शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
3
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
4
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
5
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
6
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
7
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
8
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
9
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
10
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
11
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
12
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
13
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
14
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
15
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
16
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
17
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
18
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
19
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
20
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
Daily Top 2Weekly Top 5

मोहाच्या फळांमुळे आदिवासींना रोजगार

By admin | Updated: April 9, 2017 00:49 IST

विक्रमगड, जव्हार, मोखाडा अशा आदिवासी दुर्गम भागातील जंगले हे औषधी वनस्पती, रानभाज्या यामुळे बऱ्याचदा आदिवासी जनांचा आर्थिक आधार बनतात. सध्या येथील

विक्रमगड, जव्हार, मोखाडा अशा आदिवासी दुर्गम भागातील जंगले हे औषधी वनस्पती, रानभाज्या यामुळे बऱ्याचदा आदिवासी जनांचा आर्थिक आधार बनतात. सध्या येथील मोहाचे वृक्ष त्यांच्या उदरनिर्वाहाचे साधन बनले आहेत़ याकाळात मोहाच्या वृक्षांना फुले बहरली आहेत़ ही फुले पहाटच्या सुमारास मोठयासंख्येने झाडाखाली पडलेली असल्याने ती वेचण्याचे काम होत असून त्यापासून मुख्यत: दारु होत असल्याने तसेच औषधी म्हणून तिचा उपयोग सर्वश्रुत असल्याने ती नगदी कमाई ठरत आहे.मोहाचे झाड म्हणजे शेतकरी मजुंराची पडती बाजुच समजली जाते़ ग्रामीण भागात आंब्यांच्या झाडानंतर दुसरा क्रमांक मोहाच्या झाडाचा लागतो़ मोहाच्या झाडापासून शेतकऱ्याला स्वत:चे उन, वारा, पाऊस यांपासून रक्षण करण्याकरीता लाकूड तर मिळतेच पण पावसाळयात नवीन फुटलेली पालवी उन्हाच्या तिव्र उष्णतेने सुकून जातात़ परिणामी वाऱ्यामुळे जमीनीवर पाला-पाचोळा तयार होतो़ व तो या दिवसांत शेतीची राबनी करण्याकरीता वापरला जातो़मोहाच्या झाडांच्या वाढत्या उपयोगामुळे गोरगरीब शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारी रासायनिक खते तर महागाईच्या भडक्याचा विचार केला तर बाजारात खाद्यतेलाला प्रतिकलो ७० तेक ८० रुपये भावाप्रमाणे शेतकऱ्यांची वार्षिक २० ते ३० हजार रुपये बचत होत असते़ तर फुलांपासून रोजगारही प्राप्त होतो़ यामुळे मोहाचे झाड आदिवासी गोरगरिब शेतकरी, मजुरांसाठी जणू फलदायीच बनले आहे़या झाला पिवळया रंगाची फुले येतात़ उष्णता फळास लागली की, ती फुले खाली पडतात़ ही फुले आदिवासी सकाळ, दुपारपर्यतच्या वेळेत वेचुन उन्हात सुकवतात़ कालातंराने या फुलांस भाव मिळाला तर २० ते ३५ रुपये किलोने विकून गावठी दारु बनविली जाते़ तसेच तिचा औषध म्हणून वापर होत असतो.फुलानंतर मोहाच्या झाडाला काही दिवसांनंतर फळे येतात. या भागात या फळांना दोडें (मोहटया) म्हणुन संबोधतात़ काही वेळेस कवळया दोडयापासून स्वादिष्ट भाजीचे साधन म्हणून मोहटया तयार केल्या जातात़ त्या सकवून बारमाही केव्हाही भाजीसाठी वापर केला जातो़ तर पिकलेल्या दोंडयामधून पाच ते सहा बिया मिळतात़आदिवासी दिवसभर २ ते ३ टोपल्या जमा करतो़ त्यानंतर त्या बिया फोडल्या असता यामधून दोन दले मिळतात़ त्यास आदिवासी लोक डाळिंब संबोधतात़ ही दले सुकवितात़ दरम्यानच्या मोसमात एक व्यक्ती प्रतिकुंटुंब एक क्विंटलच्या आसपास ही दले तेलाच्या कारखान्यात नेतात़ त्यापासून किमान ५० ते ६० किलो खाद्यतेल मिळते़फळ एक फायदे अनेकसुरुवातीला तेलाला तीव्र उष्णतेत कढवावे लागते़ तर कडूपणा काढण्यासाठी त्या तेलात नागलीच्या पिठाची छोटी भाकर टाकली जाते़ परिणामी त्यापासून तेलातील मैला व कडूपणा नष्ट होवुन तेल खाण्यास योग्य होते. रुग्ण चिकित्सा करतांना या कच्चा तेलाचा उपयोग होत असून थंडी ताप आल्यास कपाळावर रुमाल भिजवून ठेवला असाता आरोम मिळतो अशी मान्यता आहे. शिवाय, यातील फळांच्या टरफलांपासून शेतात खतही तयार होते़ फळ फोडल्यानंतरही टरफले शेतात टाकली जातात़ पाऊस पडल्यानंतर ही टरफले जमीनीत कुजली जातात़ त्यातून खतनिर्मीती होऊन पिकेही भरभरुन येत असतात़