शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
2
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
3
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
4
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
5
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
6
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
7
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान
8
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
9
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
10
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
11
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
12
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
13
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
14
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
15
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
16
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
17
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
18
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
19
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
20
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...

कर्मचाऱ्यांनी वेळ न पाळल्याने शेतकरी माघारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2019 23:21 IST

पहिल्याच शिबिरात गलथान कारभार; किसान सन्मान निधी योजना उपक्रमात नियोजनाचा अभाव

डहाणू/बोर्डी : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे नवीन लाभार्थी शोधणे आणि पोर्टलला अपलोड केलेल्या शेतकऱ्यांच्या त्रुटींची पूर्तता करून डाटा दुरूस्त करण्यासाठी महसूल विभागातर्फे शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र, सोमवार, १८ नोव्हेंबर रोजी तालुक्यातील पाचपैकी पहिल्या शिबिरासाठी नियुक्त अधिकाºयांच्या नियोजनशून्यतेमुळे दिरंगाई झाल्याने शेतकरी आणि कर्मचाºयांनी नाराजी व्यक्त केली.अस्मानी संकटांनी मेटाकुटीस आलेल्या बळीराजाला सावरता यावे म्हणून शासन विविध योजनांच्या माध्यमातून मदतीचा हात पुढे करीत आहे. त्यानुसार जिल्हास्तरावर जिल्हाधिकाºयांमार्फत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेबाबत नवीन लाभार्थ्यांचा शोध घेण्यासह सद्यस्थितीतील डाटा, रद्द झालेला डाटा, बँक व्यवहारातील त्रुटी, लाभार्थ्यांचा थांबलेला निधी आदी त्रुटींची पूर्तता आणि माहिती अद्ययावत करून शेतकºयांना लाभ मिळावा म्हणून तालुकास्तरावर शिबिराचे आयोजन करण्याचा कार्यक्र म आखला आहे. डहाणू महसूल कार्यालयाअंतर्गत १८ नोव्हेंबर डहाणू मंडळ, १९ नोव्हेंबर कासा मंडळ, २० नोव्हेंबर सायवण मंडळ, २१ नोव्हेंबर आंबेसरी आणि २२ नोव्हेंबर रोजी चिंचणी येथे शिबीर होणार आहे.दरम्यान, सोमवारी डहाणू मंडळासाठी पहिले शिबिर मल्याण येथील मंडळ अधिकारी कार्यालयात पर्यवेक्षण अधिकारी निवासी नायब तहसीलदार पी. डी. राठोड, डहाणू आणि मल्याण मंडळ अधिकारी अनुक्रमे गौरव बांगारा, आर. निमगुडकर यांच्या उपस्थतीत सकाळी अकरा वाजता सुरू होणार होते. मात्र हे अधिकारी साडेअकराची वेळ उलटूनही शिबीरस्थळी हजर नव्हते. त्यामुळे तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक आणि शेतकºयांना ताटकळत बसावे लागले. हवालदिल झालेल्या बळीराजाला शासकीय अधिकाºयांच्या गलथान कारभाराचा फटका सहन करावा लागला. रोजंदारी बुडवून शिबिराला आलेल्या शेतकºयांच्या भावनांची दखल घेऊन जिल्हाधिकाºयांनी कारवाई करण्याची मागणी होत आहे.लाभ मिळणार तरी कसा?शिबिराला संबंधित मंडळात समाविष्ट असलेल्या ग्रा.पं.चे सरपंच, सदस्य, पंचायत समिती सदस्य, शेतकरी, कृषी सहाय्यक, तलाठी, ग्रामसेवक, मंडळ अधिकारी, नायब तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांनी सहभाग नोंदवून जास्तीत जास्त लाभार्थी या योजनेत सहभागी होतील, याकरिता दक्षता घ्यायचे पत्रक तहसीलदारांनी काढले होते. मात्र बहुतेक कर्मचारी आणि लोकप्रतिनिधी यावेळी अनुपस्थित होते. योजना यशस्वी होऊन शेतकºयांना लाभ मिळणार कसा असा प्रश्न आहे.