शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

पालघरमधील मच्छीमार व्यवसाय डबघाईला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2020 23:09 IST

शासनाचे दुर्लक्ष : सर्वेक्षणामुळे अस्मानी नंतर सुलतानी संकटाचे ढग

शौकत शेख 

डहाणू : वादळी वारे, अतिवृष्टी आणि मत्स्य दुष्काळ यामुळे आधीच अस्मानी संकटात सापडलेला मच्छीमार आता ओएनजीसीच्या सर्वेक्षण आणि मत्स्य दुष्काळामुळे सुलतानी संकटात सापडला असल्याने मच्छीमार हवालदिल झाला आहे. थंडीच्या मोसमामुळे मत्स्य दुष्काळ असल्यामुळे मच्छीमार डोली आणि जाळीने मासेमारीकडे वळला आहे. त्यामुळे जाळ्यात येईल ते मासे पकडून उदरनिर्वाह करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत बोंबील आणि पापलेट मिळत असून ओल्या बोंबीलचे ४०० ते ५०० टप मुंबईला पाठवले जात आहेत. बोंबीलच्या एक टपाला ५००० असा भाव मिळत असून बोंबील उत्पादन नसल्याने बोंबील, पापलेटचा भाव वधारला आहे. दरम्यान डिसेंबर ते एप्रिल हा थंडीचा काळ मत्स्य उत्पादनासाठी ढिसाळ काळ मानला जातो. होळीनंतर मासे उत्पादनाला चांगला काळ येतो, मात्र या काळात ओएनजीसी सेसमिक आपला सर्वेक्षण सुरू करत असल्याने मासेमारीसाठी गेलेल्या बोटी हाकलून लावल्या जात असल्याचे मच्छीमार नेते अशोक अंभीरे यांनी सांगितले. त्यामुळे आता मच्छीमारांवर अस्मानी संकटानंतर सुलतानी संकट ओढवण्याची भीती व्यक्त केली आहे.सागराशी झुंज देऊन रात्रंदिवस पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणाऱ्या चिंचणी ते झाईपर्यंतच्या मच्छिमार समुद्रात मासे सापडत नसल्याने हवालदिल झाला आहे. बोंबीलसाठी भांगाची मासेमारी केली जाते. नवमी, सप्तमी, पंचमी, अष्टमी यामध्ये बोंबील मासेमारी केली जाते. सुक्या बोंबीलसाठी डहाणू प्रसिद्ध आहे.

डिसेंबर ते एप्रिल हा मासेमारीचा ढिसाळ हंगाम असतो. होळीनंतर मासेमारी केली जाते. डालडा मासेमारी पौर्णिमा व उधाणाला मासेमारी होते. यामध्ये मासे मिळतात. नुकसान भरपाई दिलेली नाही. डिसेंबरपासून एप्रिलपर्यंत उपजीविकेचे क्षेत्र बॅन करतात. त्यामुळे मासेमारांना मागे परतावे लागते. समुद्रात गेलेल्या बोटींना डिझेलचा खर्चही मिळत नाही. इंधन व मजुरीच्या दरात झालेली वाढ व मत्स्य उत्पादनात होणारी घट यामुळे हा व्यवसाय डबघाईला आला आहे.‘मासेमारीस उपयुक्त असलेल्या सुरुवातीच्या पहिल्या हंगामात वाळत ठेवलेल्या सुकी मासळीचे वादळे तसेच अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीमुळे मच्छीमार व्यावसायिकांचे कंबरडे मोडले आहे. अशातच ओएनजीसीसारख्या सरकारी कंपन्यांकडून अरबी समुद्रातील खनिज तेलसाठ्यांबाबत होत असलेल्या सर्वेक्षणामुळे मच्छीमार क्षेत्राच्या मर्यादा अटी-शर्तीच्या त्रांगड्यात अडकल्या आहेत.’ -अशोक अंभीरे, मच्छीमार नेते

टॅग्स :Vasai Virarवसई विरार