शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

लग्नामध्ये 11 मुलांना अन्नातून विषबाधा, पालघर तालुक्यातील किराट गावातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2021 06:39 IST

Food poisoning : पालघर तालुक्यातील किराट गावामध्ये एका लग्नसमारंभात अकरा जणांना अन्नातून विषबाधा झाल्याची घटना घडल्याने खळबळ माजली आहे.

कासा - पालघर तालुक्यातील किराट गावामध्ये एका लग्नसमारंभात अकरा जणांना अन्नातून विषबाधा झाल्याची घटना घडल्याने खळबळ माजली आहे. संध्याकाळच्या वेळी लग्नसमारंभामध्ये ही लहान मुले थंड प्यायले आणि जेवल्यानंतर अचानक या लहान मुलांना उलटी व जुलाब सुरू झाले.या मुलांच्या पालकांनी लगेचच सोमटा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये त्यांना उपचारांसाठी दाखल केले. पण तेथे काही फरक पडत नसल्याने त्यानंतर सोमटा आरोग्य केंद्रातून मुलांना दुपारी एक वाजता कासा उपजिल्हा रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. यामध्ये वय वर्षे पाच ते दहा वयोगटातील मुलांची संख्या आहे. त्यामध्ये अनुष्का माळी, अंजली माळी, आयुष माळी, साहिल माळी, सलोनी माळी, सुशील माळी, प्रणिती माळी, मयांक माळी, प्राची माळी, सुनील माळी, निखिल माळी अशी या मुलांची नावे आहेत. सध्या या मुलांवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती कासा उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी दिली.दरम्यान, पालघर जिल्ह्यामध्ये कोरोना प्रादुर्भावाच्या भीतीमुळे लग्नसमारंभांसह सार्वजनिक कार्यक्रमांवर बंधने आली होती. परंतु आता जिल्ह्याचा कोरोनामुक्तीकडे प्रवास सुरू असताना आणि लाॅकडाऊनही शिथिल झालेले असल्यामुळे जिल्ह्यात गेले दहा महिने रखडलेले लग्नसमारंभ होऊ लागले आहेत. अशाच एका लग्न समारंभात हा प्रकार घडल्याने खळबळ माजली  आहे. कोरोनासंदर्भातील नियमांचे उल्लंघन   जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या कमी होत असल्याने ग्रामीण भागात चिंता कमी होऊ लागली आहे. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी कोरोनासंदर्भातील नियमांचेही उल्लंघन होत असल्याचे चित्र आहे.  दरम्यान, विषबाधा झालेल्या काही मुलांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याचे सांगण्यात आले असून त्यांना घरी सोडण्यात आल्याचे समजते. 

टॅग्स :food poisoningअन्नातून विषबाधाpalgharपालघर