शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
3
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
4
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
5
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
6
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
7
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
8
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
9
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
10
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
11
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
12
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
13
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
14
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
15
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
16
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
17
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
18
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
19
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
20
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास

भिवंडीत भातखरेदी केंद सुरु करण्याची शेतकऱ्यांची मागणी 

By नितीन पंडित | Updated: November 16, 2022 17:48 IST

लोकमत न्यूज नेटवर्क भिवंडी:दि.१६- राज्य सरकारने तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी दुगाडफाटा ,झिडके ,पडघा येथील हमीभाव भात खरेदी केंद्र सुरू करावे अशी ...

लोकमत न्यूज नेटवर्कभिवंडी:दि.१६- राज्य सरकारने तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी दुगाडफाटा ,झिडके ,पडघा येथील हमीभाव भात खरेदी केंद्र सुरू करावे अशी मागणी प्रगतिशील शेतकरी शिवाजी राऊत यांनी राज्य शासनाकडे केली आहे.विशेष म्हणजे शासन निर्देशाने हे भात खरेदी केंद्र मागील महिन्यातच सुरु करण्याचे निर्देश शासनाने दिले असतांनाही एक महिना उलटल्यानेही हे भट खरेदी केंद्र अजूनही सुरु करण्यात आले नसल्याने तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाले आहेत.

        दोन वर्षांपूर्वी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे.मात्र यावर्षी चांगला पाऊस झाल्याने भातपीक चांगले आले आहे.त्यामुळे शेतकरी सुखावला आहे. भातपीक हाती आल्याने हे भात सरकारी हमीभाव खरेदी केंद्रात विकण्यास येतात त्यामुळे भात विकून आपले कर्ज आणि पुढल्या वर्षासाठी कुटुंबाला सांभाळण्यासाठी पुंजी शेतकरी जमा करतो. मात्र दुगाड फाटा,पडघा व झिडके येथील भात खरेदी केंद्र अद्यापी सुरु झालेले नाही.त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे त्यामुळे राज्य सरकारने भात खरेदी केंद्र लवकर सुरु करावे अशी मागणी शेतकरी करीत आहेत .          उधरनिर्वाहासाठी भात विकल्याशिवाय शेतकऱ्यांना पर्याय नाही मात्र त्यासाठी शासनाचे भिवंडी तालुक्यात हमीभाव भात खरेदी केंद्र अद्यापी सुरु झालेले नसल्याने अनेक शेतकरी व्यापाऱ्यांना कमी पैशांमध्ये भात विकत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत असल्याची खंत शेतकरी शिवाजी राऊत यांनी व्यक्त केली आहे.राज्य शासन प्रति क्विंटल २०४० रुपये भाव देत आहे.मात्र बोनसचे ७०० रुपये शेतकऱ्यांना मिळत नसल्याने बोनसचे ७०० रुपये शेतकऱ्यांना मिळावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

          भिवंडी तालुक्यात २२ हजार हेक्टर शेतजमीनीवर भाताचे पीक घेण्यात आलेले आहे. २२७ महसुल गावांपैकी १६७ गावांमध्ये भाताचे उत्तम पिक घेतले जात आहे.भात पिकाचे उत्पन्न हाती आल्यावर त्यापैकी अर्ध्याअधिक धानाची विक्री करून शेतकरी सोसायटी किवा बँकाच्या घेतलेल्या कर्जाची परतफेड करून आपल्या कुटूंबाचे गुजरान करीत असतो. त्यासाठी राज्य शासनाने तात्काळ दुगाड,झिडके आणि पडघा येथे भात खरेदी केंद्र सुरु करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी तालुक्यातील शेतकरी करीत आहे.