शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

निष्प्रभ उपकरणांमुळे मोहिनी आॅर्गेनिक्सला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 01:18 IST

तारापूर एमआयडीसी मधील मोहिनी आॅर्गेनिक्स या कारखान्यात असलेली अग्नीशमन यंत्रणा पुरेशी नव्हती त्यामुळेच ही आग भडकली, असे निष्पन्न झाले आहे.

पंकज राऊतबोईसर : तारापूर एमआयडीसी मधील मोहिनी आॅर्गेनिक्स या कारखान्यात असलेली अग्नीशमन यंत्रणा पुरेशी नव्हती त्यामुळेच ही आग भडकली, असे निष्पन्न झाले आहे.स्पेशॅलिटी केमिकल्स आॅइल बेसचे उत्पादन करणाºया या करखान्यामधील थर्मिक फ्ल्युइल्ड हिटर या प्रकारच्या बॉयलर मधून आगीची छोटी ज्वाळा निघाली ती आग विझविण्याचा प्रयत्न उपस्थित दोन कर्मचाºयांनी उपलब्ध फायर फायिटंगच्या उपकरणाद्वारे केला, तो अपयशी ठरला. त्यामुळे आगीने अल्पवधीत रौद्ररूप धारण केले. ही उपकरणे प्रभावी असती तर आग तत्काळ आटोक्यात आली असती. सोमवारी संध्याकाळी लागलेल्या भीषण आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन जवानांना सात तास झुंज द्यावी लागली तर पहाटे पर्यंत आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू होते. मात्र दुपारपर्यंत कारखान्यातून निघणाºया धुरांवर पाणी फवारणीचे काम सुरु च होते.या आगीमध्ये हा कारखाना व यंत्रसामग्री आणि कच्चा व पक्का माल संपूर्ण जाळून खाक झाला असून मोठे नुकसान झाल्याचा दावा करण्यात येतो आहे. असा प्राथमिक अंदाज आहे. आगीमध्ये मनिंदर कुशवाह हा कामगार किरकोळ भाजला असल्याचे व्यवस्थापनातर्फे तर तीस टक्के भाजल्याचे औद्योगिक सुरक्षा विभागाच्या अधिकाºयांनी सांगितले.भ्रमणध्वनी ऐवजी दिला टेलिफोन नंबर : औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचानालयाचे डेप्युटी डायरेक्टर पी.ए. पाटील व बिनताळे रात्री पासून घटनास्थळी उपस्थित होते. आज घटनास्थळी आलेले डेप्युटी डायरेक्टर एस जी धवड यांनी पत्रकारांना आगीचे प्राथमिक कारण आणि आगी संदर्भात माहिती देण्यास दुपारी एकच्या सुमारास असमर्थता दर्शविली. त्यांचा मोबाइल नंबर मागितला असता वसई कार्यालयाचा टेलिफोन क्रमांक देण्याचे उपस्थित सहकाºयांना सांगून त्यावर संपर्क साधण्यास सांगितले तर शासनाने आपल्याला भ्रमणध्वनी पुरविला नसल्याने त्याचा क्र मांक देण्यासही नकार दिला. तो पर्यंत धवड यांनी जखमी कामगाराची भेटही घेतली नव्हती. अशा घटना घडू नये या करिता उपाय योजना करण्यात दिरंगाई करणारे अधिकारी घटनेचे कागदी घोडे रंगविण्यात मग्न दिसत होतेल्युपिनने पाणी पुरविल्याने विझवता आली आगही आग विझविण्याकरीता तारापूर अग्निशमन दलाचे चार, तर तारापूर बी.ए.आर.सी., डहाणू रिलायन्स एनर्जी, वसई - विरार महानगरपालिका व पालघर नगरपालिका इत्यादीचे प्रत्येकी एक असे एकूण आठ बंब व त्यांचे पन्नास कर्मचारी, जवान यांनी जीव धोक्यात घालून आगीशी झुंज दिली .आग विझविण्यासाठी साठी मोठ्या प्रमाणात पाण्याची गरज भासत असल्याने टँकरद्वारे पाणी आणले गेले तर एमआयडीसी च्या फायर हायड्रेनट लाईन मधून पुरेशा दाबाने पाणी येत नसल्याने आग विझविण्यासाठी ल्युपिन लिमिटेड या कंपनीने मोठया प्रमाणात पाणी उपलब्ध करून दिल्याने आग विझविण्यास मदत झाल्याचे तारापूरचे अग्निशमन अधिकारी आनंद परब यांनी पत्रकारांना सांगितले.या कारखान्याच्या लगत असलेले श्रीनाथ केमिकल्स, मीनार केमिकल्स, बर्फ कंपनी हे कारखाने आगीपासून वाचविण्यास अग्निशमन दलास यश आले मात्र प्रिमियम इंटरमीडिएट या कंपनीच्या काहीसा भागापर्यंत आग पोहचून त्यांचे नुकसान झाले. मात्र मुख्य कंपनीपर्यंत आग पोहचू न दिल्याने अनर्थ टळला.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार