शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
2
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
3
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
4
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
5
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
6
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
7
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
8
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
9
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
10
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
11
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
12
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
13
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
14
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
15
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
16
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं
17
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
18
बोगस खेळाडू आढळल्यामुळे वय निश्चितीची अट; शालेय क्रीडा स्पर्धांपासून मुले राहताहेत वंचित
19
'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
20
Upcoming Smartphones: वनप्लस १५, विवो एक्स ३०० आणि बरंच काही; ऑक्टोबरमध्ये लॉन्च होत आहेत 'हे' ६ फोन!

विक्रमगडमधील शेतकरी वळतोय भाजीपाला पिकांकडे

By admin | Updated: January 5, 2016 00:52 IST

पारंपरिक भात व नाचणीच्या शेतीने वारंवार दगा दिल्यानंतर विक्रमगड तालुक्यातील बळीराजा आता हिवाळ्यातील रब्बी हंगामाकडे वळला आहे.

तलवाडा : पारंपरिक भात व नाचणीच्या शेतीने वारंवार दगा दिल्यानंतर विक्रमगड तालुक्यातील बळीराजा आता हिवाळ्यातील रब्बी हंगामाकडे वळला आहे. काहींनी वीटभट्टी व्यवसाय किंवा शहराकडे जाऊन मोलमजुरीचा मार्ग निवडला असला तरी काही गावांमध्ये भाजीपाला लावल्याचे दिसत आहे.पावसाळ्यात पेरणी, भाताची लावणी व अन्य मशागतीची कामे करून भातकापणी आटोपली की, पुन्हा त्यांचे डोळे खरीप हंगामाकडे लागलेले असायचे़ कारण, खरीप हंगामच त्याला जीवाभावाची साथ होती़ मात्र, अलीकडच्या दोन-चार वर्षांत शेतकरी थोडा आधुनिकतेच्या जगात वावरू लागला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांप्रमाणेच पाण्याची योग्य अशी सोय असलेल्या शेतात हिवाळी हंगामात पालेभाज्या घेण्यात येत आहे. ़विहीर, नदी, नाले यातील पाण्याचे उपलब्ध स्रोत या पालेभाज्या पिकविण्यासाठी संजीवनी ठरत आहे़ पालेभाज्यांसाठी साखळी पद्धतीने नळाद्वारे, पाटाने किंवा विद्युत मोटारीने पिकांना पाणी पुरविले जात आहे़ त्यामुळे मळ्यावर काम करणाऱ्या स्त्री-पुरुषांना मजुरीही अर्थार्जनाचा चांगला लाभ होऊ लागला आहे़ दुसरीकडे तयार झालेली ताजी भाजी शहरापर्यंत पोहोचू लागली आहे़ दूरवरून येणाऱ्या भाज्यांपेक्षा या गावठी भाज्यांना मागणीही चांगली वाढली आहे, असे येथील शेतकऱ्यांना सांगितले जाते़ (वार्ताहर) हाताला पैसा मिळू लागला...विक्रमगड तालुक्यातील, कावळे, शेलपाडा, विक्रमगड, माण, नागझरी, वसुरी, डोल्हारी, दादडे, तलवाडा, आंबिवली, कुंर्झे आदी भाग परिसरातून मोठ्या प्रमाणात रब्बी पीक घेतले जाते़ येथील मोकळ्या किंवा थोड्या अधिक जमिनीत कारली, दुधी, मिरची, गवार, वांगी, टोमॅटो, कोबी, फलॉवर, भेंडी, सिमला मिरची, चवळी, काकडी, माठ, भोपळा, मेथी, चवळी अशा विविध पालेभाज्या घेऊन त्या विक्रीसाठी तालुक्याच्या ठिकाणी मुख्य बाजारात किंवा गावातच विकल्या जाऊ लागल्या आहेत.