शहरं
Join us  
Trending Stories
1
कोरोनावरील लसीमुळे वाढलंय तरुणांना हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण? AIIMS, ICMRने दिली अशी माहिती 
2
"माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर..."; भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांचं भावूक पत्र
3
कॅब कंपन्यांसाठी सरकारचा नवा नियम, पिक अवरमध्ये दुप्पट भाडं आकारू शकणार; बाईक टॅक्सीलाही मंजुरी
4
IND vs ENG: दुसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाच्या Playing XI मध्ये होणार 'हे' ४ महत्त्वाचे बदल
5
त्या बेटावर २० दिवसांत ७०० हून अधिक भूकंप! ५ जुलैला काय वाढून ठेवलेय, बाबा वेंगाची भविष्यवाणी आणि...
6
पाकिस्तानसोबत मिळून युनूस यांची कोणती खेळी?; ३ पाकिस्तानी ISI अधिकाऱ्यांचा ओळख लपवून दौरा
7
Sonam Raghuwanshi : सोनम रघुवंशी आणि राज कुशवाहने गुपचूप केलेलं लग्न, काय आहे २ मंगळसूत्रांमागचं रहस्य?
8
पत्नीसोबत वाद झाला आणि तो आत्महत्या करण्यासाठी उड्डाण पुलावर आला; पुढे काय घडलं व्हिडीओ बघा
9
मस्क-ट्रम्प शाब्दिक युद्ध, राष्ट्राध्यक्ष म्हणाले, तुम्हाला दक्षिण आफ्रिकेत परत जावे लागेल...
10
'तरुणी हव्या आहेत, घसघशीत कमिशन मिळेल'; युपी-बिहार सोडून केरळमध्ये रचला जातोय भारताविरोधात मोठा कट
11
डोनाल्ड ट्रम्प यांचं 'One Big Beautiful Bill' सीनेटमध्ये मंजूर; ट्रम्प आणि मस्क यांनी एकमेकांना दिली 'ही' धमकी
12
संजय राऊतांनी लिहिलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र; अजितदादांच्या आमदारावर गंभीर आरोप
13
Kolkata Case : "पीडितेला श्वास घेता येत नव्हता, आरोपी म्हणाला - इनहेलर आणा"; वकिलाचा धक्कादायक खुलासा
14
HDB Financial IPO Listing: एचडीएफसीच्या 'स्टार'ची बंपर एन्ट्री; लिस्टिंगवर पैशांचा पाऊस, गुंतवणूकदार मालामाल
15
Guru Purnima 2025: गुरु शोधायला जाऊ नका, तेच आपल्या आयुष्यात येतात; पण कधी? ते जाणून घ्या!
16
ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य; लवकरच भारतासोबत होणार व्यापार करार, किती टक्के शुल्क लादणार?
17
पहलगाम हल्ल्याबाबत क्वाडच्या बैठकीत झाला मोठा निर्णय, भारताचा अमेरिकेतून पाकिस्तानला धक्का 
18
पाठीमागून आला लाथ मारली, नंतर गर्लफ्रेंडचा चिरला गळा, तरुणाने वडिलांसमोरच घेतला जीव, का केली हत्या?
19
तरुणांनो, तयार राहा, दोन वर्षांत सरकार तुम्हाला देणार तब्बल ३.५ कोटी नोकऱ्या
20
Mumbai: झोपत नाही म्हणून पाच वर्षाच्या मुलीच्या चेहऱ्यावर दिले सिगारेटचे चटके, बापाचं क्रूर कृत्य!

शेतकरी, बागायतदार, वीट उत्पादकांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2019 05:46 IST

यंदाच्या पावसाने आधीचे सगळे विक्रम मोडीत काढले असताना आता अरबी समुद्रात उसळलेल्या सोबा चक्रीवादळाचा तडाखा पश्चिम किनारपट्टीला बसला.

पारोळ : सोबा चक्रीवादळामुळे पालघर जिल्ह्यातील काही भागात गुरुवारी सकाळी पावसाने हजेरी लावली. यामुळे वसईतील भात, फळ, फूल, मासेमारी, मीठ, वीट या भूमिपुत्रांच्या व्यवसायांचे मोठे नुकसान झाले.यंदाच्या पावसाने आधीचे सगळे विक्रम मोडीत काढले असताना आता अरबी समुद्रात उसळलेल्या सोबा चक्रीवादळाचा तडाखा पश्चिम किनारपट्टीला बसला. चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे वसई-विरार आणि ग्रामीण भागात पाऊस पडला. सोबा चक्रीवादळाचा मच्छीमारांनाही फटका बसल्याचे प्रामुख्याने दिसले आहे. चक्रीवादळामुळे मासेमारीसाठी समुद्रात गेलेल्या मासेमार बोटी समुद्र किनाऱ्याकडे परतल्या.जून महिन्यात कोरडाठाक राहिलेला मान्सून चिंतेची लाट घेऊन आला होता. मात्र जुलै महिन्यात पहिल्या आठवड्यापासून मुसळधार बरसलेल्या पर्जन्याने शेवटपर्यंत वसई-विरारकरांना इंगा दाखवत अतोनात नुकसान केले. भातशेतीला तर चारवेळा पुराचा तडाखा बसला. मीठ उत्पादकांचेही या अतिवृष्टीने कंबरडे मोडले. बागायती शेतीला प्रामुख्याने या पावसाचा फटका बसला. तर पुराच्या तडाख्यामुळे घरादारात पाणी गेल्याने मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली. सप्टेंबर महिन्यात साधारणपणे पाऊस परतीच्या मार्गाला लागतो. मात्र झाले उलटेच.ऐन सप्टेंबर महिन्यात भात आणि बागायती शेती फुलण्याच्या तयारीत असताना परतीच्या पावसाने मोठाच दणका दिला. यात शेतकरी वर्गाचे कंबरडे मोडले. महसूल प्रशासनाने सुमारे ३० हजार हेक्टरवरील नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे केल्यानंतर शेतकऱ्यांना भरपाई देण्याचे काम सुरू आहे. सुमारे ७५ हजार हेक्टर इतक्या क्षेत्रावर लागवड केलेली भातशेती यावेळच्या पावसाने मोठ्या प्रमाणात बाधित झाली.पंचनाम्यांचे काम पूर्ण झाले असतानाच अरबी समुद्रात उसळलेल्या क्यार वादळाने पुन्हा शेतीचा आर्थिक कणा मोडून काढला. या वादळाच्या तडाख्यातून शेतकरी राजा सावरत असतानाच आता अरबी समुद्रात पुन्हा उसळलेल्या सोबा चक्रीवादळाने शेतकºयांवर घाव घातला आहे. आधीच प्रचंड नुकसानाच्या गर्तेत सापडलेल्या शेतकºयावर या वादळाने केलेला हल्ला शेतकºयांना नुकसानात टाकणारा ठरला आहे. यामुळे आधीच संकटात असलेला शेतकरी आता अधिक खोलात बुडतो आहे.मनोर परिसरात पुन्हा रिमझिम; शेतकºयांची धावपळगुरुवारी सकाळी अवकाळी पावसाची रिमझिम सुरू झाल्याने खळ्यावरचा तसेच शेतात कापून ठेवलेला भात भिजू नये म्हणून मनोर परिसरातील आदिवासी तसेच इतर शेतकºयांची धावपळ उडाली.पाऊस थांबल्याने उरलासुरला भात कापून तो खळ्यापर्यंत आणला. मात्र, आज सकाळपासून मनोर, करलगाव, हलोली, कोसबाड अशा अनेक गावांत पुन्हा पावसाची रिमझिम झाली.भात भिजू नये यासाठी शेतकºयांनी उडव्यांवर प्लास्टिक टाकले. शेतातील पंचनामे झाले आता खळ्यातील पंचनामे करायची वेळ आली आहे. तसेच गंजावर नेलेले गवतही भिजल्याने व्यापाºयांचीही पंचायत झाली.

टॅग्स :Farmerशेतकरी