शहरं
Join us  
Trending Stories
1
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
2
"लाडली, लक्ष्मी, बहीण..."; निवडणूक वर्षात महिलांसाठी रोख रकमेचा महापूर; सरकारं घाट्यात! आरबीआयनं दिलाय मोठा इशारा 
3
मिर्झापूरजवळ भीषण अपघात; रेल्वे रुळ ओलांडताना 'कालका मेल'खाली चिरडून ६ भाविकांचा मृत्यू
4
Sonam Raghuvanshi : ना कागद, ना कापड... राजा रघुवंशीच्या हत्येनंतर धूर्त सोनमने कसे पुसले हत्यारावरचे रक्ताचे डाग?
5
SBI ची नोकरी सोडून सुरू केली शेती, आज ७ कोटींच्या हेलिकॉप्टरचा मालक! ५ एकरापासून सुरुवात
6
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
7
"तुम्हाला अपेक्षित असलेलं उत्तर मिळू शकत नाही"; मतदार याद्यांच्या वादावरून CM फडणवीसांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर
8
काँग्रेससाठी टीव्ही डिबेट करणारी भाव्या निघाली लष्करी अधिकारी; 'डबल रोल' करणारी कोण आहे ही...
9
मानव-बिबट्या संघर्षावर सरकारचे निर्णायक पाऊल; मनुष्यहानी रोखायला प्राधान्य, ११ कोटी मंजूर
10
'संबंध ठेवण्यापूर्वी कुंडली जुळवायची होती!'; पोलिस अधिकाऱ्यांच्या हायप्रोफाईल प्रकरणावर सुप्रीम कोर्टाची उपरोधिक टिप्पणी
11
"होनराव म्हणजे तू मराठी ना? तुझी बायको भैयिणी...", कमेंट वाचून मराठी अभिनेत्याचा संताप, म्हणाला...
12
जगातील टेक उद्योगात उलथापालथ: ॲमेझॉन, गूगल नंतर आता 'या' कंपनीच्या हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
13
"माझ्यापेक्षा मोठा गुंड नाही"; भाजपाच्या आजी-माजी खासदारांमध्येच जुंपली, एकमेकांना भिडले अन्...
14
Zohrab Mamdani: न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
15
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
16
“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीमध्ये समन्वय साधून अंतिम निर्णय”: सुनील तटकरे
17
Vijay Mallya : 'जप्त केलेल्या मालमत्ता आणि थकीत कर्जाची माहिती द्या,' विजय माल्ल्यानं न्यायालयात काय म्हटलं?
18
Astrology: नशिबात नसलेल्या गोष्टीही स्वामीकृपेने मिळवता येतात का? ज्योतिष शास्त्र काय सांगते? पाहू
19
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?

अर्नाळा घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पातील आगीमुळे प्रदूषण; आरोग्य धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2020 00:58 IST

पर्यटक व अर्नाळावासीयांचा जीव घुसमटला

विरार : अर्नाळा घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पात लावण्यात येणाऱ्या आगीमुळे प्रदूषण होत असल्याने समुद्रकिनारी येणारे पर्यटक आणि परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

अर्नाळा ग्रामपंचायतीचा घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प अर्नाळा समुद्रकिनाऱ्याला लागून आहे. ग्रामपंचायत हद्दीतून जमा होणारा कचरा या प्रकल्पात आणला जातो. या कचऱ्यातून निघणारे प्लास्टिक वेगळे करून या ठिकाणी बसवण्यात आलेल्या मशीनमध्ये त्याचे विघटन केले जाते. मात्र, अन्य कचरा याच ठिकाणी साठवला जात असल्याने त्याचा मोठा ढीग साचलेला आहे. या परिसरात येणाऱ्या अपप्रवृत्तीच्या लोकांकडून या कचऱ्याला आग लावण्यात येते, अशी माहिती या प्रकल्पात काम करणारे कर्मचारी देतात.

हा प्रकल्प संध्याकाळी ५ नंतर बंद होत असल्याने आग लावण्याचे प्रकार रात्रीच्या वेळेत घडतात; परिणामी ही आग दुसऱ्या दिवशीपर्यंत धुमसत राहते. रात्रीच्या वेळेत हे प्रकार घडत असल्याने आग कोण लावते, याची माहिती मिळत नाही, असे या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र, या आगीमुळे मोठ्या प्रमाणात वायुप्रदूषण होत असल्याने या ठिकाणी येणारे पर्यटक आणि परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार