शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

परतीच्या पावसाने पेंढ्यांचे भाव घसरल्याने शेतकरी चिंताग्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2020 23:51 IST

विक्रमगड तालुक्यात अनेक वर्षांपासून गवत- खरेदीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जात आहे.

विक्रमगड : तालुक्यात भातशेतीबरोबरच माळरानात शेतामध्ये गवतही मोठ्या प्रमाणात उगवते. शेतकरी, शेतमजूर हे गवत व त्याचबरोबर भातझोडपणी करून राहत असलेल्या पेंढ्यांची (पाओलीची) विक्री करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत असतात. विक्रमगड तालुका हा गवत-पेंढा खरेदी करण्याचे कोठार समजले जाते. या गवत पाओलीच्या वखारी तालुक्यात नोव्हेंबरअखेरीस काही भागात सुरू झाल्या असून त्याला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी मात्र नाराज झाले आहेत. पाओलीला व गवताला योग्य भाव देण्याची मागणी शेतक-यांकडून केली जाऊ लागली आहे. या वर्षी उशिराने नोव्हेंबरशेवटी वखारी सुरू झाल्याने गवत पाओली खरेदीविक्रीला जोर आला असला, तरी तालुक्यात गवताला पाच हजार रुपये टन भाव देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

विक्रमगड तालुक्यात अनेक वर्षांपासून गवत- खरेदीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जात आहे. वाडा, जव्हार, पालघर, डहाणू तालुक्यांतून मोठ्या प्रमाणात शेतकरी गवत पाओली विकण्यासाठी विक्रमगड तालुक्यातील वखारीत आणतात. गेल्या वर्षी तालुक्यात गवत व पाओली खरेदीच्या २५ वखारी सुरू होत्या. यावर्षी त्याची संख्या कमी होऊन सातआठ वखारी सुरू आहेत. या वखारीतील गवताला योग्य भाव नसल्याने वखारीमालक गवत वखारीत साठवणूक करून ठेवत असतात. पावसाळ्यात गवताच्या गठड्यांना मोठी मागणी व योग्य भाव असल्याने वखारीमालक दूध व्यवसाय करणाऱ्या तबेल्यांना विक्री करतात. यावर्षी पावसाळ्यादरम्यान वखारी बंद होत्या. त्यामुळे आम्हाला तोट्यात जावे लागले, असे वखारमालकांचे म्हणणे आहे. यापूर्वी आदिवासी विकास महामंडळाने गवत-पाओलीला एकाधिकारी खरेदी केली होती, परंतु त्यांना योग्य प्रतिसाद न मिळाल्याने ही खरेदी केंद्रे बंद करण्यात आली आहे. आता खाजगी व्यापारी हा व्यवसाय करीत आहेत.

इतर तालुक्यांच्या तुलनेत कमी भावविक्रमगडमध्ये सद्य:स्थितीत व्यापारी शेतकऱ्यांना पाओलीला २२०० ते २५०० रुपये टन भाव देत असून गेल्या वर्षी पाओलीला टनाला ३५०० ते ४००० हजार भाव मिळत होता. या वर्षी पाऊस लांबल्याने व परतीच्या पावसाने पाओली कुजल्याने भाव घसरला असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. इतर तालुक्यांतील काही भागात पाओलीला टनाला ३००० ते ३२०० रुपये टन भाव दिला जात आहे. मात्र, विक्रमगड तालुक्यात टनाला २२०० ते २५०० रुपये भाव देत असल्याने तालुक्यातील शेतकरी नाराज झाले आहेत.

वाढती महागाई तसेच शेती अवजारे, खते, बियाणे यांचे भाव, मजुरांची मजुरी वाढली आहे. भातालाही योग्य भाव नसल्याने पाओलीला साधारण ४००० रु. टन भाव व्यापारीवर्गाने द्यावा. -ज्ञानेश्वर जाधव, शेतकरी, विक्रमगड

यावर्षी परतीचा पाऊस ऑक्टोबरपर्यंत लांबला. त्यामुळे शेतीचे नुकसान केले. पाओली खरेदी करणा-या व्यापारीवर्गाने सहानुभूतीपूर्वक विचार करून पाओलीला भाव वाढवून द्यावा. -प्रमोद पाटील, सामाजिक कार्यकर्ता

टॅग्स :Farmerशेतकरी