शहरं
Join us  
Trending Stories
1
एका रात्रीत मोठा गेम! महायुतीचेच ३ माजी आमदार भाजपा फोडणार?; स्थानिक कार्यकर्तेच संतापले
2
क्रिकेटमधील पराभव जिव्हारी लागला, १०० च्या स्पीडने कार पळवली; दिवाळीची खरेदी करणाऱ्यांना चिरडले
3
ट्रेनमधील पांढऱ्या बेडशीट्स विसरा; भारतीय रेल्वे आता देणार खास प्रिंटेड कव्हर ब्लँकेट्स !
4
दिवाळीत ₹6 लाख कोटींची विक्रमी उलाढाल; भारतीयांची 'Made In India' वस्तूंना पसंती
5
कोण आहे फ्रांसेस्का ऑर्सिनी? ज्यांच्याकडे ५ वर्षाचा ई-व्हिसा असूनही भारतात प्रवेश नाकारला
6
Crime: आधी हात-पाय बांधले, नंतर उशीनं तोंड दाबलं...; व्यसनमुक्ती केंद्रातील घटनेनं खळबळ!
7
ODI Record: वनडेमध्ये आतापर्यंत कधीच 'असं' घडलं नव्हतं, ते वेस्ट इंडीजनं केलं!
8
सोलापूरात भाजपात दुफळी! "बाहेरून येणाऱ्यांनी किमान ३-४ वर्ष पक्षाचं काम करावं, त्यानंतरच.."
9
मोठी बातमी! १२ हजार भावांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ; १६४ कोटींचा घोटाळा आला समोर
10
मुहूर्त ट्रेडिंग: शेअर बाजारात तेजी; निफ्टी वर्षाच्या सर्वोच्च पातळीवर, सेन्सेक्स 62 अंकांनी वधारला
11
Mumbai Fire: माजी उपमहापौर अरुण देव यांच्या अंधेरी येथील घराला आग
12
२० एकर जमिनीसाठी लेकीने आईचा घेतला बळी, पतीच्या मदतीने मृतदेह रिक्षात भरला अन् तितक्यात...
13
BCCI: "आशिया चषक भारताला न दिल्यास..." बीसीसीआयचा मोहसिन नक्वी यांना इशारा!
14
अमित शाह यांच्यावर गंभीर आरोप, प्रशांत किशोर यांनी दाखवला फोटो; जनसुराजच्या उमेदवाराचं अपहरण?
15
अमेरिकेचा 88 लाखांचा H-1B व्हिसा आजपासून लागू; भारतीयांना मोठा दिलासा...
16
Beed: फटाका विझलाय समजून पुन्हा पेटवायला गेला अन्...; बीडमध्ये सहा वर्षांच्या मुलासोबत भयंकर घडलं!
17
"तात्या विंचू तुम्हाला चावेल...", संजय राऊतांच्या टीकेवर महेश कोठारेंची प्रतिक्रिया, म्हणाले- "ते माझ्याविषयी जे बोलले..."
18
Alyssa Healy : बॅक टू बॅक सेंच्युरी, तरीही स्टार्कच्या बायकोवर आली बाकावर बसण्याची वेळ; कारण...
19
Bhai Dooj 2025: भाऊबीजेसाठी पार्लर ग्लो फक्त चार स्टेप मध्ये! तोही घरच्या साहित्यात, चेहऱ्यावर आणा नैसर्गिक तेज!
20
"मला तू आवडत नाहीस, कधीच आवडणार नाहीस"; व्हाईट हाऊसमध्ये राडा, ऑस्ट्रेलियन राजदूताला ट्रम्प यांचा टोला

परतीच्या पावसाने पेंढ्यांचे भाव घसरल्याने शेतकरी चिंताग्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2020 23:51 IST

विक्रमगड तालुक्यात अनेक वर्षांपासून गवत- खरेदीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जात आहे.

विक्रमगड : तालुक्यात भातशेतीबरोबरच माळरानात शेतामध्ये गवतही मोठ्या प्रमाणात उगवते. शेतकरी, शेतमजूर हे गवत व त्याचबरोबर भातझोडपणी करून राहत असलेल्या पेंढ्यांची (पाओलीची) विक्री करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत असतात. विक्रमगड तालुका हा गवत-पेंढा खरेदी करण्याचे कोठार समजले जाते. या गवत पाओलीच्या वखारी तालुक्यात नोव्हेंबरअखेरीस काही भागात सुरू झाल्या असून त्याला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी मात्र नाराज झाले आहेत. पाओलीला व गवताला योग्य भाव देण्याची मागणी शेतक-यांकडून केली जाऊ लागली आहे. या वर्षी उशिराने नोव्हेंबरशेवटी वखारी सुरू झाल्याने गवत पाओली खरेदीविक्रीला जोर आला असला, तरी तालुक्यात गवताला पाच हजार रुपये टन भाव देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

विक्रमगड तालुक्यात अनेक वर्षांपासून गवत- खरेदीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जात आहे. वाडा, जव्हार, पालघर, डहाणू तालुक्यांतून मोठ्या प्रमाणात शेतकरी गवत पाओली विकण्यासाठी विक्रमगड तालुक्यातील वखारीत आणतात. गेल्या वर्षी तालुक्यात गवत व पाओली खरेदीच्या २५ वखारी सुरू होत्या. यावर्षी त्याची संख्या कमी होऊन सातआठ वखारी सुरू आहेत. या वखारीतील गवताला योग्य भाव नसल्याने वखारीमालक गवत वखारीत साठवणूक करून ठेवत असतात. पावसाळ्यात गवताच्या गठड्यांना मोठी मागणी व योग्य भाव असल्याने वखारीमालक दूध व्यवसाय करणाऱ्या तबेल्यांना विक्री करतात. यावर्षी पावसाळ्यादरम्यान वखारी बंद होत्या. त्यामुळे आम्हाला तोट्यात जावे लागले, असे वखारमालकांचे म्हणणे आहे. यापूर्वी आदिवासी विकास महामंडळाने गवत-पाओलीला एकाधिकारी खरेदी केली होती, परंतु त्यांना योग्य प्रतिसाद न मिळाल्याने ही खरेदी केंद्रे बंद करण्यात आली आहे. आता खाजगी व्यापारी हा व्यवसाय करीत आहेत.

इतर तालुक्यांच्या तुलनेत कमी भावविक्रमगडमध्ये सद्य:स्थितीत व्यापारी शेतकऱ्यांना पाओलीला २२०० ते २५०० रुपये टन भाव देत असून गेल्या वर्षी पाओलीला टनाला ३५०० ते ४००० हजार भाव मिळत होता. या वर्षी पाऊस लांबल्याने व परतीच्या पावसाने पाओली कुजल्याने भाव घसरला असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. इतर तालुक्यांतील काही भागात पाओलीला टनाला ३००० ते ३२०० रुपये टन भाव दिला जात आहे. मात्र, विक्रमगड तालुक्यात टनाला २२०० ते २५०० रुपये भाव देत असल्याने तालुक्यातील शेतकरी नाराज झाले आहेत.

वाढती महागाई तसेच शेती अवजारे, खते, बियाणे यांचे भाव, मजुरांची मजुरी वाढली आहे. भातालाही योग्य भाव नसल्याने पाओलीला साधारण ४००० रु. टन भाव व्यापारीवर्गाने द्यावा. -ज्ञानेश्वर जाधव, शेतकरी, विक्रमगड

यावर्षी परतीचा पाऊस ऑक्टोबरपर्यंत लांबला. त्यामुळे शेतीचे नुकसान केले. पाओली खरेदी करणा-या व्यापारीवर्गाने सहानुभूतीपूर्वक विचार करून पाओलीला भाव वाढवून द्यावा. -प्रमोद पाटील, सामाजिक कार्यकर्ता

टॅग्स :Farmerशेतकरी