शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

अग्निशमने ७ वर्षांत विझविल्या ७५८ आगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2019 04:39 IST

ओपन स्पेस न सोडल्याने शमविणे अवघड : मिळेल त्या जागेत ज्वालाग्रही माल, रसायने साठविणे भोवते

पंकज राऊतबोईसर : महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाच्या (एमआयडीसी) तारापूर अग्निशमन दलाने मागील सात वर्षात औद्योगिक क्षेत्रासह संपूर्ण परिसरातील मोठ्या (भीषण), मध्यम व छोट्या (मायनर) स्वरूपाच्या अशा ७५८ आगी विझविल्या आहेत. हे दल तारापूर औद्योगिक क्षेत्र व परिसरातील सुमारे तीस ते चाळीस किलोमीटरच्या परीघातील आग विझविण्यासाठी धावून जात असते. यामध्ये मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर अपघातामुळे पेट्रोल, गॅस व इतर मालवाहतूक तसेच प्रवासी बससेवा लागलेल्या भीषण आगींचा समावेश असून या आगी जीव धोक्यात घालून विझविण्यात आल्या आहेत.

मागील सात वर्षात सुमारे ७५८ आगी लागल्या त्यामध्ये भीषण स्वरूपाच्या ६० आगीचा समावेश होता, यापैकी काही भीषण स्फोटाच्या घटना घडल्यानंतर आगी लागल्या होत्या. या मधील काही आगींचे स्वरूप तर भयावह होते. काही आगी नियंत्रणात आणण्याकरिता दहा ते पंधरा तास झुंजावे लागले तर आग नियंत्रणात आणल्यानंतर ही चार ते पाच दिवस घटनास्थळी दक्ष राहून कुलिंग व पुन्हा आगीची घटना घडू नये म्हणून तत्पर राहावे लागत होते निष्काळजी व हलगर्जीपणा, मानवी चूका तसेच यंत्रसामग्रीतील दोष व देखभाल व दुरु स्तीकडे होणारे अक्षम्य दुर्लक्ष इत्यादी कारणांमुळे या घटना घडत असतात. जिगरबाज अधिकारी व जवान हे प्राणपणाला लावून आगीवर नियंत्रण मिळवत असतांना काही वेळा जखमीही झाले होते.

फायरअ‍ॅक्ट व एमआयडीसीचे नियम धुडकाविल्याने तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीने जी मार्जिन स्पेस ठेवायला पाहिजे, ती ठेवली जात नसल्याने तसेच तीच्या चारही बाजूने पत्र्याची किंवा प्लॅस्टिकची शेड बांधून तेथे ज्वलनशील कच्च्या व पक्क्या मालाचे रसायनांनी भरलेले ड्रम ठेवण्यात येतात. त्यामुळे आग नियंत्रणात आणतांना खूप अडचणी निर्माण होतात. अनेकदा आग व स्फोटाच्या घटनेमध्ये तेथे काम करणारे मृत तर काही गंभीर जखमी झाले आहेत.

मागील वर्षीच्या ८ मार्चला नोवाफेना या रासायनिक कारखान्यातील भीषण स्फोट व त्या नंतर लागलेली आग नियंत्रणात आणण्यासाठी झुंज देतांना एकीकडे आग दुसरीकडे थोडया थोड्या वेळाने होणारे अनेक स्फोट तिसरी कडे उंच उडालेल्या पिंपातिल पेटत्या रसायनांचे लोळ त्या बरोबरच ती पेटती पिंप कधी आपल्या दिशेने येऊन अंगावर किंवा बंबावर पडतील याचा नेम नाही अशा भीषण परिस्थितीत या दलाच्या जवांनानी ही आग यशस्वीरित्या विझवीली होती, असे असले तरी या परीसरात सुसज्ज असे अग्निशमन दल तातडीने उभारण्याची गरज आहे. कारण वसई विरार, ठाणे कल्याण भिवंडी येथील अग्निशमन दल येण्यास बराच विलंब लागतो, त्यात जिवीत आणि वित्तहानीही होते.उद्योगांना भरपाई, मृत वा जखमी कामगारांच्या कुटुंबाचे काय?च्आग विझविण्या करीता आता पर्यत लाखो लीटर पाणी व फोम चा वापर करण्यात आला या मधे उद्योगांचे करोडो रूपयांचे नुकसान झाले अनेक निष्पाप कामगारांचे बळी गेले काही कायमचे अपंग झाले.च्उद्योगांचे आर्थिक नुकसान विम्याद्वारे भरून निघते परंतु मृत कामगारांच्या कुटुंबाला मिळणारी रक्कम ही तुटपूंजी असते त्यामुळे त्याच्या कुटुंबाला आर्थिक संकटाला सामोरे जावे लागते. म्हणूनच स्फोट व आगीच्या घटना घडू नयेत. या करीता सर्वोतोपरी काळजी घेणे गरजेचे आहे२०१२ ते १८ या सात वर्षातील घटना२०१२ १२७२०१३ १११२०१४ ११६२०१५ ११०२०१६ १००२०१७ ८७२०१८ १०७758एकूण 

टॅग्स :Vasai Virarवसई विरार