शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
9
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
10
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
11
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
12
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
13
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
14
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
15
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
16
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
17
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
18
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
19
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
20
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना

एन्काउंटरची सीआयडी चौकशी; उच्च न्यायालयाचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2018 22:32 IST

नालासोपाऱ्यातील जोगेंद्र राणा प्रकरणात तुळिंज पोलीस कटघऱ्यात

नालासोपारा : जुलै महिन्यात नालासोपारा पूर्व येथे जोगेंद्र राणा याची तुळींज पोलीसांशी झालेल्या चकमकीत गोळ्या घालून एन्काउंटर केले होते. त्यानंतर त्याचा भाऊ सुरेंद्र उर्फ सोन्याचे राणा याने ही चकमक खोटी असल्याचे सांगत माझ्या भावाची दिवसाढवळ्या पोलिसांनी हत्या केली असल्याचा आरोप करत मूंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती याबाबत आता सीआयडीमार्फत चौकशी करण्यात यावी असा आदेश मूंबई उच्च न्यायालयाच्या द्विसदस्यीय खंडपीठाने मंगळवारी राज्य सरकारला दिले आहेत.२३ जुलै रोजी जोगेंद्र राणा याने पालघर गुन्हे शाखेतील हेड कॉन्स्टेबल मंगेश चव्हाण व मनोज सकपाळ यांच्यावर धारदार चाकूने हल्ला केला होता. यावेळी स्वसंरक्षणार्थ पोलिसांनी केलेल्या गोळीबारात राणाचा जागीच मृत्यू झाला. मात्र मृत जोगेंद्रचा भाऊ सोनु राणा याने पोलिसांनी खोट्या चकमकीत भावाची हत्या केली असल्याचा आरोप करत न्यायासाठी न्यायालयात धाव घेतली होती. त्यानुसार मंगळवारी मूंबई उच्च न्यायालयाने उपलब्ध पुराव्यानुसार निरीक्षणे नोंदवून न्यायमूर्ती रणजित मोरे व न्यायमूर्ती भारती डोंगरे यांच्या खंडपीठाने राज्य सरकारला भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले होते. उपलब्ध पुरावे व माहिती लक्षात घेता हे प्रकरण सीआयडीमार्फत हाताळले जावे, तसेच चौकशीअंती चकमक बनावट असल्याचे निष्पन्न झाल्यास दोंन्ही पोलिसांविरोधात नवा एफआयआर दाखल करावा असे स्पष्ट निर्देश खंडपीठाने त्यात दिले आहेत.चाकूने हल्ला केला मग कुणीच जखमी कसे नव्हतेजोगेंद्रची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची होती. मात्र त्याने शिक्षा भोगली होती. त्याने नोकरीही शोधली होती. २३ जुलै रोजी नालासोपारा पूर्व येथे मित्रांसोबत वडापावच्या दुकानावर वडापाव खात असताना दोन्ही पोलिसांनी त्याला हटकले व पैशाची मागणी केली होती. मात्र पैसे नसल्यामुळे व पोलिसांनी धमकावल्यामुळे जोगेंद्र राणा तेथून पळून जात असताना पोलिसांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या. त्यात त्याचा मृत्यू झाला. मात्र त्याने पोलिसांवर धारदार चाकूने हल्ला केल्यामुळे स्वसंरक्षणार्थ चव्हाण याने त्याच्यावर दोनदा गोळ्या झाडल्याचा दावा सरकारतर्फे करण्यात आला. मात्र, या घटनेनंतर जखमी झालेल्या पोलिसाच्या अंगावर कोणतीही जखम नसणे याबाबत अँड. माने यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले होते.या घटनेनंतर त्यावेळी कार्यरत असलेले पालघर पोलीस अधिक्षक मंजुनाथ सिंगे यांनी गंभीर दखल घेत जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यातील १२ पोलीसांकडील पिस्तूल काढून घेण्याचा निर्णय घेतला होता. हे खबरदारीचा उपाय म्हणून हे पाऊल उचलण्याचा बोलले जात होते.सदर घटनेनंतर ३०७ च्या कलमानुसार एफआयआर दाखल करण्यात आला होता. सद्या तो विषय न्यायप्रविष्ट आहे, त्यामूळे अधिक माहिती देणे उचित होणार नाही.-विजयकांत सागर,अप्पर पोलिस अधीक्षक, वसईया घटनेनंतर चौकशी करण्यात आली होती. चाकू हल्ल्यात एक पोलीस किरकोळ जखमी झाला होता. मृत जोगेंद्र सोबत असलेल्या प्रत्यक्षदर्शींनी पुढे येऊन माहिती द्यायला हवी होती.- गौरव सिंग, पोलीस अधिक्षक

टॅग्स :Mumbai High Courtमुंबई हायकोर्ट