शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
3
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
4
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
5
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
6
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
7
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
8
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
9
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
10
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
11
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
12
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
13
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
14
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
15
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
16
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
17
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
18
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
19
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
20
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!

मासेमारीचा मुहूर्त ११ आॅगस्ट

By admin | Updated: July 30, 2015 00:31 IST

हवामान खात्याकडून समुद्रात तुफानी लाटा आणि वादळी वारे वहात असल्याचे इशारे वारंवार दिले जात असल्याच्या पार्श्वभूमीवर संभाव्य जीवीतहानी व आर्थिक हानीची शक्यता पहाता पालघर

पालघर : हवामान खात्याकडून समुद्रात तुफानी लाटा आणि वादळी वारे वहात असल्याचे इशारे वारंवार दिले जात असल्याच्या पार्श्वभूमीवर संभाव्य जीवीतहानी व आर्थिक हानीची शक्यता पहाता पालघर, डहाणू तालुक्यातील मच्छीमारांनी १ आॅगस्ट ऐवजी ११ आॅगस्ट नंतर मासेमारीला समुद्रात जाण्याचा निर्णय आज एकमताने घेतला आहे.राज्यशासनाने महाराष्ट्र मासेमार सागरी नियमन अधिनियमन १९८१ अन्वये १० जुन ते १५ आॅगस्ट पासून पावसाळी बंदी कालावधी घोषीत केला होता. परंतु अपरिमीत मासेमारीमुळे मत्स्य दुष्काळाचे संकट मच्छीमारांवर घोंगावू लागल्याने पालघर, डहाणू, वसई, गुजरात राज्यातील मच्छीमारांनी मत्स्य उत्पादन व मत्स्य संवर्धनाच्या दृष्टीने निर्णय घेत १५ मे पासूनच मासेमारी व्यवसाय बंद ठेवला होता. त्याचे सकारात्मक बदल होऊन पावसाळी बंदीनंतर माशांच्या उत्पादनात मोठी वाढ होत असल्याचे दिसून आले होते. त्यामुळे केंद्र व राज्य शासनाने सागरी अधिनियमात बदल करून १ मे पासूनच मासेमारी बंदी कालावधी घोषीत करावा अशी मागणी म. म. कृती समिती सह सर्व सहकारी संस्थांनी केली होती. या मागणीकडे दुर्लक्ष करीत राज्य व केंद्रशासनाने परिपत्रक काढून १ जून ते ३१ जुलै अशी पावसाळी मासेमारी बंदी मच्छीमारावर लादली होती. त्यामुळे मच्छीमार वर्गातून संतप्त प्रतिक्रीया उमटल्या होत्या.केंद्र व राज्य शासनाच्या परिपत्रकानुसार पालघर, डहाणू, वसई तालुक्यातील मच्छीमारांनी १ आॅगस्ट पासून मासेमारी व्यवसायाला सुरूवात होण्याच्या दृष्टीने बोटीला रंगरंगोटी, नवीन जाळी विणणे, खलाशी कामगारांची व्यवस्था करणे, इंजीन दुरूस्ती करून बोटीत डिझेल, जाळी भरून पूर्ण तयारी केली होती. परंतु २५ जुलै पासून मुसळधार पावसासह जोरदार वादळी वारे वाहत समुद्रात तुफानी लाटा निर्माण झाल्या होत्या. त्यामुळे मच्छीमारांनी मासेमारीला समुद्रात जाऊ नये असा इशारा हवामान खात्याकडून वारंवार येत आहे. त्यामुळे सन १९८२ साली याच जुलै महिन्यात समुद्रात ८७ मच्छीमारी ट्रॉलर्स बुडून ३०४ मच्छीमारांचा बुडून मृत्यू झाला होता. त्याच घटनेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून सातपाटी मधील सर्वोदय सहकारी संस्था व मच्छीमार सहकारी संस्था या दोन संस्थानी आज सातपाटी येथे बैठक घेऊन ११ आॅगस्टपासून मासेमारीला समुद्रात जाण्याचा निर्णय एकमताने घेतल्याचे नरेंद्र पाटील व राजन मेहेर या संस्थांच्या अध्यक्षांनी सांगितले. याचवेळी मच्छीमार नेते अशोक अंभीरे यांनीही या निर्णयाचे समर्थन केले.