शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

अर्नाळा घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पातील आगीमुळे प्रदूषण; आरोग्य धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2020 00:58 IST

पर्यटक व अर्नाळावासीयांचा जीव घुसमटला

विरार : अर्नाळा घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पात लावण्यात येणाऱ्या आगीमुळे प्रदूषण होत असल्याने समुद्रकिनारी येणारे पर्यटक आणि परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

अर्नाळा ग्रामपंचायतीचा घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प अर्नाळा समुद्रकिनाऱ्याला लागून आहे. ग्रामपंचायत हद्दीतून जमा होणारा कचरा या प्रकल्पात आणला जातो. या कचऱ्यातून निघणारे प्लास्टिक वेगळे करून या ठिकाणी बसवण्यात आलेल्या मशीनमध्ये त्याचे विघटन केले जाते. मात्र, अन्य कचरा याच ठिकाणी साठवला जात असल्याने त्याचा मोठा ढीग साचलेला आहे. या परिसरात येणाऱ्या अपप्रवृत्तीच्या लोकांकडून या कचऱ्याला आग लावण्यात येते, अशी माहिती या प्रकल्पात काम करणारे कर्मचारी देतात.

हा प्रकल्प संध्याकाळी ५ नंतर बंद होत असल्याने आग लावण्याचे प्रकार रात्रीच्या वेळेत घडतात; परिणामी ही आग दुसऱ्या दिवशीपर्यंत धुमसत राहते. रात्रीच्या वेळेत हे प्रकार घडत असल्याने आग कोण लावते, याची माहिती मिळत नाही, असे या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र, या आगीमुळे मोठ्या प्रमाणात वायुप्रदूषण होत असल्याने या ठिकाणी येणारे पर्यटक आणि परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार