शहरं
Join us  
Trending Stories
1
Nashik: अखेर नाशिक शिंदेंच्या शिवसेनेकडेच, हेमंत गोडसे यांची उमेदवारी जाहीर 
2
ठाण्यात नरेश म्हस्केंचा विजय होईल, राजन विचारे ८ वर्ष गायब होते; मनसेचा टोला
3
परत ईडीची नोटीस येईल, २०२४ मध्ये अजित पवारांनी पुन्हा दैवत बदललेले असेल; राऊतांचे संकेत
4
Godrej Family Split: १२७ वर्षांनंतर होणार 'गोदरेज'च्या साम्राज्याची वाटणी; पाहा कोणाला काय मिळणार?
5
गाझामध्ये दिसला अमेरिकेचे सर्वात धोकादायक बॉम्बर एअरक्राफ्ट! एकाच वेळी 16 अणुबॉम्बसह करू शकते उड्डाण
6
अचानक बेपत्ता झाली होती बॉलिवूड अभिनेत्री; ११ महिन्यांनी सापडला हाडांचा सांगाडा
7
पालघरची जागा भाजपाने घेतली; बावनकुळे-भुजबळांचा शिंदेंना संदेश, नाशिकचे ठरवा...
8
Maruti Suzuki Swift Booking : फक्त 11,000 रुपयांत करू शकता मारुती सुझुकी स्विफ्टचे बुकिंग; 'या' दिवशी येणार बाजारात
9
Bansuri Swaraj : 84 लाखांची कार, 3 फ्लॅट्स अन् बरंच काही...; बांसुरी स्वराज यांची किती आहे संपत्ती?
10
‘मी राजकारणात पॉलिसी मेकिंगसाठी आले आहे’, टीकाकारांना सुप्रिया सुळे यांनी दिलं प्रत्युत्तर
11
दिल्लीतल्या ६० शाळा बॉम्बने उडवून देण्याची धमकी; गृहमंत्रालयाने दिली महत्त्वाची सूचना
12
"राहुल गांधींनी अमेठीतून नावाची घोषणा केली नाही तर मी..."; काँग्रेस नेत्याने उचललं टोकाचं पाऊल
13
महाराष्ट्र दिनानिमित्त पूजा सावंतची खास पोस्ट, "छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती ऑस्ट्रेलियात..."
14
T20 World Cup: बलाढ्य ऑस्ट्रेलियाने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्या खेळाडूला मात्र डच्चू
15
दिल्लीत काँग्रेसला धक्का! आधी लवली यांनी प्रदेशाध्यक्षपद सोडले, आता दोन माजी आमदारांचा राजीनामा 
16
Rule Change: LPG सिलिंडरच्या दरापासून ते क्रेडिट कार्ड बिल पेमेंटपर्यंत; आजपासून झाले 'हे' ५ मोठे बदल
17
"होय, छगन भुजबळांचा नावाचा प्रस्ताव होता पण तडजोडीत ही जागा शिवसेनेला गेली"
18
दिल्ली, नोएडात खळबळ! एकाचवेळी ५० शाळांना बॉम्ब ठेवल्याचे मेल; विद्यार्थ्यांना सोडले
19
Fact Check : राहुल गांधींनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला?; जाणून घ्या 'त्या' व्हायरल Video मागचं 'सत्य'
20
Fact Check: राहुल गांधींना अमेठीतून, तर प्रियंका गांधींना रायबरेलीतून उमेदवारी दिल्याचं ते पत्र खोटं; जाणून घ्या सत्य

जिल्ह्यातील शेकोटी संस्कृती लोप पावण्याची भीती; मोबाइलमध्ये जातो जास्त वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2020 12:10 AM

पूर्वीच्या काळी थंडी बोचरी असल्याने गावात जवळपास प्रत्येक घरासमोर, अंगणात किंवा नाक्यांवर शेकोट्या पेटवल्या जात असत.

पाराेळ : जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यात गावोगावी थंडीच्या दिवसांत मोठ्या प्रमाणात शेकोट्या पेटवल्या जात असत. एकत्र बसून शेकोटीची ऊब घेण्याबरोबरच तेथे जमलेल्या ग्रामस्थांच्या दिवसभरातील कामे, शेती, घरातील सुखदु:ख या विषयावर चर्चा रंगत असत. गावातील एकोप्याचे दर्शन यातून घडत असे. पण, गेल्या काही दिवसांत शेकोटीसाठी सहज उपलब्ध न होणारे सरपण आणि नागरिकांचा मोबाइल, लॅपटॉप यासारख्या उपकरणांत जाणारा अतिरिक्त वेळ यामुळे गावागावांतील शेकोट्यांचे प्रमाण आता कमी होते आहे. येत्या काळात ही शेकोटी संस्कृती हळूहळू लोप पावण्याची भीती व्यक्त होत आहे.

पूर्वीच्या काळी थंडी बोचरी असल्याने गावात जवळपास प्रत्येक घरासमोर, अंगणात किंवा नाक्यांवर शेकोट्या पेटवल्या जात असत. पण, आता गावपाड्यांवरची घरेही सजवलेली आहेत. पूर्वी अंगण शेणामातीने सारवलेले दिसे. आता नवनवीन फरशा बसवलेल्या दिसतात. अंगणातील फरशीचे नुकसान होऊ नये म्हणूनही या शेकोट्या जास्त पेटवल्या जात नाही. त्यातच शेकोटीसाठी लागणारे सरपण जंगलातूनही फारसे मिळत नाही. त्यामुळेही त्या कमी झाल्या आहेत. या शेकोट्यांभोवती जमून ग्रामस्थांच्या गप्पा रंगायच्या. मात्र, आता रिकाम्या वेळात प्रत्येक जण हातातील मोबाइलमध्ये दंग दिसतो. तरुणाई तर मिळेल त्या रिकाम्या वेळेत मोबाइलमध्येच डोकेे घालून बसते.

यापूर्वी ऑक्टोबरमध्ये सुरू होणारी थंडी निसर्गाचा समतोल बिघडल्याने आता डिसेंबर महिन्यात थोडी जाणवू लागली आहे. परिणामी, त्या थंडीचा नागरिक आनंद घेत आहेत. मात्र, शेकोट्यांचे प्रमाण जिल्ह्यातील गावागावांतून कमी होत असल्याची खंत वयस्कर लोक व्यक्त करत आहेत.