाने जुमानलेले नाही.
टॅग्स :Shiv Senaशिवसेना