शहरं
Join us  
Trending Stories
1
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
2
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
3
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
4
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
5
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
6
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
7
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
8
'महाभारत'ची कुंती 'बिग बॉस'मध्ये येणार! 'हत्यारे की बहन' म्हणून बोलवायचे लोक, कोण आहे ती?
9
दुचाकीला धडक देऊन ट्रक ड्रायव्हर पळाला, पण AIने केली कमाल, पोलिसांनी ३६ तासांत पकडला
10
मुंबईची वर्षभराची तहान भागणार, मुसळधार पावसाने सातही जलाशये जवळपास फुल्ल
11
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
12
'जय मल्हार'मध्ये खंडोबाची भूमिका साकारली, आता जेजुरीच्या पायथ्याशी देवदत्त नागे बांधतोय घर
13
४२ वर्षांच्या लढ्यानंतर कोल्हापूर सर्किट बेंच झाले आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या: सरन्यायाधीश
14
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळेल ₹१४,६६३ चं फिक्स्ड व्याज; पाहा कोणती आहे स्कीम
15
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
16
RTIच्या सराईतांचा खेळ आता खल्लास! १० हजार अपील फेटाळले; राज्य माहिती आयोगाचा चाप
17
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
18
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
19
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
20
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला

वसई मिठागरातील लोकवस्तीवर यंदाही पुराचे सावट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2020 04:36 IST

स्थलांतरास नागरिकांचा विरोध; प्रशासनाची कोरोनामुळे कसरत

पारोळ : यंदा वसई-विरार पाण्याखाली जाण्याचा धोका आहे. त्यामुळे वसई पूर्वेतील मिठागर मजुरांच्या वस्तीला पुराचा धोका निर्माण होणार आहे. अशी परिस्थिती उद्भवल्यास शेकडो नागरिकांना कोरोनासारख्या आपत्तीत विस्थापित करण्यासाठी महापालिकेच्या आपत्ती विभागाला तारेवरची कसरत करावी लागणार आहे. जुलैमध्ये कोरोनाचा धोका वाढण्याची डॉक्टरांनी शक्यता व्यक्त केली आहे. कोरोना आणि पूर अशा दोन्ही आपत्तींत महापालिका प्रशासन, अग्निशमन विभाग आणि आपत्ती विभागातील कर्मचाऱ्यांना आपले काम निभवावे लागणार आहे.वसई पूर्वेतील नवघर येथील मिठागर असलेल्या ठिकाणी सर्वसामान्य मजुरांची मोठी वस्ती आहे. दरवर्षी पुराचा पहिला फटका या वसाहतीला बसतो. त्यामुळे सुमारे ५०० च्या आसपास मजुरांना दरवर्षी अग्निशमन विभागाच्या सहकार्याने सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करावे लागते. यंदा पुरामुळे नागरिकांना स्थलांतरित करण्यात कोणतीच अडचण नसली तरी समोर कोरोनाचा धोका आहे. एका मजुराला जरी या विषाणूची लागण झाली आणि त्यात पुरामुळे त्यांच्यावर स्थलांतराची वेळ आली तर सर्वात मोठे संकट कोसळण्याची भीती आहे. मदतकार्य करणाºया जवानांनाही संसर्गाचा धोका पोहोचू शकतो. महापालिका प्रशासनाने मे महिन्यातच नालेसफाईसारखे काम मन लावून केले असते, तसेच नैसर्गिक नाल्यांवर झालेली अनधिकृत बांधकामेतत्काळ निष्कसित केली असती तर ऐन पावसाळ्यात नागरिकांना जीव मुठीत घेऊन जगण्याची गरज पडली नसती.दरवर्षी पावसात साचते पाणी मागील २० वर्षांपासून अमीर महल मिठागराच्या ठिकाणी ४५० ते ५०० लोकवस्ती आहे. या ठिकाणी दरवर्षी पाणी साचते. दरवर्षी पाणी साचल्यानंतरही येथील नागरिकांचे स्थलांतर करण्यास विरोध असतो. त्यामुळे दरवर्षी पालिका प्रशासनाचीच डोकेदुखी वाढते. नुकतेच झालेल्या निसर्ग चक्रीवादळातही प्रशासनाने बसची व्यवस्था या ठिकाणी केली होती. मात्र तेव्हाही नागरिकांनी स्थलांतर करण्यास विरोध दर्शवला.