शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

एन्काउंटरची सीआयडी चौकशी; उच्च न्यायालयाचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2018 22:32 IST

नालासोपाऱ्यातील जोगेंद्र राणा प्रकरणात तुळिंज पोलीस कटघऱ्यात

नालासोपारा : जुलै महिन्यात नालासोपारा पूर्व येथे जोगेंद्र राणा याची तुळींज पोलीसांशी झालेल्या चकमकीत गोळ्या घालून एन्काउंटर केले होते. त्यानंतर त्याचा भाऊ सुरेंद्र उर्फ सोन्याचे राणा याने ही चकमक खोटी असल्याचे सांगत माझ्या भावाची दिवसाढवळ्या पोलिसांनी हत्या केली असल्याचा आरोप करत मूंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती याबाबत आता सीआयडीमार्फत चौकशी करण्यात यावी असा आदेश मूंबई उच्च न्यायालयाच्या द्विसदस्यीय खंडपीठाने मंगळवारी राज्य सरकारला दिले आहेत.२३ जुलै रोजी जोगेंद्र राणा याने पालघर गुन्हे शाखेतील हेड कॉन्स्टेबल मंगेश चव्हाण व मनोज सकपाळ यांच्यावर धारदार चाकूने हल्ला केला होता. यावेळी स्वसंरक्षणार्थ पोलिसांनी केलेल्या गोळीबारात राणाचा जागीच मृत्यू झाला. मात्र मृत जोगेंद्रचा भाऊ सोनु राणा याने पोलिसांनी खोट्या चकमकीत भावाची हत्या केली असल्याचा आरोप करत न्यायासाठी न्यायालयात धाव घेतली होती. त्यानुसार मंगळवारी मूंबई उच्च न्यायालयाने उपलब्ध पुराव्यानुसार निरीक्षणे नोंदवून न्यायमूर्ती रणजित मोरे व न्यायमूर्ती भारती डोंगरे यांच्या खंडपीठाने राज्य सरकारला भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले होते. उपलब्ध पुरावे व माहिती लक्षात घेता हे प्रकरण सीआयडीमार्फत हाताळले जावे, तसेच चौकशीअंती चकमक बनावट असल्याचे निष्पन्न झाल्यास दोंन्ही पोलिसांविरोधात नवा एफआयआर दाखल करावा असे स्पष्ट निर्देश खंडपीठाने त्यात दिले आहेत.चाकूने हल्ला केला मग कुणीच जखमी कसे नव्हतेजोगेंद्रची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची होती. मात्र त्याने शिक्षा भोगली होती. त्याने नोकरीही शोधली होती. २३ जुलै रोजी नालासोपारा पूर्व येथे मित्रांसोबत वडापावच्या दुकानावर वडापाव खात असताना दोन्ही पोलिसांनी त्याला हटकले व पैशाची मागणी केली होती. मात्र पैसे नसल्यामुळे व पोलिसांनी धमकावल्यामुळे जोगेंद्र राणा तेथून पळून जात असताना पोलिसांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या. त्यात त्याचा मृत्यू झाला. मात्र त्याने पोलिसांवर धारदार चाकूने हल्ला केल्यामुळे स्वसंरक्षणार्थ चव्हाण याने त्याच्यावर दोनदा गोळ्या झाडल्याचा दावा सरकारतर्फे करण्यात आला. मात्र, या घटनेनंतर जखमी झालेल्या पोलिसाच्या अंगावर कोणतीही जखम नसणे याबाबत अँड. माने यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले होते.या घटनेनंतर त्यावेळी कार्यरत असलेले पालघर पोलीस अधिक्षक मंजुनाथ सिंगे यांनी गंभीर दखल घेत जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यातील १२ पोलीसांकडील पिस्तूल काढून घेण्याचा निर्णय घेतला होता. हे खबरदारीचा उपाय म्हणून हे पाऊल उचलण्याचा बोलले जात होते.सदर घटनेनंतर ३०७ च्या कलमानुसार एफआयआर दाखल करण्यात आला होता. सद्या तो विषय न्यायप्रविष्ट आहे, त्यामूळे अधिक माहिती देणे उचित होणार नाही.-विजयकांत सागर,अप्पर पोलिस अधीक्षक, वसईया घटनेनंतर चौकशी करण्यात आली होती. चाकू हल्ल्यात एक पोलीस किरकोळ जखमी झाला होता. मृत जोगेंद्र सोबत असलेल्या प्रत्यक्षदर्शींनी पुढे येऊन माहिती द्यायला हवी होती.- गौरव सिंग, पोलीस अधिक्षक

टॅग्स :Mumbai High Courtमुंबई हायकोर्ट