शहरं
Join us  
Trending Stories
1
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
2
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
3
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
4
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
5
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
6
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
7
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
8
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
9
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
10
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
11
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
12
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
13
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
14
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
15
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
16
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
17
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
18
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
19
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
20
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले

मिठागरावर मातीचा भराव : वसई महापालिकेवर हायकोर्टाचे ताशेरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2017 05:37 IST

दिवाणमान येथील मीठागराच्या जागेवर मातीचा भराव करून त्याठिकाणी बांधकाम करणाºया वसई विरार महापालिकेवर मुंबई हायकोर्टाने ताशेरे मारले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कवसई : दिवाणमान येथील मीठागराच्या जागेवर मातीचा भराव करून त्याठिकाणी बांधकाम करणाºया वसई विरार महापालिकेवर मुंबई हायकोर्टाने ताशेरे मारले आहेत. याप्रकरणी काय कारवाई केली याची जागेवर जाऊन पाहणी करून माहिती सादर करण्याचे निर्देशही हायकोर्टाने महापालिका आयुक्तांना दिले आहेत.वसई युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुलदीप वर्तक यांनी तक्रार केल्यानंतर वसई पश्चिमेला दिवाणमान येथील सरकारी मालकीच्या सर्व्हे क्रमांक १७६ व १७६ अ या मिठागर असलेल्या खाजण जमिनीवर २०१५ मध्ये महापालिकेने ठेकेदारामार्फत ४ हजार ३८० ब्रास मातीचा भराव केल्याचे तलाठ्याच्या पंचनाम्यानंतर उजेडात आले होते. याप्रकरणी तहसिलदारांनी महापालिका आणि ठेकेदाराविरोधात जमीन हस्तांतरण कायद्यांतर्गत बेकायदा माती भराव केल्याप्रकरणी १ कोटी ५ लाख रुपये दंडाची नोटीसह बजावली होती. महापालिका अथवा ठेकेदाराने अद्याप दंडाची रक्कम भरलेली नाही. याबाबत विभागीय कोकण आयुक्तांनीही दंडाची रक्कम जमा करण्याचे आदेश दिले होते.महसूल खात्याकडून कोणतीच कारवाई करण्यात येत नसल्याने कुलदीप वर्तक यांनी मुंबई हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली आहे. माती भराव हटवण्यात यावा आणि संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आलेली आहे. या भरावामुळे लोकवस्ती असलेल्या परिसरात पावसाचे पाणी साचून लोकांची गैरसोय होत असल्याची बाब अ‍ॅड. इंद्रजित कुलकर्णी यांनी हायकोर्टाच्या निदर्शनास आणून दिली. त्यावेळी न्यायमूर्ती नरेश पाटील व न्यायमूर्ती राजेश केतकर यांच्या खंडपीठाने महापालिकेने काय कारवाई केली.महापालिका आयुक्तांना जागेची पाहणी करण्याचेही बजावण्यात आले आहे. याबाबत माहिती देण्याचे आदेश दिले.वसई तहसिल कार्यालयाची परवानगी न घेताच बेकायदा माती भराव करून सरकारी भूखंडावर बांधकाम केल्याप्रकरणी महापालिका आता अडचणीत सापडली आहे.

टॅग्स :Courtन्यायालयVasai Virarवसई विरार