शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

निष्प्रभ उपकरणांमुळे मोहिनी आॅर्गेनिक्सला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 01:18 IST

तारापूर एमआयडीसी मधील मोहिनी आॅर्गेनिक्स या कारखान्यात असलेली अग्नीशमन यंत्रणा पुरेशी नव्हती त्यामुळेच ही आग भडकली, असे निष्पन्न झाले आहे.

पंकज राऊतबोईसर : तारापूर एमआयडीसी मधील मोहिनी आॅर्गेनिक्स या कारखान्यात असलेली अग्नीशमन यंत्रणा पुरेशी नव्हती त्यामुळेच ही आग भडकली, असे निष्पन्न झाले आहे.स्पेशॅलिटी केमिकल्स आॅइल बेसचे उत्पादन करणाºया या करखान्यामधील थर्मिक फ्ल्युइल्ड हिटर या प्रकारच्या बॉयलर मधून आगीची छोटी ज्वाळा निघाली ती आग विझविण्याचा प्रयत्न उपस्थित दोन कर्मचाºयांनी उपलब्ध फायर फायिटंगच्या उपकरणाद्वारे केला, तो अपयशी ठरला. त्यामुळे आगीने अल्पवधीत रौद्ररूप धारण केले. ही उपकरणे प्रभावी असती तर आग तत्काळ आटोक्यात आली असती. सोमवारी संध्याकाळी लागलेल्या भीषण आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन जवानांना सात तास झुंज द्यावी लागली तर पहाटे पर्यंत आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू होते. मात्र दुपारपर्यंत कारखान्यातून निघणाºया धुरांवर पाणी फवारणीचे काम सुरु च होते.या आगीमध्ये हा कारखाना व यंत्रसामग्री आणि कच्चा व पक्का माल संपूर्ण जाळून खाक झाला असून मोठे नुकसान झाल्याचा दावा करण्यात येतो आहे. असा प्राथमिक अंदाज आहे. आगीमध्ये मनिंदर कुशवाह हा कामगार किरकोळ भाजला असल्याचे व्यवस्थापनातर्फे तर तीस टक्के भाजल्याचे औद्योगिक सुरक्षा विभागाच्या अधिकाºयांनी सांगितले.भ्रमणध्वनी ऐवजी दिला टेलिफोन नंबर : औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचानालयाचे डेप्युटी डायरेक्टर पी.ए. पाटील व बिनताळे रात्री पासून घटनास्थळी उपस्थित होते. आज घटनास्थळी आलेले डेप्युटी डायरेक्टर एस जी धवड यांनी पत्रकारांना आगीचे प्राथमिक कारण आणि आगी संदर्भात माहिती देण्यास दुपारी एकच्या सुमारास असमर्थता दर्शविली. त्यांचा मोबाइल नंबर मागितला असता वसई कार्यालयाचा टेलिफोन क्रमांक देण्याचे उपस्थित सहकाºयांना सांगून त्यावर संपर्क साधण्यास सांगितले तर शासनाने आपल्याला भ्रमणध्वनी पुरविला नसल्याने त्याचा क्र मांक देण्यासही नकार दिला. तो पर्यंत धवड यांनी जखमी कामगाराची भेटही घेतली नव्हती. अशा घटना घडू नये या करिता उपाय योजना करण्यात दिरंगाई करणारे अधिकारी घटनेचे कागदी घोडे रंगविण्यात मग्न दिसत होतेल्युपिनने पाणी पुरविल्याने विझवता आली आगही आग विझविण्याकरीता तारापूर अग्निशमन दलाचे चार, तर तारापूर बी.ए.आर.सी., डहाणू रिलायन्स एनर्जी, वसई - विरार महानगरपालिका व पालघर नगरपालिका इत्यादीचे प्रत्येकी एक असे एकूण आठ बंब व त्यांचे पन्नास कर्मचारी, जवान यांनी जीव धोक्यात घालून आगीशी झुंज दिली .आग विझविण्यासाठी साठी मोठ्या प्रमाणात पाण्याची गरज भासत असल्याने टँकरद्वारे पाणी आणले गेले तर एमआयडीसी च्या फायर हायड्रेनट लाईन मधून पुरेशा दाबाने पाणी येत नसल्याने आग विझविण्यासाठी ल्युपिन लिमिटेड या कंपनीने मोठया प्रमाणात पाणी उपलब्ध करून दिल्याने आग विझविण्यास मदत झाल्याचे तारापूरचे अग्निशमन अधिकारी आनंद परब यांनी पत्रकारांना सांगितले.या कारखान्याच्या लगत असलेले श्रीनाथ केमिकल्स, मीनार केमिकल्स, बर्फ कंपनी हे कारखाने आगीपासून वाचविण्यास अग्निशमन दलास यश आले मात्र प्रिमियम इंटरमीडिएट या कंपनीच्या काहीसा भागापर्यंत आग पोहचून त्यांचे नुकसान झाले. मात्र मुख्य कंपनीपर्यंत आग पोहचू न दिल्याने अनर्थ टळला.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार