शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

पाच वर्षे अध्यक्ष शिवसेनेचाच, राष्ट्रवादीला उपाध्यक्षपद

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2020 00:37 IST

पालघर जिल्हा परिषदेत शिवसेना (१८) आणि राष्ट्रवादी (१४) मिळून बहुमताचा आकडा पूर्ण होत असल्याने अन्य पक्षांची साथ न घेताच हे दोन्ही पक्ष जिल्ह्यात सत्ता स्थापन करणार आहेत.

पालघर/ठाणे : पालघरजिल्हा परिषदेत शिवसेना (१८) आणि राष्ट्रवादी (१४) मिळून बहुमताचा आकडा पूर्ण होत असल्याने अन्य पक्षांची साथ न घेताच हे दोन्ही पक्ष जिल्ह्यात सत्ता स्थापन करणार आहेत. यामध्ये पाच वर्षे शिवसेनेकडे अध्यक्षपद आणि राष्ट्रवादीकडे उपाध्यक्षपद ठेवण्यात येणार आहे. यासंदर्भातील निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंसाधन मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. दरम्यान, अध्यक्षपदासाठी माजी आमदार अमित घोडा यांच्या पत्नी अमिता घोडा यांचे नाव आघाडीवर असून, भारती कामडी, वैदेही वाढाण आणि गुलाब राऊत यांचीही नावे स्पर्धेत आहेत.पालघर जिल्हा परिषदेत शिवसेनेलाच अध्यक्षपद मिळणार असल्यामुळे आणि पहिल्या अडीच वर्षांसाठी अनुसूचित जमातीतील महिलांसाठी आरक्षण असल्यामुळे शिवसेनेतील अमिता घोडा, भारती तांबडी, वैदेही वाढाण आणि गुलाब राऊत ही नावे या पदासाठी चर्चिली जात आहेत. मात्र त्याच वेळी माजी आमदार अमित घोडा यांनी विधानसभा निवडणुकीवेळी शिवसेना उमेदवार श्रीनिवास वणगा यांच्याविरोधात बंडखोरी केल्यानंतर त्यांचे बंड शमवण्यासाठी त्यांना थेट मातोश्रीवर नेण्यात आले होते. त्या वेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अमित घोडा यांना दिलेल्या आश्वासनामुळे अमिता घोडा यांचे पारडे जड असल्याचे मानलेजात आहे.राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असल्यामुळे पालघर जिल्ह्यातही निवडणुकीनंतर तोच प्रयोग राबवला जाईल, अशी चर्चा सुरू होती. मात्र शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याकडे जिल्हा परिषदेत पुरेसे संख्याबळ आहे. त्यांना अन्य पक्षांच्या अथवा अपक्षांच्या पाठिंब्याची गरज नाही. त्यामुळे या दोन्ही पक्षांच्या झालेल्या बैठकीत अन्य पक्षांकडे पाठिंबा मागण्याची गरज नाही, परंतु जर कुणी पक्ष अथवा स्थानिक आघाडी पाठिंबा देत असेल, त्यांचे स्वागत करावे, असे ठरले असल्याचे सांगण्यात आले.पालघर जिल्हा परिषदेच्या ५७ सदस्यांपैकी शिवसेना १८, राष्ट्रवादी १४, भाजप १२, माकप ५, बविआ ४, अपक्ष ३ तर काँग्रेस १ असे संख्याबळ आहे. शिवसेना १८ जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे. सत्तास्थापनेसाठी बहुमताचा २९ हा आकडा असून राष्ट्रवादीच्या १४ जागा आहेत. त्यामुळे काँग्रेस (१) आणि जिजाऊ संघटना (१) यांची तसेच माकपा, बविआ आणि अपक्ष सदस्यांच्या पाठिंब्याची शिवसेना-राष्ट्रवादीला सत्ता स्थापन करण्यासाठी गरज लागणार नाही. बहुजन विकास आघाडीला शिवसेना जिल्ह्यातील एक नंबरचा शत्रू मानत असल्यामुळे बहुजन विकास आघाडीला महाविकास आघाडीबाहेर ठेवण्यासाठीच ही खेळी खेळण्यात आली असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.माजी आमदार अमित घोडा यांच्या पत्नी अमिता घोडा यांचे नाव जरी आघाडीवर असले तरीही भारती कामडी, वैदेही वाढाण आणि गुलाब राऊत यांचीही नावे चर्चेत आलेली असल्याने नेमकी या पदावर कुणाची निवड होते, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागलेले आहे. त्याच वेळी राष्ट्रवादी काँग्रेसमधून उपाध्यक्षपदासाठी कुणाची वर्णी लागते, याविषयीही उत्सुकता निर्माण झालेली आहे. याबाबत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अद्यापही आपले पत्ते खोललेले नाहीत.>मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत शिवसेना आणि राष्ट्रवादीचीच सत्ता स्थापन होणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र त्याच वेळी अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाचा निर्णय घेताना अनुभव, शिक्षण आणि कामकाज चालवण्याची क्षमता यांचा विचार केला जाऊन निर्णय घेण्याचे ठरले आहे.- रवींद्र फाटक, पालघर जिल्हा संपर्क प्रमुख, शिवसेना.

टॅग्स :ZP Electionजिल्हा परिषदpalgharपालघर