शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
4
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
5
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
6
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
7
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
8
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
9
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
10
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
11
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
12
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
13
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
14
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
15
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
16
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
17
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
18
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
19
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
20
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

अखेर लोकशक्ती एक्स्प्रेसला उंबरगाव स्थानकात थांबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2019 23:25 IST

सीमा भागात प्रवाशांचा जल्लोष : रहिवाशांकडून होणार स्वागत सोहळा ; पालघर, गुजरात, राजस्थानच्या खासदारांचे प्रयत्न फळाला

- अनिरुद्ध पाटील

डहाणू : पश्चिम रेल्वेच्या उंबरगाव रेल्वे स्थानकात रविवार, २४ फेब्रुवारीपासून लोकशक्ती एक्स्प्रेसला एका मिनिटाचा थांबा पुढील सहा महीने प्रयोगिक तत्वावर दिला जाणार आहे. हे स्थानक महाराष्ट्र गुजरात या सीमा भागात असून या सुविधेमुळे प्रवाशी समाधानी असून एका कार्यक्र माच्या आयोजनातून हा आनंदोत्सव साजरा केला जाणार आहे.

पश्चिम रेल्वेच्या बांद्रा टर्मिनल्स ते अहमदाबाद दरम्यान लोकशक्ती एक्स्प्रेस धावते. ही क्र मांक २२९२७ ची गाडी बांद्रा येथून सुटल्यानंतर विविध स्टेशन घेत डहाणू रोड स्थानकात रात्री दहाच्या सुमाराला पोहाचते. त्यानंतर थेट वापी स्थानकात थांबात होती. मात्र रविवार, २४ फेब्रुवारीपासून १०:१६ वाजता उंबरगाव स्थानकात पोहचल्यानंतर एक मिनिटभर थांबून पुढे जाणार आहे. तर क्र मांक २२९२८ ही अहमदाबाद स्थानकाहून सुटल्यानंतर पहाटे ३:२३ वाजता या स्थानकात पोहचल्यावर मिनिटभर थांबणार आहे. मागील एका दशकांपेक्षा अधिक काळापासून या गाडीला थांबा मिळावा म्हणून स्थानिकांनी लिखित सामूहिक निवेदनं रेल्वे प्रशासनाला दिली आहेत.हे स्थानक दोन्ही राज्यांच्या सीमेवर आहे. उंबरगाव हे औद्योगिक शहर असून मुंबई आणि उपनगरहून अनेक कामगार येथे येतात. शिवाय येथे समुद्र किनाऱ्यालगत वृंदावण स्टुडिओ असून पौराणकि चित्रपट व मालिकांकरीता बॉलीवूड मध्ये प्रसिद्ध आहे.

रात्री व पहाटेच्या शूटिंगकरिता बाहेरून येणाºया कलाकार-तंत्रज्ञांना त्याचा फायदा होणार आहे. तर सर्वाधिक फायदा तलासरी तालुक्यातील आदिवासी बांधवांना होणार आहे. कारण डहाणू रोड रेल्वे स्थानकापेक्षा हे जवळचे व सोयीचे आहे. रात्री ९:२० च्या सुमारास मुंबईहून येणारी बलसाड फास्ट पॅसेंजर येथे थांबते.

त्यानंतर रात्री अडीचच्या सुमारास विरमगाम पॅसेंजर थांबते. त्यामुळे डहाणू रोड स्थानकापर्यंत उपनगरीय सेवा असली तरी तलासरीतील नागरिकांना त्याचा म्हणावा तसा उपयोग होत नाही. त्यामुळे आता मोठ्या प्रमाणात सुशिक्षित आदिवासी बांधव मुंबईकडे नोकरीकरिता जाऊन रात्री घरी पोहचू शकतात. नोकरीकरीता होणारे आदिवासींचे स्थलांतर थांबण्यास त्याचा हातभार लागू शकतो.दरम्यान, स्थानिकांप्रमाणेच उंबरगाव इंडस्ट्रियल असोसिएशनचे गिरीश राव, साहिर व्होरा, प्रशांत कारु ळकर यांनी रेल्वे मंत्रालयाला लिखित निवेदने दिली.सामूहिक प्रयत्नांना यश, रोजगारांचा प्रश्न मार्गीगुजरातचे खासदार डॉ. के. सी. पटेल, राजस्थानचे खासदार देवजी पटेल, मंत्री रमण पाटकर, पालघर खासदार राजेंद्र गावीत, आमदार पास्कल धणारे यांनी प्रयत्न केले. या सामूहिक प्रयत्नांचे हे फलित असल्याची स्थानिकांची भावना आहे.याचा स्थानिकांना लाभ होणार असून अनेक शिक्षित तरु ण नोकरी करिता बाहेर पडतील असे अनिलकुमार पांडे म्हणाले तर उंबरगाव इंडस्ट्रियल असोसिएशनच्या माध्यमातून या बाबत रेल्वे मंत्रालयाला निवेदनं देण्यात आल्याचे प्रशांत कारूळकर म्हणाले.