शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

जागोजागी पेटवल्या जात आहेत शेकोट्या; थंडीचा कडाका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2020 23:52 IST

चार - पाच दिवसांपासून वाढला गारवा

विक्रमगड : तालुक्यातील बहुतेक ठिकणची भात कापणीची कामे संपली असून भातामुळे वातावरणात उष्णतेचे प्रमाण निर्माण होत असते. परंतु आता थंडीचे दिवस आले असल्याने विक्रमगड तालुक्यात बोचऱ्या थंडीने शिरगाव केला आहे. तसेच दिवस लहान असल्याने रात्र लवकर होते आणि सकाळही लवकर होते. त्यामुळे तालुक्यातील घरांच्या खिडक्या व दरवाजे सकाळी उशिरापर्यंत तर संध्याकाळी लवकरच बंद होत असल्याचे दिसून येत आहे.

गेल्या चार-पाच दिवसांपासून विक्रमगड परिसरात थंडीचे प्रमाण वाढले आहे. दिवसभर देखील हवेत अंगावर रोमांच आणणारा गारवा जाणवतो आहे. तालुक्यात गेल्या चार-पाच दिवसांपासून थंडीची सरासरी वाढल्याने तापमानात घट झाली असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. थंडीमुळे तालुक्यातील दैनंदिन व्यवहार सकाळी उशिराने सुरू होऊन सायंकाळी लवकर बंद केले जात आहेत. रात्री ८ वाजल्यानंतर तालुक्यातील रस्ते सुनसान होत आहेत. तर जंगलपट्टी भागात तर सायंकाळी ६ वाजताच घराची दारे खिडक्या बंद केली जात आहेत.

थंडीपासून बचाव करण्यासाठी लहान मुले, स्त्रिया, पुरुष तसेच वृद्ध असे सारेच दिवसादेखील गरम कपडे परिधान करीत आहेत. थंडीमुळे पाण्याचा तापमानात मोठी घट झाली असल्याने सकाळी उठल्यावर तोंड धुण्यासाठी अथवा सायंकाळीही पाणी गरम करून घ्यावे लागते. तालुक्यातील ग्रामीण भागात सायंकाळी मोठ्या प्रमाणात शेकोट्या पेटवलेल्या दिसतात. त्यामुळे थंडीची तीव्रता अजूनही किती वाढणार आहे, याचा अंदाज बांधता येत नाही. कारण आताच तर थंडीला सुरु वात झाली आहे. बरीचशी मंडळी निसर्गातील वातावरणाचा आनंद लुटताना दिसतात. तर काहीजण सध्याच्या वातावरणाशी जुळवून घेत आहेत.