शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

फळबागायती किडीच्या विळख्यात, जिल्ह्यातील शेतकरी चिंताग्रस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2020 01:46 IST

चिकू, नारळ, आंबा तसेच केळी, पेरू, सफेद जांबू यांवर स्पायरेलींग व्हाईट फ्लायचा प्रादुर्भाव वाढल्याने आगामी काळात फळगळ होऊन उत्पादन घटण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

अनिरूद्ध पाटील बोर्डी : जिल्ह्यातील प्रमुख फळबागायतीतील चिकू, नारळ, आंबा तसेच केळी, पेरू, सफेद जांबू यांवर स्पायरेलींग व्हाईट फ्लायचा प्रादुर्भाव वाढल्याने आगामी काळात फळगळ होऊन उत्पादन घटण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, तत्काळ उपाययोजना सुचविण्याची मागणी होत असून याबाबत कोसबाड कृषी विज्ञान केंद्राकडून शेतकरी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.अतिवृष्टी, पावसाचा वाढलेला कालावधी, अवकाळी पाऊस आणि या काळात हवेतील आद्रतेचे प्रमाण वाढल्याने जिल्ह्यातील फळबागायतीत विविध रोगांमुळे झाडांची रोगप्रतिकारक शक्ती कमी झाली आहे. येथे चिकू, नारळ, आंबा, सफेद जांबू, केळी, पेरू या फळ पिकांची लागवड आठही तालुक्यात असून त्यांच्या पानांवर स्पार्कल व्हाईट फ्लायचा प्रादुर्भाव दिसतो आहे. नारळ आणि केळी पिकावरील ही वाढ चिंताजनक आहे. पानांच्या खालच्या भागात राहून पानातील अन्नरस शोषून घेतल्याने ती पिवळी होऊन खाली पडतात. त्यामुळे फळांचा आकार लहान होण्यासह फळगळतीचा धोका उद्भवू शकतो. तसे झाल्यास उत्पादनात घट होऊन मोठ्या आर्थिक नुकसानीची शक्यता आहे. यासाठी डहाणू तालुक्यातील नरपड गावचे प्रगतीशील शेतकरी देवेंद्र राऊत यांनी मार्गदर्शनाची गरज व्यक्त केली आहे.दरम्यान, कोसबाड कृषी विज्ञान केंद्रात याबाबत शेतकरी मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले असून आगामी काळात विविध गावांमध्ये हे प्रशिक्षण शिबिर घेण्यात येणार आहे. जिल्ह्यात नव्याने आढळलेल्या या स्पायरेलींग व्हाईट फ्लाय या किडीच्या नियंत्रणासाठी शेतकऱ्यांनी बागेमध्ये लेडी बर्ड बिटल, क्र ायसोपा अशा मित्र किडींचं संवर्धन करावे. झाडांवर बुरशीची वाढ होऊन काळपट झाल्यास कपडे धुण्याच्या पावडरीचे ५ टक्के द्रावण किंवा २ ग्रॅम स्टार्च प्रती लिटर पाण्यात टाकून फवारणी करावी. निंबोळी तेल किंवा करंज तेल २.५ टक्के किंवा निंबोळी बियांचा अर्क५ टक्के यापैकी कोणतीही फवारणी करता येऊ शकते. जैविक किटकनाशकापैकी लिकॅनिसिलीयम लिकॅनी या बुरशीची ५ ग्रॅम प्रती लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करण्यासह, तीव्र प्रादुर्भाव झाल्यास लॅमडा सायलोथ्रीन ५ टक्के प्रवाही १ मिलि प्रती लिटर पाणी, प्रोफेनॉस, इमिडाक्लोप्रीड.०.५ मिलि प्रती लीटर पाणी, सायपरमेथ्रीन यापैकी कोणतेही एक कीटकनाशक पानाच्या खालील बाजूस फवारणी आवश्यक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. तर नारळासोबत आता अन्य होर्टिकल्चर पिके आणि वृक्षांवर तसेच शोभेच्या झाडांवरही याचा प्रादुर्भाव वाढत आहे.>किडीसंबंधी नियोजन आवश्यकसर्व पिकांवर आणि सर्व भागात ही कीड पसरली आहे. या किडीसंबंधी माहिती जाणून घेण्यासह नियोजन गरजेचे आहे.या किडीचे व्यवस्थापन एका किटकनाशकाने होणे कठीण आहे. जोपर्यंत नैसर्गिक मित्र किटकांची संख्या वाढत नाही, तोवर केवळ किटकनाशक फवारून नियंत्रण करणे अवघड आहे. याकरिता जैविक पद्धतीचा अवलंब करावा असे आवाहन कोसबाड कृषी विज्ञान केंद्राचे किटकशास्त्रज्ञ उत्तम सहाणे यांनी केले आहे.>शेतकºयांनी सामूहिक पद्धतीने या किडीचे नियंत्रण करावे. यासाठी जिल्ह्यातील सर्व कृषि संबंधित यंत्रणांनी योग्य समन्वय ठेऊन कीड नियंत्रणासाठी व्यापक जनजागृती अभियान राबविल्यास किडीचे जलद गतीने नियंत्रण होईल.-प्रा. विलास जाधव(प्रमुख शास्त्रज्ञ,कोसबाड कृषी विज्ञान केंद्र, डहाणू)जिल्ह्यातील सर्वच बागायतीवर या किडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळे पाने आणि फळगळती होऊन उत्पादनात घट होऊन आर्थिक फटका बसू शकतो. याकरिता मार्गदर्शन आवश्यक आहे.- देवेंद्र गोविंद राऊत (शेतीनिष्ठ शेतकरी,नरपड, डहाणू )