शहरं
Join us  
Trending Stories
1
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
2
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
3
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
4
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."
5
Photo : चिनाब रेल्वे पूल कमालच! पण भारतातल्या 'या' पूलांचीही जगभरात आहे चर्चा
6
“प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले, पण उत्तर भाजपाने दिले, म्हणजे मॅच फिक्सिंगवर शिकामोर्तबच”
7
Delhi: नऊ वर्षाच्या मुलीवर बलात्कार, सुटकेसमध्ये केलं बंद; रक्तबंबाळ अवस्थेत पडलेली होती चिमुकली
8
मुलाच्या पिंडदानासाठी गेलेल्या आईसह तिघींचा कोरणी घाटात बुडून मृत्यू
9
भारतीय इंजिनिअरचा दुबईमध्ये स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू, पाण्यात उतरल्यानंतर काय झाले की गेला जीव?
10
Monsoon Update : मान्सूनच्या पावसाला कधीपासून सुरुवात होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
11
फिल्मी दुनियेत शिल्पा नावाने प्रसिद्ध, पण खरं नाव दुसरंच, 'या' गोष्टीची तिला आजही वाटते भीती!
12
पाकिस्तानने पुन्हा हात पसरले! अमेरिकेकडून एअर डिफेन्स सिस्टम मागितली
13
धक्कादायक! 'लुटेरी दुल्हन' गँगचा धुमाकूळ, जो समोर आला त्याच्याशी संसार थाटला; ३ वर्षांत २० वेळा लग्न केलं अन्...
14
Rinku Singh अन् Priya Saroj यांच्या साखरपुड्यातील थाट; त्या महागड्या हॉटेलात सर्वात स्वस्त थाळी हजारात
15
धार्मिक भावना दुखावत असतील तर मांसाहारी हॉटेलमध्ये का जाता? ग्राहक आयोगाने मुंबईतील तक्रार फेटाळली 
16
“राहुल गांधी यांच्या प्रश्नांना निवडणूक आयोग वस्तुनिष्ठ उत्तर का देत नाही?”: हर्षवर्धन सपकाळ
17
पुतिन आर्मीने आणखी एका शहरावर फडकावला झेंडा; युक्रेनच्या 20 टक्के भूमिवर मिळवला ताबा
18
टोल मागितल्यावर कर्मचाऱ्याच्या अंगावर घातली गाडी, फरफटत नेत पळाला; चंद्रपुरातील घटना
19
Raja Raghuvanshi : सोनम-राजाचा पाठलाग करत होती 'लाल' कार? नव्या CCTV फुटेजमध्ये दिसली संशयास्पद हालचाल
20
“एकनाथ शिंदेंना नकोत, आदित्य-उद्धव ठाकरेंना त्रास दिला, एकनिष्ठ व्यक्ती हवी”: चंद्रकांत खैरे

आमसभेत विकासाला फाटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2018 03:09 IST

आदिवासी विकास विभागामार्फत कागदोपत्री बांधलेल्या विहिरींचा विषय कळीचा ठरला.

सुरेश काटे।तलासरी : बहुप्रतिक्षित आमसभा बुधवारी संपन्न झाली असेच म्हणावे लागेल. कारण विकासाच्या मद्यांवर चर्चा न होताच ती अटोपती घेतल्याने नागरिक नाराज झाले. तसेच आदिवासी विकास विभागामार्फत कागदोपत्री बांधलेल्या विहिरींचा विषय कळीचा ठरला. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील भ्रष्टाचार यावर कारवाईचे आदेश देण्यात आले असले तरी विविध ग्रामपंचायतीमध्ये झालेला घरकूल घोटाळा चर्चेला येऊ न दिल्याची मॅनेजमेंट सर्वांचाच लक्षात आली.सभेला सुरुवात होताच विविध खात्याच्या प्रमुखाची हजेरी घेता जास्त संख्येने खाते प्रमुख अनुपस्थित होते यावेळी नागरीक संतप्त झाले होते. आमसभेत आदिवासी विकास प्रकल्प डहाणू, शिक्षण , कृषी , बी एस एन एल, वन विभाग, नगर पंचायत, पाणी पुरवठा, एकात्मिक बाल विकास प्रकल्प, मुख्यमंत्री सडक या विभागाचे विषय विशेष चर्चेला आले होते.आमसभेला आमदार पास्कल धनारे, गट विकास अधिकारी बी. एन. नाळे, तहसीलदार विशाल दौडकर, पोलीस निरीक्षक कैलास बर्वे, सभापती संगीता डावरे, उपसभापती वनशा दुमाडा, मुख्याधिकारी सागर साळुंखे, नगराध्यक्ष स्मिता वळवी तसेच जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, तसेच प्रत्येक गावचे सरपंच, नागरीक उपस्थित होते.आदिवासी विकास विभाग मार्फत २००९ मध्ये लाभार्थ्यांना देण्यात आलेल्या विहिरी बांधून न देता अधिकाऱ्यांनी पूर्णत्वाचे दाखले देऊन आलेला निधी अधिकाºयांनी व ठेकेदाराने हडपला हे निदर्शनात आणून देताच अशावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले. तसेच बाल विकास प्रकल्पात गेल्या वर्षी कपाट घोटाळा झाला त्याचा अहवाल गेल्या वर्षी पासून मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्या कडे कारवाई साठी पडून आहे त्या चा पाठपुरावा करण्याचे अध्यक्षांनी विभागप्रमुखाला सांगितले. शिक्षण विभागाने शाळा दुरु स्ती चे प्रस्ताव जिल्ह्याला पाठविले आहेत असे गट शिक्षण अधिकारी सदानंद जनाथे यांनी सांगताच विद्यार्थ्यांचे बळी पडल्यावर कारवाई करणार का असा संतप्त सवाल जनते ने करताच पाठपुरावा करण्या विषयी सांगण्यात आले. तालुक्यात मुख्यमंत्री सडकची कामे निकृष्ट होत असल्याचे लोकांनी सांगितले. उधव्यात मोठ्या प्रमाणात स्फोटाचा वापर करून दगड उत्खनन केले जात असल्याचे तहसीलदार विशाल दौडकर यांच्या निदर्शनात आणून देताच कारवाईचे आश्वासन दिले. उधवा वन विभागाने सुत्रकार येथे २५८०० वृक्ष लागवड केल्याचे सांगताच एवढी वृक्ष लागवड होऊनही जंगले उजाड का हा प्रश्न जनतेने विचारताच आमदारा सह सगळ्यानी पाहणी करण्याचे ठरविले, कृषी विभाग लाभार्थ्यांना लाभ देताना विधवा महिलांचा प्राधान्याने विचार करीत नसल्याचे झाई बोरीगावाचे उप सरपंच अर्जुन वांगड यांनी सांगितलेतलासरी ची पाणी पुरवठा योजना तयार असून पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाºयां च्या मनमानी मुळे लोकांना पाणी मिळत नाही एक महिन्यात फक्त २० नळ कनेक्शन दिले असताना विभागाचे अधिकारी आर. ऐ. पाटील यांनी काम प्रगती पथावर असल्याचे उत्तर दिले. तालुक्यात मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायती मध्ये घरकुल घोटाळा असताना त्याचा विषय अधिकाºयांनी चर्चेला येऊ दिला नाही. तालुक्याच्या विकास संदर्भात आमसभा असताना अधिकारी मनमानी उत्तरे देत होत, यावरून अधिकाºयांवर कोणाचाही अंकुश नसल्याचे दिसून आले.जनता त्रस्त बाबू मस्तउपस्थितांनी आमसभेला जर अधिकारी उपस्थित राहत नसतील तर सभा बरखास्त करा असा आग्रह धरताच काही खात्याचे अधिकारी उपस्थित झाले. यावेळी गैरहजर अधिकाºयांवर कारवाईची मागणी करण्यात आली.महत्वाचे म्हणजे आमसभा भर दुपारी घेण्यात आल्याने अनेकांना त्रास झाला. तर काहींनी तेथे जाणे टाळले. एकीकडे अधिकाºयांची गैरहजेरी तर दुसरीकडे कडक उन्हाची वेळ याने तिस फटका बसला.

टॅग्स :Waterपाणी