शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

जिल्ह्यात तीन महिन्यांपासून खतांचा तुटवडा; शेतकरी चिंतेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 01:25 IST

पालघर जिल्ह्यातील आठ तालुक्यांत खरिपातील भात पिकांचे अवकाळी पावसाने नुकसान झाल्याने त्याची सारी भिस्त आता रब्बी हंगामातील उत्पादनावर आहे, मात्र जिल्ह्यात तीन महिन्यांपासून खताचा तुटवडा भासत आहे.

- हितेन नाईक/अनिरुद्ध पाटीलपालघर/बोर्डी : पालघर जिल्ह्यातील आठ तालुक्यांत खरिपातील भात पिकांचे अवकाळी पावसाने नुकसान झाल्याने त्याची सारी भिस्त आता रब्बी हंगामातील उत्पादनावर आहे, मात्र जिल्ह्यात तीन महिन्यांपासून खताचा तुटवडा भासत आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील मिरची, भाजीपाला आणि वेलवर्गीय उत्पादन तसेच उन्हाळी भातपिकावर त्याचा परिणाम होणार आहे. मात्र जिल्ह्याला १७ हजार टन युरिया खत मिळाल्याचे कृषी विभागाचे म्हणणे असल्याने मग हा खताचा साठा गेला कुठे, असा प्रश्न शेतकरी वर्गाकडून उपस्थित केला जात आहे.पालघर जिल्ह्यातील आठ तालुक्यांत ७५ हजार ६६८.३४ हेक्टर क्षेत्र लागवडीखाली आहे. त्यातील ७९,८५६ हेक्टर एवढ्या क्षेत्रावर भात, नागली, वरई, तूर आदींसह वेलवर्गीय उत्पादने घेतली जातात. जिल्ह्यात ७५६६८.३४ हेक्टर भात क्षेत्रापैकी ७९८५६ हेक्टर क्षेत्रावर प्रत्यक्ष भात लागवड करण्यात आली. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातात आलेले भातपिकांचे उत्पादन अगदीच नगण्य होते. हीच परिस्थिती नागली, वरई, तूर अशा पिकांसंदर्भात होती.अवकाळी पावसाने घास हिरावून घेतल्याने जिल्ह्यातील शेतकरी संकटात सापडला होता. आता शेतकरी रब्बी हंगामाकडे वळला आहे, मात्र उत्पादनवाढीसाठी अत्यावश्यक असलेल्या युरिया खतांचा पुरवठा तीन महिन्यांपासून उपलब्ध झालेला नाही. मात्र १७ हजार टन युरियाचा पुरवठा झाल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे. त्यामुळे खताचा कृत्रिम तुटवडा निर्माण केल्याचा आरोप होत आहे.एकीकडे शेतकऱ्यांचे विविध गट आणि पिकांचे क्लस्टर करण्यासाठी राज्य शासनाकडून शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले जाते. त्यामुळे मागील काही वर्षांत कृषी क्षेत्रात सकारात्मकता निर्माण होऊन या क्षेत्रातील अवलंबित्व आणि गुंतवणूक वाढली आहे. शेतकऱ्यांच्या बांधावर बियाणे, खते मिळू लागली. हे आश्वस्त करणारे चित्र असताना, ऐन हंगामात पालघर जिल्ह्यात खतांचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामागे जिल्हा कृषी विभागाकडून नियोजन का केले गेले नाही, हा प्रश्न उपस्थित होत आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी