शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याचं टायमिंग अनेकांना न पटण्यासारखे; 'त्या' ३ तासांत काय घडले?
2
एकदा- दोनदा नाही, एअर इंडियाला सहा महिन्यात ९ कारणे दाखवा नोटीस बजावल्या; सरकारची माहिती
3
४ मुलांच्या आईनं २४ वर्षाच्या युवकाशी केलं कोर्ट मॅरेज; पतीनं सोडला सुटकेचा नि:श्वास, म्हणाला...
4
जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय
5
आजचे राशीभविष्य, २२ जुलै २०२५: 'या' २ राशींसाठी लाभदायी दिवस, अचानक धनलाभ होईल
6
'आम्ही अणुकार्यक्रम सुरूच ठेवणार', युरोपीय देशांशी चर्चेपूर्वी इराणचा अमेरिकेला संदेश
7
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
8
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
9
एअर इंडिया विमानाचे तीन टायर फुटले; विमानतळावर लँडिंगच्या वेळी पावसामुळे विमानाने धावपट्टी सोडली
10
मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंना सुनावले; जे काही घडले ते भूषणावह नाही!
11
ब्रिगिट मॅक्रॉन ‘पुरुष’? खटले आणि वादांना ऊत! दाव्याची सत्यता काय?
12
अंधेरी मेट्रो स्थानकात गळती; पाणी गोळा करण्यासाठी बादल्यांचा वापर
13
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
14
परिचारिकांच्या संपामुळे पाच दिवसांपासून रुग्णांचे हाल; नियमित शस्त्रक्रियाही पूर्णपणे बंद
15
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!
16
सोळावे वरीस... धोक्याचे नव्हे, निवडणुकीत मत देण्याचे! ब्रिटनचा धाडसी निर्णय; युवाशक्ती लोकशाहीत सहभागी!
17
शेअर ट्रेडिंगच्या बहाण्याने वृद्धेसह पायलटला १० कोटींचा गंडा; बनावट ॲपचा वापर करून लावला चुना
18
६३ खासदार म्हणतात, न्या. वर्मांना पदावरून हटवा! कारण काय?
19
संपादकीय : नामुष्कीचा बॉम्ब, १९ वर्षांनंतरही पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह
20
महाराष्ट्रातील ४ लाख शेतकरी लाभार्थी यादीतून झाले गायब; लाभार्थी १०.२ लाखांवरून केवळ १५ हजारांवर

वसई पूर्व भागात पाचव्यांदा पूरस्थिती; तानसाने धोक्याची पातळी ओलांडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2019 23:20 IST

मेढे-पांढरतारा पूल ७ वेळा पाण्याखाली

पारोळ : गणेशोत्सवात, कोसळणाऱ्या पावसामुळे तानसा नदीने धोक्याची पातळी गाठली असून पांढरतारा, मेढे पूल पाण्याखाली गेल्याने या भागातील १२ गावांचा संपर्क तुटला आहे. तानसा नदीचे पाणी या भागातील शेतांमध्ये धुसल्याने या परिसरातील शेकडो हेक्टर जमीन पाण्याखाली जाऊन पूरिस्थती निर्माण झाली तर मेढे ,पांढरतारा पूल या पावसाळ्यात ७ वेळा पाण्याखाली गेला आहे. तर या पूरामुळे गाभा धरलेल्या भात पीक पाण्याखाली गेल्याने पिकांना धोका निर्माण झाला आहे.

तानसा धरण परिसरात पाऊस मोठ्या प्रमाणात झाल्याने ही तानसा नदी धोक्याची पातळी ओलांडूली तसेच रविवारी भरतीची पाणी ही तानसा नदीत उलट बाजूने आल्याने पाण्याची पातळी वाढून हे दोन पूल पाण्याखाली गेल्याने भाताणे, आडणे, नवसई, थळ्याचापाडा, मेढे, आंबोडे, वडघर, कळंभोंण, आदी १२ गावांचा संपर्क तुटला, तर शिरवली, पारोळ, शिवणसई, चांदीप, मांडवी, कोपर, खानीवडे, खारटतारा, घाटेघर, सायवन या गावांच्या पाण्याने वेढले पण रविवारी पावसाने उसंत घेतल्याने पाणी पाण्याची पातळी कमी झाल्याने झाली.

गणेशोत्सवाच्या दिवसात हे पूल पाण्याखाली गेल्याने अनेकांना गणेश दर्शनासाठी बाहेर न जाता आल्याने रविवार घरीच बसून काढावा लागला. या भाग तुंगारेश्वर अभयअरण्यलगत असल्याने अरण्यातून येणारे ओहळ तानसा नदीला मिळत असल्याने या मुळे पाण्याची पातळी वाढत असल्याने ही या परिसरात जास्त पाऊस झाल्यास पूरिस्थती निर्माण होते. असल्याचे या भागातील नागरिकांनी सांगितले.