शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
4
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
5
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
6
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
7
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
8
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
9
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
10
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
11
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
12
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
13
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
14
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
15
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
16
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
17
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
18
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
19
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
20
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!

'मेकुनु’मुळे मच्छीमारांना दुहेरी फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2018 21:41 IST

वादळामुळे मासेमारीचे शेवटचे दिवस हातातून निसटल्याने आर्थिक फटका बसल्याने शेतकऱ्याप्रमाणोच आम्हालाही नुकसानभरपाई द्या.

नव्या नियमामुळे शुक्रवार 1 जूनपासून मासेमारीचा हंगाम बंद होतो आहे. मात्र मेकुनु वादळामुळे उत्तन, पाली, चौक भागातील मच्छीमार बोटी 25 मे पासूनच किनाऱ्यावर परतावे लागल्याने त्यांच्यावर हंगामाच्या शेवटी रिकाम्या हाताने घरी बसण्याची वेळ यंदा आली. सध्या बोटी किनाऱ्याला लावण्यासाठी मच्छीमारांची धावपळ सुरू आहे. वादळामुळे मासेमारीचे शेवटचे दिवस हातातून निसटल्याने आर्थिक फटका बसल्याने शेतकऱ्याप्रमाणोच आम्हालाही नुकसानभरपाई द्या, अशी मागणी मच्छीमारांनी केली.

भाईंदरच्या उत्तन, पाली, चौक किनारपट्टीवरील कोळीवाडय़ांमध्ये मासेमारी करणाऱ्या बोटी आहेत. पावसाळ्यासाठी 1 जूनपासून सरकार मासेमारीवर बंदी घालते. ही बंदी दोन महिने असेल आणि 1 ऑगस्टपासून त्यावेळचे हवामान पाहून मासेमारी बोटी समुद्रात जातील. 

1 जूनपासून मासेमारी बंदचा सरकारचा आदेश असला, तरी 23 ते 27 मे दरम्यानच्या मेकुनु वादळाच्या तडाख्यामुळे समुद्र खवळलेला होता. त्यामुळे हवामान खात्यासह मत्स्य विभागानेही मच्छीमारांना धोक्याचा इशारा दिला होता. परिणामी, हंगामातील शेवटची मासेमारी करण्यासाठी गेलेल्या मासेमारी बोटींना नाईलाजाने मागे फिरावे लागले. 31 मे ही मासेमारीची अंतिम मुदत असताना 25 मे पासूनच बोटी परतू लागल्या होत्या. चौक बंदर हे बोटी नांगरण्यासाठी सुरक्षित असल्याने बहुतांश बोटी याच बंदर परिसरात येतात. त्यामुळे सध्या येथे बोटी किनाऱ्याला खेचण्याचे काम मच्छीमारांनी सुरू केले आहे. ते एकत्र येऊन बोटी किनाऱ्याला ओढण्याचे काम करतातच पण सोबत क्रेनचीसुद्धा मदत घेतली जाते. 

तीन वेळा फटका

मासेमारीच्या एकूणच हंगामात तीन वेळा वादळ व वादळी पावसामुळे मासेमारीला चांगलाच फटका बसला. शेवटच्या टप्प्यात चांगली मासळी मिळावी, अशी मच्छीमारांची आशा असते. परंतु मेकुनु वादळामुळे मासेमारी आधीच बंद करावी लागल्याने मच्छीमारांचे मोठे नुकसान झाल्याचे मच्छीमार संस्थेचे विल्यम गोविंद म्हणाले. 

भरपाईपासून मच्छीमार वंचित

शेतकऱ्यांप्रमाणेच मच्छीमारांना नुकसानीची भरपाई मिळावी अशी सरकारकडे सतत मागणी करूनही न्याय मिळत नसल्याबद्दल विल्यम गोविंद यांनी नाराजी व्यक्त केली. बडय़ा उद्योजकांची हजारो कोटींची कर्ज माफ केली जातात. थकबाकीदार कोटय़वधी बुडवून परदेशात पळून जातात. पण मच्छीमारांना मात्र नुकसानभरपाईही मिळत नाही.

टॅग्स :fishermanमच्छीमार