शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
3
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
4
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
5
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
6
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
7
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
8
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
9
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
10
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
11
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
12
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
13
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
14
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
15
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
16
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
17
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
18
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
19
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात तीन महिन्यांपासून खतांचा तुटवडा; शेतकरी चिंतेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 01:25 IST

पालघर जिल्ह्यातील आठ तालुक्यांत खरिपातील भात पिकांचे अवकाळी पावसाने नुकसान झाल्याने त्याची सारी भिस्त आता रब्बी हंगामातील उत्पादनावर आहे, मात्र जिल्ह्यात तीन महिन्यांपासून खताचा तुटवडा भासत आहे.

- हितेन नाईक/अनिरुद्ध पाटीलपालघर/बोर्डी : पालघर जिल्ह्यातील आठ तालुक्यांत खरिपातील भात पिकांचे अवकाळी पावसाने नुकसान झाल्याने त्याची सारी भिस्त आता रब्बी हंगामातील उत्पादनावर आहे, मात्र जिल्ह्यात तीन महिन्यांपासून खताचा तुटवडा भासत आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील मिरची, भाजीपाला आणि वेलवर्गीय उत्पादन तसेच उन्हाळी भातपिकावर त्याचा परिणाम होणार आहे. मात्र जिल्ह्याला १७ हजार टन युरिया खत मिळाल्याचे कृषी विभागाचे म्हणणे असल्याने मग हा खताचा साठा गेला कुठे, असा प्रश्न शेतकरी वर्गाकडून उपस्थित केला जात आहे.पालघर जिल्ह्यातील आठ तालुक्यांत ७५ हजार ६६८.३४ हेक्टर क्षेत्र लागवडीखाली आहे. त्यातील ७९,८५६ हेक्टर एवढ्या क्षेत्रावर भात, नागली, वरई, तूर आदींसह वेलवर्गीय उत्पादने घेतली जातात. जिल्ह्यात ७५६६८.३४ हेक्टर भात क्षेत्रापैकी ७९८५६ हेक्टर क्षेत्रावर प्रत्यक्ष भात लागवड करण्यात आली. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातात आलेले भातपिकांचे उत्पादन अगदीच नगण्य होते. हीच परिस्थिती नागली, वरई, तूर अशा पिकांसंदर्भात होती.अवकाळी पावसाने घास हिरावून घेतल्याने जिल्ह्यातील शेतकरी संकटात सापडला होता. आता शेतकरी रब्बी हंगामाकडे वळला आहे, मात्र उत्पादनवाढीसाठी अत्यावश्यक असलेल्या युरिया खतांचा पुरवठा तीन महिन्यांपासून उपलब्ध झालेला नाही. मात्र १७ हजार टन युरियाचा पुरवठा झाल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे. त्यामुळे खताचा कृत्रिम तुटवडा निर्माण केल्याचा आरोप होत आहे.एकीकडे शेतकऱ्यांचे विविध गट आणि पिकांचे क्लस्टर करण्यासाठी राज्य शासनाकडून शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले जाते. त्यामुळे मागील काही वर्षांत कृषी क्षेत्रात सकारात्मकता निर्माण होऊन या क्षेत्रातील अवलंबित्व आणि गुंतवणूक वाढली आहे. शेतकऱ्यांच्या बांधावर बियाणे, खते मिळू लागली. हे आश्वस्त करणारे चित्र असताना, ऐन हंगामात पालघर जिल्ह्यात खतांचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामागे जिल्हा कृषी विभागाकडून नियोजन का केले गेले नाही, हा प्रश्न उपस्थित होत आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी