शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
2
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
3
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
4
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
5
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
6
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
7
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
8
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
9
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
10
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
11
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
12
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
13
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
14
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
15
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
16
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
17
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
18
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
19
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
20
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

मासेमारीचा मुहूर्त ११ आॅगस्ट

By admin | Updated: July 30, 2015 00:31 IST

हवामान खात्याकडून समुद्रात तुफानी लाटा आणि वादळी वारे वहात असल्याचे इशारे वारंवार दिले जात असल्याच्या पार्श्वभूमीवर संभाव्य जीवीतहानी व आर्थिक हानीची शक्यता पहाता पालघर

पालघर : हवामान खात्याकडून समुद्रात तुफानी लाटा आणि वादळी वारे वहात असल्याचे इशारे वारंवार दिले जात असल्याच्या पार्श्वभूमीवर संभाव्य जीवीतहानी व आर्थिक हानीची शक्यता पहाता पालघर, डहाणू तालुक्यातील मच्छीमारांनी १ आॅगस्ट ऐवजी ११ आॅगस्ट नंतर मासेमारीला समुद्रात जाण्याचा निर्णय आज एकमताने घेतला आहे.राज्यशासनाने महाराष्ट्र मासेमार सागरी नियमन अधिनियमन १९८१ अन्वये १० जुन ते १५ आॅगस्ट पासून पावसाळी बंदी कालावधी घोषीत केला होता. परंतु अपरिमीत मासेमारीमुळे मत्स्य दुष्काळाचे संकट मच्छीमारांवर घोंगावू लागल्याने पालघर, डहाणू, वसई, गुजरात राज्यातील मच्छीमारांनी मत्स्य उत्पादन व मत्स्य संवर्धनाच्या दृष्टीने निर्णय घेत १५ मे पासूनच मासेमारी व्यवसाय बंद ठेवला होता. त्याचे सकारात्मक बदल होऊन पावसाळी बंदीनंतर माशांच्या उत्पादनात मोठी वाढ होत असल्याचे दिसून आले होते. त्यामुळे केंद्र व राज्य शासनाने सागरी अधिनियमात बदल करून १ मे पासूनच मासेमारी बंदी कालावधी घोषीत करावा अशी मागणी म. म. कृती समिती सह सर्व सहकारी संस्थांनी केली होती. या मागणीकडे दुर्लक्ष करीत राज्य व केंद्रशासनाने परिपत्रक काढून १ जून ते ३१ जुलै अशी पावसाळी मासेमारी बंदी मच्छीमारावर लादली होती. त्यामुळे मच्छीमार वर्गातून संतप्त प्रतिक्रीया उमटल्या होत्या.केंद्र व राज्य शासनाच्या परिपत्रकानुसार पालघर, डहाणू, वसई तालुक्यातील मच्छीमारांनी १ आॅगस्ट पासून मासेमारी व्यवसायाला सुरूवात होण्याच्या दृष्टीने बोटीला रंगरंगोटी, नवीन जाळी विणणे, खलाशी कामगारांची व्यवस्था करणे, इंजीन दुरूस्ती करून बोटीत डिझेल, जाळी भरून पूर्ण तयारी केली होती. परंतु २५ जुलै पासून मुसळधार पावसासह जोरदार वादळी वारे वाहत समुद्रात तुफानी लाटा निर्माण झाल्या होत्या. त्यामुळे मच्छीमारांनी मासेमारीला समुद्रात जाऊ नये असा इशारा हवामान खात्याकडून वारंवार येत आहे. त्यामुळे सन १९८२ साली याच जुलै महिन्यात समुद्रात ८७ मच्छीमारी ट्रॉलर्स बुडून ३०४ मच्छीमारांचा बुडून मृत्यू झाला होता. त्याच घटनेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून सातपाटी मधील सर्वोदय सहकारी संस्था व मच्छीमार सहकारी संस्था या दोन संस्थानी आज सातपाटी येथे बैठक घेऊन ११ आॅगस्टपासून मासेमारीला समुद्रात जाण्याचा निर्णय एकमताने घेतल्याचे नरेंद्र पाटील व राजन मेहेर या संस्थांच्या अध्यक्षांनी सांगितले. याचवेळी मच्छीमार नेते अशोक अंभीरे यांनीही या निर्णयाचे समर्थन केले.