शहरं
Join us  
Trending Stories
1
ड्रॅगनच्या डॅम योजनेला भारत मोठी टक्कर देणार! मोदी सरकारनं तयार केला 77 बिलियन डॉलरचा 'मास्टर प्लॅन'
2
"मी युद्ध सोडवण्यात तज्ज्ञ..." पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमा वादावर ट्रम्प यांचं भाष्य!
3
अभ्यासाला लागा! दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, असं आहे वेळापत्रक 
4
राज्यासमोर मोठं संकट! जगभरात थैमान घालणाऱ्या आजाराचा पहिला रुग्ण सापडल्याने खळबळ
5
SA W vs BAN W : निर्णायक षटकात अख्तरची धुलाई; रंगतदार सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं मारली बाजी
6
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती एकत्रित लढणार!
7
४८ तासात 'सोनेरी सफर'च्या दोन घटना उघड , रेल्वेच्या तपास यंत्रणा खडबडून जाग्या 
8
डिस्काउंटचा धमाका! १० हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळतायेत 'हे' जबरदस्त फोन
9
६००० रुपयांचा बोनस आणि...; एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी तिप्पट गोड!
10
Video: आधी कानाखाली मारल्या, नंतर धरली मान; मॅच सुरू असतानाच स्टेडियमध्ये 'बाई, काय हा प्रकार'
11
ठाणे-वसईकरांचे हाल! घोडबंदर मार्गावर चार-चार तास वाहतूक कोंडी
12
पाकिस्तानात शरणार्थी, मशिदीतून शिक्षणाची सुरुवात; तालिबानी परराष्ट्रमंत्री मुत्ताकी किती शिक्षित आहेत? जाणून घ्या...
13
ईतवारी एक्सप्रेसमध्ये सापडले सोन्याचे घबाड, एकाला अटक; साडेतीन कोटींचे सोने जप्त!
14
उल्हासनगर भाजपाकडून पाणी टंचाई विरोधात मोर्चा; योगेश म्हात्रे यांच्याकडून आत्महत्येचा प्रश्न 
15
"शेतकरी पॅकेज, कर्जमाफी, लाडकी बहीण या मुद्द्यांवर  महायुती सरकारकडून जनतेची फसवणूक’’, रमेश चेन्नीथला यांचा आरोप
16
"डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळावा म्हणून आम्ही..."; इस्रायलचे PM बेंजामिन नेतन्याहूंनी मानले ट्रम्प यांचे आभार
17
तेज प्रताप यादव यांनी २१ जागांवर उमेदवार उभे केले; स्वतः या जागेवरून निवडणूक लढवणार
18
अरे देवा हे काय, विद्यार्थ्यांच्या बॅगमध्येच कोयते-चॉपर! नाशिकमधील भाईगिरीचे 'फॅड' शाळेपर्यंत
19
मुंबईत ठाकरे बंधूंसोबत लढायचं की स्वतंत्रपणे? काँग्रेसच्या नेत्यांनी हायकमांडकडे केली अशी मागणी
20
सात दिवस उलटूनही IPS पूरन कुमार यांच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम नाही; पत्नीने केली मोठी मागणी...

जागोजागी पेटवल्या जात आहेत शेकोट्या; थंडीचा कडाका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2020 23:52 IST

चार - पाच दिवसांपासून वाढला गारवा

विक्रमगड : तालुक्यातील बहुतेक ठिकणची भात कापणीची कामे संपली असून भातामुळे वातावरणात उष्णतेचे प्रमाण निर्माण होत असते. परंतु आता थंडीचे दिवस आले असल्याने विक्रमगड तालुक्यात बोचऱ्या थंडीने शिरगाव केला आहे. तसेच दिवस लहान असल्याने रात्र लवकर होते आणि सकाळही लवकर होते. त्यामुळे तालुक्यातील घरांच्या खिडक्या व दरवाजे सकाळी उशिरापर्यंत तर संध्याकाळी लवकरच बंद होत असल्याचे दिसून येत आहे.

गेल्या चार-पाच दिवसांपासून विक्रमगड परिसरात थंडीचे प्रमाण वाढले आहे. दिवसभर देखील हवेत अंगावर रोमांच आणणारा गारवा जाणवतो आहे. तालुक्यात गेल्या चार-पाच दिवसांपासून थंडीची सरासरी वाढल्याने तापमानात घट झाली असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. थंडीमुळे तालुक्यातील दैनंदिन व्यवहार सकाळी उशिराने सुरू होऊन सायंकाळी लवकर बंद केले जात आहेत. रात्री ८ वाजल्यानंतर तालुक्यातील रस्ते सुनसान होत आहेत. तर जंगलपट्टी भागात तर सायंकाळी ६ वाजताच घराची दारे खिडक्या बंद केली जात आहेत.

थंडीपासून बचाव करण्यासाठी लहान मुले, स्त्रिया, पुरुष तसेच वृद्ध असे सारेच दिवसादेखील गरम कपडे परिधान करीत आहेत. थंडीमुळे पाण्याचा तापमानात मोठी घट झाली असल्याने सकाळी उठल्यावर तोंड धुण्यासाठी अथवा सायंकाळीही पाणी गरम करून घ्यावे लागते. तालुक्यातील ग्रामीण भागात सायंकाळी मोठ्या प्रमाणात शेकोट्या पेटवलेल्या दिसतात. त्यामुळे थंडीची तीव्रता अजूनही किती वाढणार आहे, याचा अंदाज बांधता येत नाही. कारण आताच तर थंडीला सुरु वात झाली आहे. बरीचशी मंडळी निसर्गातील वातावरणाचा आनंद लुटताना दिसतात. तर काहीजण सध्याच्या वातावरणाशी जुळवून घेत आहेत.