शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

आशीषच्या मृत्यूच्या चौकशीसाठी कुटुंबीयांचे उपोषण

By admin | Updated: June 4, 2017 04:21 IST

गेल्या तीन महिन्यांपूर्वी पालघर येथील लोकमान्य नगरमध्ये राहणाऱ्या व पोलिसांच्या ताब्यात असताना संशयास्पदरित्या मृत्यू पावलेल्या आशिष काटेला

- लोकमत न्यूज नेटवर्क

पालघर : गेल्या तीन महिन्यांपूर्वी पालघर येथील लोकमान्य नगरमध्ये राहणाऱ्या व पोलिसांच्या ताब्यात असताना संशयास्पदरित्या मृत्यू पावलेल्या आशिष काटेला याच्या मृत्यूची चौकशी व्हावी यासाठी त्याचे नातेवाईक उपोषणाला बसले आहेत.आशिषने आपला मित्र रुपेश जाधव व त्याची पे्रयसी यांना लग्न करण्यासाठी पळून जाण्यात मदत केल्याबद्दल पोलिसांनी त्याच्या नातेवाइकांना न सांगताच त्याला अटक केली होती. वास्तविक त्याच्या अटकेची नियमांप्रमाणे त्याच्या नातेवाईकांना पूर्वकल्पना देणे आवश्यक असताना ती दिली गेली नाही. पंचनामाही केला नाही. त्याची मुक्तता केल्याची कल्पनाही नातेवाईकांना दिली नाही. किंवा त्यांच्या स्वाधीनही त्याला केले नाही. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याचा मृतदेह नवली फाटकजवळील रेल्वे ट्रॅकनजिक आढळून आला होता. गेले तीन महिने पाठपुरावा करूनही पालघर पोलिसांनी या संशयास्पद मृत्यूबाबत कोणताही तपास केलेला नाही. असा आरोप करून हे नातेवाईक पोलीसठाण्यासमोर उपोषणाला बसले आहेत. यामधील गुन्हेगारांवर योग्य ती कारवाई झाली पाहिजे व मृत आशिषला अटक केल्याच्या दिवसाचे पोलीस स्टेशनमधील सीसीफुटेज मिळाले म्हणून त्याची आई निर्मला दीपक काटेला व काकी वर्षा विलास काटेला या पालघर पोलीस स्टेशनसमोर आमरण उपोषणास बसल्या आहेत. या केसशी मृत आशिष काटेला याचा कोणताही संबंध नसून त्याला न्याय मिळवा यासाठी हा लढा उभारल्याचे अशिषच्या आई व काकींनी लोकमतला सांगितले आहे.मार्चमध्ये आशिष याने आपला मित्र व त्याची प्रेयसी यांना पळून जाऊन लग्न करण्यासाठी मदत केली म्हणून बोईसर येथे नेऊन सोडले हे कळताच लोकमान्य नगर येथील मुलीच्या नातेवाईकांनी आशिष याला पकडून पोलिसांत दिले मात्र त्याला पकडल्या बाबतची माहिती त्याच्या नातेवाइकांना दिली नाही.पोलीस स्टेशनला आणल्यानंतर पोलिसांनी त्याला मारहाण केली व त्यावर दडपण आणण्याचा प्रयत्न केला संपूर्ण रात्र त्याला पोलीस स्थानकात ठेवले गेले यादरम्यान अशिषच्या वडीलांना हे समजताच त्यांनी त्याची भेट घेण्यासाठी पोलीस स्टेशन गाठले. मात्र पोलिसांनी त्यांना आशिषला भेटू दिले नाही उलट त्यांना तेथून हाकलण्यात आले. दरम्यान त्याला पोलिसांनी सीमकार्ड घेण्यासाठी घरीही पाठवले होते, असे त्याच्या वडीलांनी सांगितले.आशिष दुसऱ्या दिवशी रेल्वे ट्रॅकजवळ मृतावस्थेत नवली येथे आढळला. हे सकाळी घडले व त्याच्या नातेवाइकांना हि बाब दुपारी २.३० च्या सुमारास कळली. लागलीच नातेवाइकांनी रेल्वे स्थानक गाठले तोवर त्याचा मृतदेह पोलिसांनी शवविच्छेदनासाठी पाठविला होता तदनंतर आशिषच्या नातेवाईकांनी त्याचा मृतदेह ताब्यात घेत तो पोलीस स्टेशन पालघर येथे नेला व या घडलेल्या प्रकारची गंभीर दखल घ्या नाहीतर आम्ही त्याचा मृतदेह ताब्यात घेणार नाही, असे त्याच्या नातेवाइकांनी सांगताच पोलिसांनी आम्ही योग्य तो तपास करून दोषी असलेल्यांवर कारवाई करू असे आश्वासन दिले. मात्र तीन महिने उलटूनही पोलीस अधिक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी व पोलीस निरीक्षक पालघर यांच्याकडे वारंवार तक्रार करूनही आजवर कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. काय दडलंय या सीसीटीव्ही फुटेजमध्ये?मार्चमध्ये आशिषला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची त्याला आणल्याची वेळ व सोडल्याची वेळ या सीसीटीव्हीत चित्रीत झाली आहे. त्याच्या नातेवाइकांनी या फूटेजची मागणी केली असता पोलिसांनी देतो असे सांगून ३ महिन्यांतरही ते दिले नाही.आशिषला पालघर पोलीस स्टेशनमधून सोडल्याची वेळ सकाळी ७ वाजून १९ मिनिटांची आहे व अशिषचा रेल्वे अपघात ७ वाजून २३ मिनिटांनी झाल्याचे दाखविले आहे. पोलीस ठाणे ते घटनास्थळ हे अंतर जाण्यासाठी १० मिनीटे लागतात असे असताना तो ३ मिनिटात पोहचून जीव कसा देऊ शकतो. यामागे काही तरी दडले आहे व पोलीस खोटे बोलून आमची दिशाभूल करत आहेत असा त्याच्या नातेवाईकांचा आरोप आहे.एका मित्राला मदत करण्यासाठी अशिषला आपला जीव गमवावा लागला मात्र ज्याच्यामुळे जीव गेला ते मोकाटच आहेत.कारवाई करण्यात पोलिसांनी दिरंगाई केली व चित्रिफतीत सत्य दडले आहे म्हणून पोलीस ते देत नाहीत मात्र माङया मुलाला न्याय मिळायलाच हवा. -दीपक काटेला, अशिषचे वडील