शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

आमसभेत विकासाला फाटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2018 03:09 IST

आदिवासी विकास विभागामार्फत कागदोपत्री बांधलेल्या विहिरींचा विषय कळीचा ठरला.

सुरेश काटे।तलासरी : बहुप्रतिक्षित आमसभा बुधवारी संपन्न झाली असेच म्हणावे लागेल. कारण विकासाच्या मद्यांवर चर्चा न होताच ती अटोपती घेतल्याने नागरिक नाराज झाले. तसेच आदिवासी विकास विभागामार्फत कागदोपत्री बांधलेल्या विहिरींचा विषय कळीचा ठरला. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील भ्रष्टाचार यावर कारवाईचे आदेश देण्यात आले असले तरी विविध ग्रामपंचायतीमध्ये झालेला घरकूल घोटाळा चर्चेला येऊ न दिल्याची मॅनेजमेंट सर्वांचाच लक्षात आली.सभेला सुरुवात होताच विविध खात्याच्या प्रमुखाची हजेरी घेता जास्त संख्येने खाते प्रमुख अनुपस्थित होते यावेळी नागरीक संतप्त झाले होते. आमसभेत आदिवासी विकास प्रकल्प डहाणू, शिक्षण , कृषी , बी एस एन एल, वन विभाग, नगर पंचायत, पाणी पुरवठा, एकात्मिक बाल विकास प्रकल्प, मुख्यमंत्री सडक या विभागाचे विषय विशेष चर्चेला आले होते.आमसभेला आमदार पास्कल धनारे, गट विकास अधिकारी बी. एन. नाळे, तहसीलदार विशाल दौडकर, पोलीस निरीक्षक कैलास बर्वे, सभापती संगीता डावरे, उपसभापती वनशा दुमाडा, मुख्याधिकारी सागर साळुंखे, नगराध्यक्ष स्मिता वळवी तसेच जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, तसेच प्रत्येक गावचे सरपंच, नागरीक उपस्थित होते.आदिवासी विकास विभाग मार्फत २००९ मध्ये लाभार्थ्यांना देण्यात आलेल्या विहिरी बांधून न देता अधिकाऱ्यांनी पूर्णत्वाचे दाखले देऊन आलेला निधी अधिकाºयांनी व ठेकेदाराने हडपला हे निदर्शनात आणून देताच अशावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले. तसेच बाल विकास प्रकल्पात गेल्या वर्षी कपाट घोटाळा झाला त्याचा अहवाल गेल्या वर्षी पासून मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्या कडे कारवाई साठी पडून आहे त्या चा पाठपुरावा करण्याचे अध्यक्षांनी विभागप्रमुखाला सांगितले. शिक्षण विभागाने शाळा दुरु स्ती चे प्रस्ताव जिल्ह्याला पाठविले आहेत असे गट शिक्षण अधिकारी सदानंद जनाथे यांनी सांगताच विद्यार्थ्यांचे बळी पडल्यावर कारवाई करणार का असा संतप्त सवाल जनते ने करताच पाठपुरावा करण्या विषयी सांगण्यात आले. तालुक्यात मुख्यमंत्री सडकची कामे निकृष्ट होत असल्याचे लोकांनी सांगितले. उधव्यात मोठ्या प्रमाणात स्फोटाचा वापर करून दगड उत्खनन केले जात असल्याचे तहसीलदार विशाल दौडकर यांच्या निदर्शनात आणून देताच कारवाईचे आश्वासन दिले. उधवा वन विभागाने सुत्रकार येथे २५८०० वृक्ष लागवड केल्याचे सांगताच एवढी वृक्ष लागवड होऊनही जंगले उजाड का हा प्रश्न जनतेने विचारताच आमदारा सह सगळ्यानी पाहणी करण्याचे ठरविले, कृषी विभाग लाभार्थ्यांना लाभ देताना विधवा महिलांचा प्राधान्याने विचार करीत नसल्याचे झाई बोरीगावाचे उप सरपंच अर्जुन वांगड यांनी सांगितलेतलासरी ची पाणी पुरवठा योजना तयार असून पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाºयां च्या मनमानी मुळे लोकांना पाणी मिळत नाही एक महिन्यात फक्त २० नळ कनेक्शन दिले असताना विभागाचे अधिकारी आर. ऐ. पाटील यांनी काम प्रगती पथावर असल्याचे उत्तर दिले. तालुक्यात मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायती मध्ये घरकुल घोटाळा असताना त्याचा विषय अधिकाºयांनी चर्चेला येऊ दिला नाही. तालुक्याच्या विकास संदर्भात आमसभा असताना अधिकारी मनमानी उत्तरे देत होत, यावरून अधिकाºयांवर कोणाचाही अंकुश नसल्याचे दिसून आले.जनता त्रस्त बाबू मस्तउपस्थितांनी आमसभेला जर अधिकारी उपस्थित राहत नसतील तर सभा बरखास्त करा असा आग्रह धरताच काही खात्याचे अधिकारी उपस्थित झाले. यावेळी गैरहजर अधिकाºयांवर कारवाईची मागणी करण्यात आली.महत्वाचे म्हणजे आमसभा भर दुपारी घेण्यात आल्याने अनेकांना त्रास झाला. तर काहींनी तेथे जाणे टाळले. एकीकडे अधिकाºयांची गैरहजेरी तर दुसरीकडे कडक उन्हाची वेळ याने तिस फटका बसला.

टॅग्स :Waterपाणी