शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
2
चीनच्या धरतीवरून जगाला दिसणार 'पॉवर'; २० मित्र ट्रम्प यांचा खेळ बिघडवणार, खरा डाव चौघे टाकणार
3
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
4
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
5
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख
6
झाली का गणपती पूजेची तयारी? काय राहिलं, काय घेतलं? झटपट तपासून घ्या पूजा साहित्य 
7
Nikki Murder Case : "न्यायाच्या बदल्यात न्याय, रक्ताच्या बदल्यात रक्त, आम्ही मुलगी गमावली"; निक्कीच्या आईचा टाहो
8
संधी मिळताच मोलकरणीने मारला डल्ला, घरातून ३५ लाखांचे दागिने, १० लाखांची रक्कम लंपास
9
Yavatmal: 'ती' गोष्ट लपवण्यासाठी रात्रीस 'खेळ'?; ग्रामसभेच्या आदल्या दिवशीच फोडले ग्रामपंचायत कार्यालय अन्...
10
गणपती आगमनाला पाऊस येणं हे तर शुभ लक्षण; यंदाही मुसळधार कोसळण्याची शक्यता 
11
भारताला 'मृत अर्थव्यवस्था' म्हणणाऱ्या ट्रम्प यांची मोठी गुंतवणूक; दरमहा होते कोट्यवधीची कमाई...
12
बाजारासाठी 'अ'मंगळवार! सेन्सेक्स ८४९ अंकांनी कोसळला; 'या' ५ मोठ्या कारणांमुळे झाली ऐतिहासिक घसरण
13
बुलढाणा: बापाच्या छातीवर ठेवला पाय, गळा दाबला आणि पाजलं विष; मुलाकडून क्रूरतेचा कळस
14
पावसाचा तडाखा! खवळलेल्या व्यास नदीने प्राचीन पंजवक्त्र महादेव मंदिराला घेतलं कवेत; व्हिडीओ बघून अंगावर येईल काटा
15
"हनुमान चालीसा म्हण", अरबाज निक्कीला देतो सल्ला, गणपती बाप्पाच्या डेकोरेशनसाठीही करतोय मदत
16
Asia Cup 2025 : गोड बोलून संघाबाहेर काढलं? भारतीय क्रिकेटरची कोच गंभीरसंदर्भात 'मन की बात'
17
Nikki Bhati Case : निक्कीच्या नवऱ्याची होती गर्लफ्रेंड, तिच्याशी लग्न करणारच होता पण...; तेव्हाही केलेलं मोठं कांड!
18
बडोद्यात गणेश मूर्तीच्या विटंबनेचा प्रयत्न; समाजकंटकांनी मूर्तीवर अंडी फेकली, चार जण ताब्यात
19
गुरुवारी गजानन महाराज स्मरण दिन २०२५: एका दिवसांत कसे कराल ‘श्री गजानन विजय’ ग्रंथ पारायण?
20
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?

शेतकरी, बागायतदार, वीट उत्पादकांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2019 05:46 IST

यंदाच्या पावसाने आधीचे सगळे विक्रम मोडीत काढले असताना आता अरबी समुद्रात उसळलेल्या सोबा चक्रीवादळाचा तडाखा पश्चिम किनारपट्टीला बसला.

पारोळ : सोबा चक्रीवादळामुळे पालघर जिल्ह्यातील काही भागात गुरुवारी सकाळी पावसाने हजेरी लावली. यामुळे वसईतील भात, फळ, फूल, मासेमारी, मीठ, वीट या भूमिपुत्रांच्या व्यवसायांचे मोठे नुकसान झाले.यंदाच्या पावसाने आधीचे सगळे विक्रम मोडीत काढले असताना आता अरबी समुद्रात उसळलेल्या सोबा चक्रीवादळाचा तडाखा पश्चिम किनारपट्टीला बसला. चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे वसई-विरार आणि ग्रामीण भागात पाऊस पडला. सोबा चक्रीवादळाचा मच्छीमारांनाही फटका बसल्याचे प्रामुख्याने दिसले आहे. चक्रीवादळामुळे मासेमारीसाठी समुद्रात गेलेल्या मासेमार बोटी समुद्र किनाऱ्याकडे परतल्या.जून महिन्यात कोरडाठाक राहिलेला मान्सून चिंतेची लाट घेऊन आला होता. मात्र जुलै महिन्यात पहिल्या आठवड्यापासून मुसळधार बरसलेल्या पर्जन्याने शेवटपर्यंत वसई-विरारकरांना इंगा दाखवत अतोनात नुकसान केले. भातशेतीला तर चारवेळा पुराचा तडाखा बसला. मीठ उत्पादकांचेही या अतिवृष्टीने कंबरडे मोडले. बागायती शेतीला प्रामुख्याने या पावसाचा फटका बसला. तर पुराच्या तडाख्यामुळे घरादारात पाणी गेल्याने मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली. सप्टेंबर महिन्यात साधारणपणे पाऊस परतीच्या मार्गाला लागतो. मात्र झाले उलटेच.ऐन सप्टेंबर महिन्यात भात आणि बागायती शेती फुलण्याच्या तयारीत असताना परतीच्या पावसाने मोठाच दणका दिला. यात शेतकरी वर्गाचे कंबरडे मोडले. महसूल प्रशासनाने सुमारे ३० हजार हेक्टरवरील नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे केल्यानंतर शेतकऱ्यांना भरपाई देण्याचे काम सुरू आहे. सुमारे ७५ हजार हेक्टर इतक्या क्षेत्रावर लागवड केलेली भातशेती यावेळच्या पावसाने मोठ्या प्रमाणात बाधित झाली.पंचनाम्यांचे काम पूर्ण झाले असतानाच अरबी समुद्रात उसळलेल्या क्यार वादळाने पुन्हा शेतीचा आर्थिक कणा मोडून काढला. या वादळाच्या तडाख्यातून शेतकरी राजा सावरत असतानाच आता अरबी समुद्रात पुन्हा उसळलेल्या सोबा चक्रीवादळाने शेतकºयांवर घाव घातला आहे. आधीच प्रचंड नुकसानाच्या गर्तेत सापडलेल्या शेतकºयावर या वादळाने केलेला हल्ला शेतकºयांना नुकसानात टाकणारा ठरला आहे. यामुळे आधीच संकटात असलेला शेतकरी आता अधिक खोलात बुडतो आहे.मनोर परिसरात पुन्हा रिमझिम; शेतकºयांची धावपळगुरुवारी सकाळी अवकाळी पावसाची रिमझिम सुरू झाल्याने खळ्यावरचा तसेच शेतात कापून ठेवलेला भात भिजू नये म्हणून मनोर परिसरातील आदिवासी तसेच इतर शेतकºयांची धावपळ उडाली.पाऊस थांबल्याने उरलासुरला भात कापून तो खळ्यापर्यंत आणला. मात्र, आज सकाळपासून मनोर, करलगाव, हलोली, कोसबाड अशा अनेक गावांत पुन्हा पावसाची रिमझिम झाली.भात भिजू नये यासाठी शेतकºयांनी उडव्यांवर प्लास्टिक टाकले. शेतातील पंचनामे झाले आता खळ्यातील पंचनामे करायची वेळ आली आहे. तसेच गंजावर नेलेले गवतही भिजल्याने व्यापाºयांचीही पंचायत झाली.

टॅग्स :Farmerशेतकरी