शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
9
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
10
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
11
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
12
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
13
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
14
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
15
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
16
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
17
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
18
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
19
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
20
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  

समेळ पाड्यातील मुख्य खाडीवर भराव; पालिका कारवाई करणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2019 00:42 IST

नालासोपारा पुन्हा जलमय होणार

नालासोपारा : शहरातील पश्चिमेकडील भागातील पावसाळी पाण्याचा निचरा करणाऱ्या मुख्य खाडीवर (नाल्यावर) भराव टाकल्यामुळे नालासोपारा पुन्हा जलमय होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याच ठिकाणी बाजार भरवण्यात येणार असल्याचा फलकही लावण्यात आला होता. तो महापालिकेने काढला असला तरीही बिनधास्तपणे भरणी कशी काय करण्यात आली? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.

गेल्या तीन-चार वर्षापासून पावसाळ्यात वसई तालुका जलमय होत आहे. पावसाळी पाण्याचा निचरा करणाºया खाड्या, मोठे नाले यांची पावसाळ्यापूर्वी सफाई करण्यात आली नाही. तसेच काही खाड्यांवर भराव टाकण्यात आल्यामुळे वसईकरांवर पूरस्थिती ओढवली होती. यानंतर वसई तालुका यापुढे जलमय होणार नाही, अशी ग्वाही आमदार हितेंद्र ठाकूर यांनी दिली होती. मात्र ठाकूर यांच्या या आश्वासनाला त्यांच्याच पदाधिकाऱ्यांनी गालबोट लावले असल्याचे बोलले जात आहे.

नालासोपारा पश्चिमेकडील मुख्य खाडीवर एका बांधकाम व्यावसायिकाने भराव टाकून आपल्या कार्यालयापर्यंत जाण्यासाठी रस्ता तयार केला आहे. या प्रकाराची माहिती देऊनही महापालिकेकडून कोणतीच कारवाई करण्यात आली नाही. या जागेवर आठवडा बाजार आणि खाऊ गल्ली सुरू करण्याचे जाहीर करून तसा फलकही या ठिकाणी लावण्यात आला. यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

नालासोपारा पूर्व आणि पश्चिम तसेच विरारमधील पावसाळी पाण्याचा निचरा करणाºया समेळपाडा येथील या मुख्य खाडीवर सोपारा मुख्य रस्त्यावरील पुलापासून समेळपाडा नवीन स्मशानभूमीच्या पूर्व बाजूपर्यंत सुमारे दहा फूट रुंद आणि शंभर फूट लांबीचा भराव करण्यात आला आहे. त्यामुळे पावसाळ्यात नालासोपारा शहर जलमय होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याबाबत ई प्रभाग समितीचे सभापती अतुल साळुंखे यांची प्रतिक्रि या विचारण्यासाठी तीन वेळा फोन केला, परंतु त्यांनी फोन न उचलल्याचे त्यांची प्रतिक्रि या मिळू शकली नाही.

याबाबत मला माहिती मिळाल्यावर बाजाराचा लावण्यात आलेला बोर्ड काढून टाकला असून सदर ठिकाणी कोणी भरणी केली याचा शोध घेत आहे. ज्याने कोणी मातीची भरणी केली आहे त्याच्यावर कारवाई करणार आहोत. -रागेश राठोड, सहाय्यक आयुक्त,ई प्रभाग, वसई विरार महापालिका)

टॅग्स :Vasai Virarवसई विरार