शहरं
Join us  
Trending Stories
1
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
2
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
3
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
4
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
5
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
6
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
7
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
8
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
9
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
10
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
11
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
12
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
13
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
14
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
15
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
16
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
17
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
18
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
19
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
20
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?

कोरोना प्रादुर्भावाच्या काळात लिंबाने खाल्ला भलताच भाव - एका नगाला चक्क १० रुपये! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 23:52 IST

कडक उन्हाळा वाढू लागल्यामुळे सरबतासाठीही लिंबांची मागणी वाढली आहे. त्यामुळे उत्तम प्रतीच्या लिंबांचा भाव सध्या बाजारात अक्षरशः प्रतिनग १० रुपयांवर गेला आहे.

आशिष राणेलोकमत न्यूज नेटवर्क वसई : कोरोना संक्रमणकाळात शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी व्हिटॅमिन म्हणून भाज्या, गोळ्या आणि खासकरून 'क' जीवनसत्त्व पदार्थांचे सेवन करण्याचा वैद्यकीय सल्ला सर्वांनाच दिला जात आहे. दुसरीकडे आजीबाईचा बटवा वाचला, तर रोगाचा प्रादुर्भाव होतो तेव्हा किंवा कडक उन्हाळ्यात 'क' जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात लागते. त्यामुळे ‘क’ जीवनसत्त्व असलेल्या लिंबांचे सेवन करण्याकडे नागरिकांचा कल मोठ्या प्रमाणावर वाढला असून मागणी वाढल्याने लिंबांच्या भावातही वाढ होऊन वसईत आता एका नगाला १० रुपये मोजावे लागत आहेत.

कडक उन्हाळा वाढू लागल्यामुळे सरबतासाठीही लिंबांची मागणी वाढली आहे. त्यामुळे उत्तम प्रतीच्या लिंबांचा भाव सध्या बाजारात अक्षरशः प्रतिनग १० रुपयांवर गेला आहे. मागील महिन्याच्या अखेरीस ही लिंबं १० रुपयांना चार-पाच मिळायची. मात्र, आता ते दिवस गेले, असे ग्राहक म्हणतात. एकीकडे मागणी वाढली असताना कमी उत्पादनामुळे लिंबांची आवक घटल्याने लिंबांच्या किमतीत वाढ झाल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.वसईत किंवा पालघर जिल्ह्यात कुठेही लिंबांची शेती नाही. त्यामुळे जवळील ठाणे, मुंबई, नवी मुंबई तसेच इतर जिल्ह्यांतील सोलापूर, अहमदनगर, बीड तसेच कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या राज्यांतून लिंबांची आवक होत असते. उन्हाळ्याच्या काळात लिंबांची मागणी वाढते, मात्र आवक तुलनेने कमी प्रमाणात होत असते. दुसरीकडे कोरोनाची बाधा होऊ नये म्हणून अनेक जण काळजी घेत असून त्याचबरोबर दैनंदिन आहाराकडेही लक्ष देत आहेत. त्यामध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी नागरिक 'क' जीवनसत्त्व असलेल्या लिंबांचा वापर करू लागले आहेत. आधीच उन्हाळ्यात लिंबांची मागणी वाढली असतानाच कोरोनाकाळामुळे लिंबांना मोठी मागणी येऊ लागली आहे.

आवक झाली कमी वसई तालुक्यांतील बाजारांत सध्या लिंबांची आवक खूपच कमी झाली आहे, मात्र त्याच वेळी मागणीत मोठी वाढ झाली आहे. ही तफावत होऊ लागल्याने लिंबांचे दर प्रतिनग १० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत, अशी माहिती माणिकपूर येथील अशोक पांडे व दत्ता पाटील या विक्रेत्यांनी ‘लोकमत’ला दिली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या