शहरं
Join us  
Trending Stories
1
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
2
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
3
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
4
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
5
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले
6
"14 तारखेला 11 वाजेपर्यंत लालू अँड कंपनीचा..."; अमित शाह स्पष्टच बोलले, घुसखोरांसंदर्भात काय म्हणाले?
7
Anil Ambani ED: अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
8
विजय देवराकोंडा-रश्मिका मंदाना 'या' महिन्यात लग्न करणार? काही दिवसांपूर्वीच झालेला साखरपुडा
9
बायकोला ब्रेन ट्युमर, नवऱ्याने मृत्यूच्या दारातून परत आणलं; मराठी रीलस्टार कपलच्या रिअल लाइफ स्टोरीवर येतोय साऊथ मुव्ही
10
भाजप कार्यकर्त्याने आधी दिल्लीत नंतर बिहारमध्ये मतदान केले; राहुल गांधींनंतर आप नेत्याने आरोप केला
11
Canada Visa Rules : कॅनडाने व्हिसा नियमांमध्ये केला मोठा बदल, भारतावर काय परिणाम होईल?
12
SBI नं रचला इतिहास, मार्केट कॅप १०० अब्ज डॉलर्सच्या पार; देशातील दिग्गजांच्या यादीत सामील
13
"माझ्या पप्पांना अडकवण्यात आलंय"; वडील जेलमध्ये, लेकीने अभ्यास सोडून केला प्रचार
14
Jara Hatke: चांदीचा वर्ख कसा तयार होतो माहितीय? वर्ख लावलेली मिठाई खावी की नाही? तुम्हीच ठरवा!
15
सोन्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलायला हवा? SBI ची मोठी मागणी, म्हणाले घरांमध्ये पडून असलेलं सोनं..
16
मोठी बातमी! पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी तहसीलदार सूर्यकांत येवले निलंबित
17
बिहार निवडणूक 2025: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
18
चारित्र्यावर संशय! रस्त्यात दुसऱ्या तरुणासोबत बोलली म्हणून संतापलेल्या पतीने ब्लेडने कापले पत्नीचे नाक
19
याला म्हणतात ऑफर...! Tata च्या इलेक्ट्रिक कारवर ₹1.30 लाखांपर्यंतची सूट, Curvv EV अन् Punch EV वर मोठा डिस्काउंट
20
तो प्रवास ठरला अखेरचा..; प्रसिद्ध ट्रॅव्हल इन्फ्लुएंसर अनुनय सूदचे 32व्या वर्षी निधन

कर्मचाऱ्यांनी वेळ न पाळल्याने शेतकरी माघारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2019 23:21 IST

पहिल्याच शिबिरात गलथान कारभार; किसान सन्मान निधी योजना उपक्रमात नियोजनाचा अभाव

डहाणू/बोर्डी : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे नवीन लाभार्थी शोधणे आणि पोर्टलला अपलोड केलेल्या शेतकऱ्यांच्या त्रुटींची पूर्तता करून डाटा दुरूस्त करण्यासाठी महसूल विभागातर्फे शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र, सोमवार, १८ नोव्हेंबर रोजी तालुक्यातील पाचपैकी पहिल्या शिबिरासाठी नियुक्त अधिकाºयांच्या नियोजनशून्यतेमुळे दिरंगाई झाल्याने शेतकरी आणि कर्मचाºयांनी नाराजी व्यक्त केली.अस्मानी संकटांनी मेटाकुटीस आलेल्या बळीराजाला सावरता यावे म्हणून शासन विविध योजनांच्या माध्यमातून मदतीचा हात पुढे करीत आहे. त्यानुसार जिल्हास्तरावर जिल्हाधिकाºयांमार्फत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेबाबत नवीन लाभार्थ्यांचा शोध घेण्यासह सद्यस्थितीतील डाटा, रद्द झालेला डाटा, बँक व्यवहारातील त्रुटी, लाभार्थ्यांचा थांबलेला निधी आदी त्रुटींची पूर्तता आणि माहिती अद्ययावत करून शेतकºयांना लाभ मिळावा म्हणून तालुकास्तरावर शिबिराचे आयोजन करण्याचा कार्यक्र म आखला आहे. डहाणू महसूल कार्यालयाअंतर्गत १८ नोव्हेंबर डहाणू मंडळ, १९ नोव्हेंबर कासा मंडळ, २० नोव्हेंबर सायवण मंडळ, २१ नोव्हेंबर आंबेसरी आणि २२ नोव्हेंबर रोजी चिंचणी येथे शिबीर होणार आहे.दरम्यान, सोमवारी डहाणू मंडळासाठी पहिले शिबिर मल्याण येथील मंडळ अधिकारी कार्यालयात पर्यवेक्षण अधिकारी निवासी नायब तहसीलदार पी. डी. राठोड, डहाणू आणि मल्याण मंडळ अधिकारी अनुक्रमे गौरव बांगारा, आर. निमगुडकर यांच्या उपस्थतीत सकाळी अकरा वाजता सुरू होणार होते. मात्र हे अधिकारी साडेअकराची वेळ उलटूनही शिबीरस्थळी हजर नव्हते. त्यामुळे तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक आणि शेतकºयांना ताटकळत बसावे लागले. हवालदिल झालेल्या बळीराजाला शासकीय अधिकाºयांच्या गलथान कारभाराचा फटका सहन करावा लागला. रोजंदारी बुडवून शिबिराला आलेल्या शेतकºयांच्या भावनांची दखल घेऊन जिल्हाधिकाºयांनी कारवाई करण्याची मागणी होत आहे.लाभ मिळणार तरी कसा?शिबिराला संबंधित मंडळात समाविष्ट असलेल्या ग्रा.पं.चे सरपंच, सदस्य, पंचायत समिती सदस्य, शेतकरी, कृषी सहाय्यक, तलाठी, ग्रामसेवक, मंडळ अधिकारी, नायब तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांनी सहभाग नोंदवून जास्तीत जास्त लाभार्थी या योजनेत सहभागी होतील, याकरिता दक्षता घ्यायचे पत्रक तहसीलदारांनी काढले होते. मात्र बहुतेक कर्मचारी आणि लोकप्रतिनिधी यावेळी अनुपस्थित होते. योजना यशस्वी होऊन शेतकºयांना लाभ मिळणार कसा असा प्रश्न आहे.