शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
3
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
4
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
5
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
6
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
7
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
8
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
9
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
10
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
11
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
12
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
13
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
14
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
15
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
16
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
17
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
18
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
19
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
20
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं

वसई-विरार परिसरातील पर्यावरण संरक्षित क्षेत्र धोक्यात, भूमाफियांनी बळकावले भूखंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2021 01:16 IST

Vasai-Virar News : वसईत भूमाफियांनी उच्छाद मांडला असून शहरातील आरक्षित आणि पर्यावरणदृष्ट्या संरक्षित भूखंड बळकावण्याचा सपाटा लावला आहे. त्यांच्या या कृत्यामुळे पर्यावरणाचीही हानी हाेत आहे.

- प्रतीक ठाकूर विरार - वसईत भूमाफियांनी उच्छाद मांडला असून शहरातील आरक्षित आणि पर्यावरणदृष्ट्या संरक्षित भूखंड बळकावण्याचा सपाटा लावला आहे. त्यांच्या या कृत्यामुळे पर्यावरणाचीही हानी हाेत आहे. या क्षेत्रात बेकायदा बांधकामांचा फास घट्ट आवळला जात असताना स्थानिक प्रशासन मात्र केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याची खंत पर्यावरणप्रेमी व्यक्त करत आहेत.वसईतील पर्यावरण समतोल राखण्यासाठी शासनाने वसईतील २८ गावे ही पर्यावरण संरक्षित क्षेत्र म्हणून घोषित केली होती. त्यानुसार या गावांत आणि गावालगत एक किलोमीटरच्या आसपास बांधकामांना परवानगी नाकारली होती. यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात एप्रिल २०१९ रोजी दाखल एका जनहित याचिकेवर सुनावणीदरम्यान न्यायालयाने आयुक्तांना सर्वेक्षण करून या परिसरातील बेकायदा बांधकामांवर कारवाई करण्याचे आदेश दिले हाेते. मात्र, पालिकेने या आदेशांचे पालन केलेले नाही. उलट या भागात वर्षभरात बेकायदा बांधकामे आणखीन फाेफावल्याचे दिसत आहे. शासनाने वसई-विरार परिसरातील २८ गावे ही पर्यावरण संरक्षित क्षेत्र म्हणून घोषित केली आहेत. त्यात तुंगारेश्वर, पारोळ, कणेर, पोमण, सिरसाड, पेल्हार, वालीव, कामण, कोल्ही, देवदल, चिंचोटी, चंद्रपाडा, टिवरी, राजिवली, सातिवली, खैरपाडा, कनेर, मांडवी आदी गावांचा समावेश आहे. मात्र, काही महिन्यांत या गावांत मोठ्या प्रमाणात बेकायदा बांधकामे झाली आहेत. त्यासाठी तिवरांच्या झाडांची कत्तल करण्यात आली आहे. नैसर्गिक नाले, तलाव, डोंगर, खाडी बुजवून ही बांधकामे उभी राहिली आहेत. येथील कारखान्यांतील रसायनयुक्त पाण्यामुळे नैसर्गिक जलस्राेत दूषित हाेत आहेत. प्रभाग एफ आणि जी मधील उमर कम्पाउंड, जाबरपाडा, वनोटापाडा, रिचर्ड कम्पाउंड, खैरपाडा, तुंगारेश्वर, चिंचोटी, कामण, भोयदापाडा, राजिवली, राजप्रभा, धुमालनगर या परिसरात बेकायदा बांधकामे सुरू आहेत. 

बेकायदा बांधकामांचा विषय महापालिकेने गांभीर्याने घेतला आहे. प्रभाग समिती सहायक आयुक्तांना यासंदर्भात आदेश देण्यात आले आहेत. पर्यावरण संरक्षित क्षेत्रातील बेकायदा बांधकामांवर कारवाई केली जाईल.- आशिष पाटील, अतिरिक्त आयुक्त, वसई-विरार महापालिका

टॅग्स :Vasai Virarवसई विरार