शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

पालघरमधील मच्छीमार व्यवसाय डबघाईला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2020 23:09 IST

शासनाचे दुर्लक्ष : सर्वेक्षणामुळे अस्मानी नंतर सुलतानी संकटाचे ढग

शौकत शेख 

डहाणू : वादळी वारे, अतिवृष्टी आणि मत्स्य दुष्काळ यामुळे आधीच अस्मानी संकटात सापडलेला मच्छीमार आता ओएनजीसीच्या सर्वेक्षण आणि मत्स्य दुष्काळामुळे सुलतानी संकटात सापडला असल्याने मच्छीमार हवालदिल झाला आहे. थंडीच्या मोसमामुळे मत्स्य दुष्काळ असल्यामुळे मच्छीमार डोली आणि जाळीने मासेमारीकडे वळला आहे. त्यामुळे जाळ्यात येईल ते मासे पकडून उदरनिर्वाह करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत बोंबील आणि पापलेट मिळत असून ओल्या बोंबीलचे ४०० ते ५०० टप मुंबईला पाठवले जात आहेत. बोंबीलच्या एक टपाला ५००० असा भाव मिळत असून बोंबील उत्पादन नसल्याने बोंबील, पापलेटचा भाव वधारला आहे. दरम्यान डिसेंबर ते एप्रिल हा थंडीचा काळ मत्स्य उत्पादनासाठी ढिसाळ काळ मानला जातो. होळीनंतर मासे उत्पादनाला चांगला काळ येतो, मात्र या काळात ओएनजीसी सेसमिक आपला सर्वेक्षण सुरू करत असल्याने मासेमारीसाठी गेलेल्या बोटी हाकलून लावल्या जात असल्याचे मच्छीमार नेते अशोक अंभीरे यांनी सांगितले. त्यामुळे आता मच्छीमारांवर अस्मानी संकटानंतर सुलतानी संकट ओढवण्याची भीती व्यक्त केली आहे.सागराशी झुंज देऊन रात्रंदिवस पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणाऱ्या चिंचणी ते झाईपर्यंतच्या मच्छिमार समुद्रात मासे सापडत नसल्याने हवालदिल झाला आहे. बोंबीलसाठी भांगाची मासेमारी केली जाते. नवमी, सप्तमी, पंचमी, अष्टमी यामध्ये बोंबील मासेमारी केली जाते. सुक्या बोंबीलसाठी डहाणू प्रसिद्ध आहे.

डिसेंबर ते एप्रिल हा मासेमारीचा ढिसाळ हंगाम असतो. होळीनंतर मासेमारी केली जाते. डालडा मासेमारी पौर्णिमा व उधाणाला मासेमारी होते. यामध्ये मासे मिळतात. नुकसान भरपाई दिलेली नाही. डिसेंबरपासून एप्रिलपर्यंत उपजीविकेचे क्षेत्र बॅन करतात. त्यामुळे मासेमारांना मागे परतावे लागते. समुद्रात गेलेल्या बोटींना डिझेलचा खर्चही मिळत नाही. इंधन व मजुरीच्या दरात झालेली वाढ व मत्स्य उत्पादनात होणारी घट यामुळे हा व्यवसाय डबघाईला आला आहे.‘मासेमारीस उपयुक्त असलेल्या सुरुवातीच्या पहिल्या हंगामात वाळत ठेवलेल्या सुकी मासळीचे वादळे तसेच अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीमुळे मच्छीमार व्यावसायिकांचे कंबरडे मोडले आहे. अशातच ओएनजीसीसारख्या सरकारी कंपन्यांकडून अरबी समुद्रातील खनिज तेलसाठ्यांबाबत होत असलेल्या सर्वेक्षणामुळे मच्छीमार क्षेत्राच्या मर्यादा अटी-शर्तीच्या त्रांगड्यात अडकल्या आहेत.’ -अशोक अंभीरे, मच्छीमार नेते

टॅग्स :Vasai Virarवसई विरार