शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
2
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
3
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
4
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
5
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
6
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
7
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
8
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
9
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
10
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
11
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
12
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
13
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
14
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
17
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
18
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
19
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
20
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू

मच्छीमारांना मिळणार ६५ हजार कोटींचे अनुदान, खासदार राजेंद्र गावित यांच्या प्रयत्नांना यश

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2020 03:11 IST

मच्छीमारांचा मासेमारी हंगाम आॅगस्टपासून सुरू झाला असला, तरी लांबलेला पावसाळा, अवेळी पडलेला पाऊस व त्यानंतर क्यार चक्रीवादळाने थैमान घातले. ते संपते न संपते तोच फयान चक्रीवादळाने तडाखा दिला.

डहाणू : मागच्या वर्षी झालेला अवेळी पाऊस, चक्रीवादळांचा तडाखा आणि आता कोरोना संकटामुळे राज्यातील मच्छीमार संकटात सापडले आहेत. या मच्छीमारांना शासनाने मदतीचा हात द्यावा, यासाठी खा. राजेंद्र गावित यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मत्स्य व्यवसायमंत्री आणि मत्स्य व्यवसायविकास आयुक्तांबरोबर बैठका घेतल्याने त्यांच्या प्रयत्नांना यश येऊन अखेर राज्य सरकारने मच्छीमारांना ६५ हजार कोटींचे आर्थिक अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे.मच्छीमारांचा मासेमारी हंगाम आॅगस्टपासून सुरू झाला असला, तरी लांबलेला पावसाळा, अवेळी पडलेला पाऊस व त्यानंतर क्यार चक्रीवादळाने थैमान घातले. ते संपते न संपते तोच फयान चक्रीवादळाने तडाखा दिला. यामुळे मागच्या वर्षी बोटी बंदरातच राहिल्यामुळे मच्छीमारी होऊ शकली नाही. त्याचा फटका मच्छीमार व या व्यवसायावर अवलंबून असणाऱ्या हजारो कुटुंबांना बसला.यामुळे सरकारने मच्छीमारांनाही भरपाई द्यावी, अशी मागणी खा. गावित यांनी राज्य सरकारकडे केली होती.मच्छीमारांच्या शिष्टमंडळासमवेत मुख्यमंत्री, मंत्री, आयुक्त यांच्या भेटी घेतल्या होत्या. जानेवारीपासून थोडीफार मासेमारी होत असतानाच या वर्षीही मुंबईपासून ६० तर डहाणूपासून ३० नॉटिकल मैल परिघात, १० मार्च ते ५ मेपर्यंत ५७ दिवस ओएनजीसी तेल सर्वेक्षणामुळे या पट्ट्यातील मच्छीमारी बंद करण्यात आली होती. मागच्या वर्षीही ५२ दिवस मच्छीमारी बंद होती. यंदा कोरोनामुळे लॉकडाऊन असल्याने बोटी बंदरातच राहिल्याने मच्छीमारी बंद होती.पुरुषांनी सातआठ दिवसांसाठी समुद्रात जाऊन आणलेल्या माशांना गिºहाईक नाही. महिला ओले-सुके मासे विकत असतात. त्यावर त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होतो.अशा या मच्छीमारांना सरकारने नुकसानभरपाई देऊन, मदतीचा हात देण्याची नितांत आवश्यकता असल्याची मागणी खा. राजेंद्र गावित वारंवार करीत होते. अखेर, त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून यामुळे मच्छीमारांना दिलासा मिळणार आहे. 

टॅग्स :fishermanमच्छीमारpalgharपालघर