शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, वाघा बॉर्डरवर रांगा...
4
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
5
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
6
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
7
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
8
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
9
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
10
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
11
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
12
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
13
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
14
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
15
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
16
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
17
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
18
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
19
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
20
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?

माध्यमिकचा पहिला दिवस स्वच्छतेचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2020 23:47 IST

शासकीय यंत्रणेचा गोंधळ

तलासरी : सोमवारपासून इयत्ता ९ वी ते १२ वी माध्यमिक शाळा सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला, पण सोमवारचा शाळांचा पहिला दिवस शाळा स्वच्छतेतच गेला. शाळा सुरू होणार म्हणून काही मुले शाळेत आली, पण ऐनवेळी त्यांना पुन्हा घरी पाठविण्यात आले. मात्र, शाळेत आलेल्या मुलांची संख्या ही अल्प होती. त्यामुळे शाळा सुरू झाली, तरी शाळेत किती मुले येतील, याबाबत शंकाच आहे.

माध्यमिक शाळा इयत्ता ९ वी ते १२ वीपर्यंत सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला, पण गोंधळलेल्या शासकीय यंत्रणेमुळे सोमवारचा दिवस मुलांना न शिकविता स्वच्छतेत गेला. सोमवारी शाळा भरविण्याच्या दृष्टिकोनातून शाळांची स्वच्छता करून सॅनिटायझरने फवारणी करून घेण्यात आली. काही शाळांनी मुलांना मास्कही वाटले, पण ऐनवेळी अधिकाऱ्यांचा  आदेश आला. शाळा भरविण्याच्या दृष्टीने सोमवारी नियोजन करा व मुलांना परत पाठवून द्या, असे सांगितल्याने आलेल्या मुलांना पुन्हा घरी पाठविण्यात आले. तलासरी तालुक्यातील शाळा सुरू होतील, पण शाळांत किती मुले उपस्थित राहतील, याबाबत शंका आहे. तलासरी भागातील विद्यार्थ्यांच्या पालकांची आर्थिक परिस्थिती बेताचीच असल्यामुळे सुट्टीमध्ये मुले काम करण्यास कारखान्यात जातात. सध्या कोरोनामुळे बालकामगार म्हणून गुजरातमधील कारखान्यात कामाला जात असल्याने त्या मुलांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणणे शिक्षकांना त्रासाचे जाणार आहे. शाळा सुरू करण्यासाठी शाळांना फवारणी केली, पण मुलांना शिकविणाऱ्या शिक्षकांची कोरोना चाचणी केव्हा होणार, मानधनावरील शिक्षकांच्या नेमणुका कधी होणार, मुलांच्या कोरोना चाचण्या या सगळ्यांचा विचार गोंधळलेली शासकीय यंत्रणा करणार आहे की नाही, हा प्रश्न नागरिकांनी विचारला आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारSchoolशाळा