शहरं
Join us  
Trending Stories
1
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
2
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
3
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
4
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
5
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
6
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
7
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
8
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
9
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
10
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
11
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
12
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
13
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
14
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
15
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
16
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
17
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
18
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
19
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
20
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद

पहिला राष्ट्रध्वज ३३ गडांवर फडकणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2017 05:28 IST

पालघर जिल्ह्यातील ३३ किल्ल्यांवर भारताच्या पहिल्या राष्ट्रध्वजास दुर्गमित्र मानवंदना देणार आहेत. दोन दिवस चालणाºया या मोहिमेची सुरुवात येत्या शनिवारी वसई किल्ल्यातील चिमाजी अप्पा स्मारकातून करण्यात येणार आहे.

शशी करपे वसई : पालघर जिल्ह्यातील ३३ किल्ल्यांवर भारताच्या पहिल्या राष्ट्रध्वजास दुर्गमित्र मानवंदना देणार आहेत. दोन दिवस चालणाºया या मोहिमेची सुरुवात येत्या शनिवारी वसई किल्ल्यातील चिमाजी अप्पा स्मारकातून करण्यात येणार आहे.किल्ले वसई मोहिम परिवाराने भारताच्या पहिल्या राष्ट्रध्वजाच्या स्मृती जपण्यासाठी व त्याला मानवंदना देण्याची मोहिम २००७ सालापासून सुरु केली आहे. यंदा यंदा त्याला ११० वर्षे पूर्ण होत आहे.वसई किल्ला, अर्नाळा किल्ला, वज्रगड, आगाशी कोट, मांडवी कोट, तुंगार दुर्ग, दहिसर कोट, घोडबंदर कोट, पारगाव कोट, विराथन कोट, दातिवरे बुरुज, हिरा डोंगरी दुर्ग, कोरे कोट, एडवण कोट, मथाणे कोट, भवानीगड, दांडा कोट, कित्तल कोट, केळवे कोट, तारापूर किल्ला, डहाणू किल्ल्यांवर त्याचा जयजयकार होईल. ३३ गडकोटांच्या प्रत्यक्ष भेटीच्या निमित्ताने त्या गडकोटांच्या प्राचीन व ऐतिहासिक इतिहासाला साद घालण्याची संधी दुर्ग प्रेमींना मिळणार आहे. दोन दिवसांच्या मोहिमेत इतिहास अभ्यासक श्रीदत्त राऊत मार्गदर्शन करणार आहेत.जगातील सर्व राष्ट्रांचे स्वत:चे राष्ट्र्ध्वज असून त्यांना जनमानसात स्वतंत्र मान आणि आदर आहे. भारतीयांनी ध्वज ही संकल्पना राबवली त्यावेळी तिरंगा ध्वज नव्हता. त्याला एका शतकापूर्वीची पार्श्वभूमी आहे.२२ आॅगस्ट १९०७ रोजी जर्मनमधील स्टुटगार्ट शहरात जागतिक समाजवादी परिषद भरली होती. त्यावेळी भारताच्या प्रतिनिधी म्हणून मादाम कामा हजर होत्या. मादम कामांनी युनियन जॅक न घेता आपल्या कल्पनेने साकार केलेला स्वतंत्र ध्वज भारताचा म्हणून सादर केला.मादाम कामा यांनी या आंतरराष्ट्रीय परिषदेत फडकवलेला ध्वज आद्य राष्ट्रध्वज मानला जातो. आॅगस्ट १९३७ मध्ये या ध्वजाचे भारतात आगमन झाले. पुण्यात पोचल्यानंतर राष्ट्रध्वजाची मिरवणूक काढण्यात आली होती. केसरीवाडा ते पुणे रेल्वे स्टेशन मार्गावर निघालेल्या मिरवणुकीत स्वातंत्र्यवीर सावकरही सहभागी झाले होते. ध्वजाच्या आरेखनात सावकरांचे योगदान होते. आजही हा ध्वज पुण्यात केसरीवाड्यात ठेवण्यात आलेला आहे.