शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
2
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
3
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
4
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
5
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
6
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
7
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
8
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
9
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
10
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
11
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
12
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
13
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
14
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
15
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
16
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
17
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
18
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
19
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
20
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...

मच्छिमारी बंदीचे सर्रास उल्लंघन; आयुक्त करणार अत्यंत कठोर कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2019 23:47 IST

राज्य शासनाने सागरी मासेमारी अधिनियम १९८१ अन्वये १ जून ते ३१ जुलै असा ६१ दिवसाचा मासेमारी बंदीचा कालावधी घोषित केला असून ह्या दरम्यान मासेमारी साठी समुद्रात जाणाऱ्या मच्छीमारांवर कडक कारवाई केली जाईल असा इशारा दिला आहे.

हितेंन नाईक

पालघर : शासनाने जाहीर केलेल्या मच्छिमारी बंदी आदेश झुगारून पालघर व ठाणे जिल्ह्यातील वसई व उत्तन येथील काही मच्छीमार आपल्या बोटी समुद्रात घेऊन मासेमारी करीत असल्याच्या सहकारी संस्थांच्या तक्रारी नंतर त्यांच्यावर कडक कारवाईचे आदेश मत्स्यव्यवसाय विभागाचे सहाय्यक आयुक्त दिनेश पाटील ह्यांनी आपल्या परवाना अधिकाऱ्यांना दिले आहेत.

राज्य शासनाने सागरी मासेमारी अधिनियम १९८१ अन्वये १ जून ते ३१ जुलै असा ६१ दिवसाचा मासेमारी बंदीचा कालावधी घोषित केला असून ह्या दरम्यान मासेमारी साठी समुद्रात जाणाऱ्या मच्छीमारांवर कडक कारवाई केली जाईल असा इशारा दिला आहे. अशी अवैध मच्छिमारी दरम्यान जीवित व वित्तहानी ची कुठलीही घटना घडल्यास शासन पातळीवरून त्यांना कुठलीही मदत अथवा योजनेचा लाभ मिळणार नाही असे सक्त आदेश परिपत्रकाद्वारे मत्स्यव्यवसाय विभागाच्या सचिवांकडून देण्यात आलेले आहेत. मात्र या आदेशाला झुगारून पालघर व ठाणे जिल्ह्यातील काही मच्छीमार बोटी समुद्रात मासेमारीला गेल्याच्या तक्रारी सहकारी संस्थांनी मत्स्य विभागाचे सहाय्यक आयुक्त दिनेश पाटील यांच्याकडे केल्या आहेत.

पालघर पोलीस अधीक्षक कार्यालयात झालेल्या जिल्हा सल्लागार समितीच्या बैठकीत पालघर व ठाणे जिल्ह्यासह मुंबई मधील काही भागात बंदी कालावधी दरम्यान छुप्या पद्धतीने केल्या जाणाºया मासेमारी विरोधात मच्छीमार सहकारी संस्थेचे अध्यक्ष राजन मेहेर सह उपस्थित अन्य पदाधिकाऱ्यांनी जोरदार पवित्रा घेऊन कडक कारवाईची मागणी केली होती. ह्यावेळी सातपाटी मधील दोन्ही सहकारी संस्थांनी मत्स्यव्यवसाय आयुक्तांना पत्र लिहून १ जून पासून कुठल्याही बंदरात मासे उतरविले गेल्यास ते जप्त करून त्या बोटीवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. मुंबई आदी बंदरात वर्षभरासाठी मासेमारी साठी आलेल्या अनेक पर्ससीन नेटधारक बोटी, ट्रॉेलर्स ३० मे दरम्यान आपल्या मूळ गावी जाण्याच्या बहाण्याने समुद्रात १० ते १५ दिवस मासेमारी करून नंतर आपल्या मूळ गावात पोचत होते. ह्यावेळी समुद्रात मासेमारी बंद असल्याचा फायदा उचलून हजारो टन मासे पकडून नेत असतात. सध्या माशांनी समुद्रात टाकलेल्या अंड्यातून जन्माला आलेल्या पापलेट, घोळ, सुरमई, बोंबील आदी माश्यांच्या पिल्लांची मोठ्या प्रमाणात कत्तल ह्यावेळी केली जात आहे. त्यामुळे भविष्यात पापलेट, घोळ, दाढा आदी माशांची आवक घटणार असून त्याचा फटका परंपरागत मच्छीमाराना बसून त्याच्या डोक्यावर असलेला कर्जाचा डोंगर वाढणार आहे.

दुष्काळात तेरावा महिनापर्ससीन नेटचा आणि लिड बल्बचा वापर करुन होणाºया बेसुमार मासेमारीमुळे आधिच मच्छिची संख्या घटली आहे. त्यात मच्छिच्या विणीच्या काळात या बोटी त्यांच्या पिलांची अशा मासेमारीने कत्तल करु लागल्यास समुद्रात मच्छिचा दुष्काळ निर्माण होण्याची दाट शक्यता असते. हे लक्षात घेऊन मत्स्य विभागाने अशा नौकांनवर कठोर कारवाई करणे अपेक्षित आहे. ते न झाल्यास मच्छिमारांन समोरील अडचणीत वाढ घडून येईल.

जिल्ह्यातील सर्व परवाना अधिकारी आणि विविध केंद्रावरील सुरक्षा रक्षकांना बोटीवर लक्ष देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. - दिनेश पाटील, सहाय्यक आयुक्त, मत्स्यव्यवसाय विभाग.

टॅग्स :fishermanमच्छीमार