शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्रिटनमध्ये 'नो एन्ट्री' : व्हिसाचे नियम कडक; ६७ टक्क्यांची मोठी कपात, आयटी, हेल्थ प्रोफेशनल्सना मोठा झटका!
2
ठाकरे बंधू जाहीरनामा, युती एकाच दिवशी जाहीर करणार? शिवाजी पार्क येथे प्रचाराची सांगता सभाही एकत्रित..?
3
आजचे राशीभविष्य, १७ डिसेंबर २०२५: चांगली बातमी मिळेल,शक्यतो आज वाद टाळावेत
4
ममता बॅनर्जी यांच्या मतदारसंघातून तब्बल ४५ हजार मतदार हटवले; सत्ताधारी TMC राबवणार मोहीम
5
मुंबईत दोन मोठे विमानतळ, मात्र स्टेट हँगरच नाही; सरकारलाही भाड्याने घ्यावे लागते हँगर!
6
'गांधीजी का ये अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान'; विरोधकांचा तीव्र आक्षेप, खासदारांची निदर्शने
7
अनंत अंबांनींच्या वनताराला भेटीने मेस्सी आनंदी; प्राण्यांची काळजी घेण्याची पद्धत पाहून प्रभावी
8
१९९७ पासून केलेल्या विकासकामांची यादी, उद्धवसेनेच्या विकासकामांचे श्रेय घेऊ नका : आ. आदित्य ठाकरे
9
मंत्री कोकाटेंची २ वर्षांची शिक्षा कायम; सवलतीच्या घरांसाठी खोटी कागदपत्रे, कोट्यातून फ्लॅट लाटणे भोवले
10
धुक्यात थांबला होता 'काळ' : ७ बस, ३ कार एकमेकांना धडकून १३ जण खाक
11
दुचाकी, ट्रॅक्टरसह साडेतीन एकर शेतीही विकली, तरीही व्याजाचा डोंगर वाढताच... सावकाराचा तगादा; शेतकऱ्याने विकली किडनी
12
नॅशनल हेराल्ड केस : ईडीला धक्का; राहुल, सोनिया गांधी यांना दिलासा
13
एकच उच्चशिक्षणासाठी नियामक मंडळ असेल तर... मूल्यांकन होईल 'डिजिटल' आणि पारदर्शक!
14
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
15
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
16
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
17
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
18
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
19
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
20
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी, बागायतदार, वीट उत्पादकांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2019 05:46 IST

यंदाच्या पावसाने आधीचे सगळे विक्रम मोडीत काढले असताना आता अरबी समुद्रात उसळलेल्या सोबा चक्रीवादळाचा तडाखा पश्चिम किनारपट्टीला बसला.

पारोळ : सोबा चक्रीवादळामुळे पालघर जिल्ह्यातील काही भागात गुरुवारी सकाळी पावसाने हजेरी लावली. यामुळे वसईतील भात, फळ, फूल, मासेमारी, मीठ, वीट या भूमिपुत्रांच्या व्यवसायांचे मोठे नुकसान झाले.यंदाच्या पावसाने आधीचे सगळे विक्रम मोडीत काढले असताना आता अरबी समुद्रात उसळलेल्या सोबा चक्रीवादळाचा तडाखा पश्चिम किनारपट्टीला बसला. चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे वसई-विरार आणि ग्रामीण भागात पाऊस पडला. सोबा चक्रीवादळाचा मच्छीमारांनाही फटका बसल्याचे प्रामुख्याने दिसले आहे. चक्रीवादळामुळे मासेमारीसाठी समुद्रात गेलेल्या मासेमार बोटी समुद्र किनाऱ्याकडे परतल्या.जून महिन्यात कोरडाठाक राहिलेला मान्सून चिंतेची लाट घेऊन आला होता. मात्र जुलै महिन्यात पहिल्या आठवड्यापासून मुसळधार बरसलेल्या पर्जन्याने शेवटपर्यंत वसई-विरारकरांना इंगा दाखवत अतोनात नुकसान केले. भातशेतीला तर चारवेळा पुराचा तडाखा बसला. मीठ उत्पादकांचेही या अतिवृष्टीने कंबरडे मोडले. बागायती शेतीला प्रामुख्याने या पावसाचा फटका बसला. तर पुराच्या तडाख्यामुळे घरादारात पाणी गेल्याने मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली. सप्टेंबर महिन्यात साधारणपणे पाऊस परतीच्या मार्गाला लागतो. मात्र झाले उलटेच.ऐन सप्टेंबर महिन्यात भात आणि बागायती शेती फुलण्याच्या तयारीत असताना परतीच्या पावसाने मोठाच दणका दिला. यात शेतकरी वर्गाचे कंबरडे मोडले. महसूल प्रशासनाने सुमारे ३० हजार हेक्टरवरील नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे केल्यानंतर शेतकऱ्यांना भरपाई देण्याचे काम सुरू आहे. सुमारे ७५ हजार हेक्टर इतक्या क्षेत्रावर लागवड केलेली भातशेती यावेळच्या पावसाने मोठ्या प्रमाणात बाधित झाली.पंचनाम्यांचे काम पूर्ण झाले असतानाच अरबी समुद्रात उसळलेल्या क्यार वादळाने पुन्हा शेतीचा आर्थिक कणा मोडून काढला. या वादळाच्या तडाख्यातून शेतकरी राजा सावरत असतानाच आता अरबी समुद्रात पुन्हा उसळलेल्या सोबा चक्रीवादळाने शेतकºयांवर घाव घातला आहे. आधीच प्रचंड नुकसानाच्या गर्तेत सापडलेल्या शेतकºयावर या वादळाने केलेला हल्ला शेतकºयांना नुकसानात टाकणारा ठरला आहे. यामुळे आधीच संकटात असलेला शेतकरी आता अधिक खोलात बुडतो आहे.मनोर परिसरात पुन्हा रिमझिम; शेतकºयांची धावपळगुरुवारी सकाळी अवकाळी पावसाची रिमझिम सुरू झाल्याने खळ्यावरचा तसेच शेतात कापून ठेवलेला भात भिजू नये म्हणून मनोर परिसरातील आदिवासी तसेच इतर शेतकºयांची धावपळ उडाली.पाऊस थांबल्याने उरलासुरला भात कापून तो खळ्यापर्यंत आणला. मात्र, आज सकाळपासून मनोर, करलगाव, हलोली, कोसबाड अशा अनेक गावांत पुन्हा पावसाची रिमझिम झाली.भात भिजू नये यासाठी शेतकºयांनी उडव्यांवर प्लास्टिक टाकले. शेतातील पंचनामे झाले आता खळ्यातील पंचनामे करायची वेळ आली आहे. तसेच गंजावर नेलेले गवतही भिजल्याने व्यापाºयांचीही पंचायत झाली.

टॅग्स :Farmerशेतकरी