शहरं
Join us  
Trending Stories
1
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
2
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
3
बसच्या तिकिटामुळे हत्या उघडकीस आली! पाच वर्षाचे रिलेशन, लग्नाची इच्छा, घडलं वेगळंच
4
Air India Plane Crash: 'असं वाटलं पाकिस्ताननेच मिसाईल हल्ला केला, चार मित्र गमावले'; अपघातातून वाचलेल्या केशवने सांगितला थरार
5
ठाकरेंसोबत रात्रीतून खेळ झाला! काल मातोश्रीवर आलेले 'ते' दोन नेते आज शिंदेंच्या शिवसेनेत
6
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
7
लीड्स टेस्टपूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका, 259 धावा करणाऱ्या 'या' क्रिकेटरला दुखापत! नेमकं काय घडलं? आता कशी असेल प्लेइंग 11?
8
Ashadhi Ekadashi 2025: संत नामदेवांनी पांडुरंगाच्या आरतीत उल्लेखलेली 'राही' नेमकी कोण?
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांना वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले...
10
चालत्या रिक्षात अचानक झाला स्फोट; आगीत महिला प्रवासी जिवंत जळाली, ५ जण जखमी
11
अहमदाबाद विमान अपघात: Air India ४,०८० कोटी रुपयांचा 'इन्श्युरन्स क्लेम' करणार, इतिहासातील सर्वाधिक आकडा ठरणार?
12
Shree Swami Samarth: एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
13
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
14
Monolithisch India IPO Listing: ६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
15
प्यार तूने क्या किया! बॉयफ्रेंडच्या घरात बसलेली बायको, संतापलेल्या नवऱ्याने घेतला नाकाचा चावा
16
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग
17
Israel Rran War: अमेरिका आणि इस्रायलला इराणच्या अयातुल्लाह खामेनींनाच का संपवायचं आहे?
18
मायक्रोसॉफ्टमध्ये पुन्हा नोकरकपात: हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार! AI खाणार का तुमच्या नोकऱ्या?
19
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, सात जण जखमी
20
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं

मोहाच्या फळांमुळे आदिवासींना रोजगार

By admin | Updated: April 9, 2017 00:49 IST

विक्रमगड, जव्हार, मोखाडा अशा आदिवासी दुर्गम भागातील जंगले हे औषधी वनस्पती, रानभाज्या यामुळे बऱ्याचदा आदिवासी जनांचा आर्थिक आधार बनतात. सध्या येथील

विक्रमगड, जव्हार, मोखाडा अशा आदिवासी दुर्गम भागातील जंगले हे औषधी वनस्पती, रानभाज्या यामुळे बऱ्याचदा आदिवासी जनांचा आर्थिक आधार बनतात. सध्या येथील मोहाचे वृक्ष त्यांच्या उदरनिर्वाहाचे साधन बनले आहेत़ याकाळात मोहाच्या वृक्षांना फुले बहरली आहेत़ ही फुले पहाटच्या सुमारास मोठयासंख्येने झाडाखाली पडलेली असल्याने ती वेचण्याचे काम होत असून त्यापासून मुख्यत: दारु होत असल्याने तसेच औषधी म्हणून तिचा उपयोग सर्वश्रुत असल्याने ती नगदी कमाई ठरत आहे.मोहाचे झाड म्हणजे शेतकरी मजुंराची पडती बाजुच समजली जाते़ ग्रामीण भागात आंब्यांच्या झाडानंतर दुसरा क्रमांक मोहाच्या झाडाचा लागतो़ मोहाच्या झाडापासून शेतकऱ्याला स्वत:चे उन, वारा, पाऊस यांपासून रक्षण करण्याकरीता लाकूड तर मिळतेच पण पावसाळयात नवीन फुटलेली पालवी उन्हाच्या तिव्र उष्णतेने सुकून जातात़ परिणामी वाऱ्यामुळे जमीनीवर पाला-पाचोळा तयार होतो़ व तो या दिवसांत शेतीची राबनी करण्याकरीता वापरला जातो़मोहाच्या झाडांच्या वाढत्या उपयोगामुळे गोरगरीब शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारी रासायनिक खते तर महागाईच्या भडक्याचा विचार केला तर बाजारात खाद्यतेलाला प्रतिकलो ७० तेक ८० रुपये भावाप्रमाणे शेतकऱ्यांची वार्षिक २० ते ३० हजार रुपये बचत होत असते़ तर फुलांपासून रोजगारही प्राप्त होतो़ यामुळे मोहाचे झाड आदिवासी गोरगरिब शेतकरी, मजुरांसाठी जणू फलदायीच बनले आहे़या झाला पिवळया रंगाची फुले येतात़ उष्णता फळास लागली की, ती फुले खाली पडतात़ ही फुले आदिवासी सकाळ, दुपारपर्यतच्या वेळेत वेचुन उन्हात सुकवतात़ कालातंराने या फुलांस भाव मिळाला तर २० ते ३५ रुपये किलोने विकून गावठी दारु बनविली जाते़ तसेच तिचा औषध म्हणून वापर होत असतो.फुलानंतर मोहाच्या झाडाला काही दिवसांनंतर फळे येतात. या भागात या फळांना दोडें (मोहटया) म्हणुन संबोधतात़ काही वेळेस कवळया दोडयापासून स्वादिष्ट भाजीचे साधन म्हणून मोहटया तयार केल्या जातात़ त्या सकवून बारमाही केव्हाही भाजीसाठी वापर केला जातो़ तर पिकलेल्या दोंडयामधून पाच ते सहा बिया मिळतात़आदिवासी दिवसभर २ ते ३ टोपल्या जमा करतो़ त्यानंतर त्या बिया फोडल्या असता यामधून दोन दले मिळतात़ त्यास आदिवासी लोक डाळिंब संबोधतात़ ही दले सुकवितात़ दरम्यानच्या मोसमात एक व्यक्ती प्रतिकुंटुंब एक क्विंटलच्या आसपास ही दले तेलाच्या कारखान्यात नेतात़ त्यापासून किमान ५० ते ६० किलो खाद्यतेल मिळते़फळ एक फायदे अनेकसुरुवातीला तेलाला तीव्र उष्णतेत कढवावे लागते़ तर कडूपणा काढण्यासाठी त्या तेलात नागलीच्या पिठाची छोटी भाकर टाकली जाते़ परिणामी त्यापासून तेलातील मैला व कडूपणा नष्ट होवुन तेल खाण्यास योग्य होते. रुग्ण चिकित्सा करतांना या कच्चा तेलाचा उपयोग होत असून थंडी ताप आल्यास कपाळावर रुमाल भिजवून ठेवला असाता आरोम मिळतो अशी मान्यता आहे. शिवाय, यातील फळांच्या टरफलांपासून शेतात खतही तयार होते़ फळ फोडल्यानंतरही टरफले शेतात टाकली जातात़ पाऊस पडल्यानंतर ही टरफले जमीनीत कुजली जातात़ त्यातून खतनिर्मीती होऊन पिकेही भरभरुन येत असतात़