शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
3
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
4
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
5
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
6
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
7
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
8
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
9
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
10
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
11
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
12
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
13
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
14
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
15
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
16
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
17
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला
18
IND vs ENG : क्रिस वोक्सला सलाम! खांदा फॅक्चर असताना संघासाठी मैदानात उतरला (VIDEO)
19
शाहरुख खान अन् राणी मुखर्जीसाठी प्रिय मित्र करण जोहरची पोस्ट, म्हणाला, "३३ वर्षांचा हा काळ..."
20
थ्रेडिंगमुळे लिव्हर फेल? आयब्रो करणं पडेल चांगलंच महागात, डॉक्टरांचा धोक्याचा इशारा

मासेमारीचा मुहूर्त ११ आॅगस्ट

By admin | Updated: July 30, 2015 00:31 IST

हवामान खात्याकडून समुद्रात तुफानी लाटा आणि वादळी वारे वहात असल्याचे इशारे वारंवार दिले जात असल्याच्या पार्श्वभूमीवर संभाव्य जीवीतहानी व आर्थिक हानीची शक्यता पहाता पालघर

पालघर : हवामान खात्याकडून समुद्रात तुफानी लाटा आणि वादळी वारे वहात असल्याचे इशारे वारंवार दिले जात असल्याच्या पार्श्वभूमीवर संभाव्य जीवीतहानी व आर्थिक हानीची शक्यता पहाता पालघर, डहाणू तालुक्यातील मच्छीमारांनी १ आॅगस्ट ऐवजी ११ आॅगस्ट नंतर मासेमारीला समुद्रात जाण्याचा निर्णय आज एकमताने घेतला आहे.राज्यशासनाने महाराष्ट्र मासेमार सागरी नियमन अधिनियमन १९८१ अन्वये १० जुन ते १५ आॅगस्ट पासून पावसाळी बंदी कालावधी घोषीत केला होता. परंतु अपरिमीत मासेमारीमुळे मत्स्य दुष्काळाचे संकट मच्छीमारांवर घोंगावू लागल्याने पालघर, डहाणू, वसई, गुजरात राज्यातील मच्छीमारांनी मत्स्य उत्पादन व मत्स्य संवर्धनाच्या दृष्टीने निर्णय घेत १५ मे पासूनच मासेमारी व्यवसाय बंद ठेवला होता. त्याचे सकारात्मक बदल होऊन पावसाळी बंदीनंतर माशांच्या उत्पादनात मोठी वाढ होत असल्याचे दिसून आले होते. त्यामुळे केंद्र व राज्य शासनाने सागरी अधिनियमात बदल करून १ मे पासूनच मासेमारी बंदी कालावधी घोषीत करावा अशी मागणी म. म. कृती समिती सह सर्व सहकारी संस्थांनी केली होती. या मागणीकडे दुर्लक्ष करीत राज्य व केंद्रशासनाने परिपत्रक काढून १ जून ते ३१ जुलै अशी पावसाळी मासेमारी बंदी मच्छीमारावर लादली होती. त्यामुळे मच्छीमार वर्गातून संतप्त प्रतिक्रीया उमटल्या होत्या.केंद्र व राज्य शासनाच्या परिपत्रकानुसार पालघर, डहाणू, वसई तालुक्यातील मच्छीमारांनी १ आॅगस्ट पासून मासेमारी व्यवसायाला सुरूवात होण्याच्या दृष्टीने बोटीला रंगरंगोटी, नवीन जाळी विणणे, खलाशी कामगारांची व्यवस्था करणे, इंजीन दुरूस्ती करून बोटीत डिझेल, जाळी भरून पूर्ण तयारी केली होती. परंतु २५ जुलै पासून मुसळधार पावसासह जोरदार वादळी वारे वाहत समुद्रात तुफानी लाटा निर्माण झाल्या होत्या. त्यामुळे मच्छीमारांनी मासेमारीला समुद्रात जाऊ नये असा इशारा हवामान खात्याकडून वारंवार येत आहे. त्यामुळे सन १९८२ साली याच जुलै महिन्यात समुद्रात ८७ मच्छीमारी ट्रॉलर्स बुडून ३०४ मच्छीमारांचा बुडून मृत्यू झाला होता. त्याच घटनेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून सातपाटी मधील सर्वोदय सहकारी संस्था व मच्छीमार सहकारी संस्था या दोन संस्थानी आज सातपाटी येथे बैठक घेऊन ११ आॅगस्टपासून मासेमारीला समुद्रात जाण्याचा निर्णय एकमताने घेतल्याचे नरेंद्र पाटील व राजन मेहेर या संस्थांच्या अध्यक्षांनी सांगितले. याचवेळी मच्छीमार नेते अशोक अंभीरे यांनीही या निर्णयाचे समर्थन केले.