शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

मोहाच्या फळांमुळे आदिवासींना रोजगार

By admin | Updated: April 9, 2017 00:49 IST

विक्रमगड, जव्हार, मोखाडा अशा आदिवासी दुर्गम भागातील जंगले हे औषधी वनस्पती, रानभाज्या यामुळे बऱ्याचदा आदिवासी जनांचा आर्थिक आधार बनतात. सध्या येथील

विक्रमगड, जव्हार, मोखाडा अशा आदिवासी दुर्गम भागातील जंगले हे औषधी वनस्पती, रानभाज्या यामुळे बऱ्याचदा आदिवासी जनांचा आर्थिक आधार बनतात. सध्या येथील मोहाचे वृक्ष त्यांच्या उदरनिर्वाहाचे साधन बनले आहेत़ याकाळात मोहाच्या वृक्षांना फुले बहरली आहेत़ ही फुले पहाटच्या सुमारास मोठयासंख्येने झाडाखाली पडलेली असल्याने ती वेचण्याचे काम होत असून त्यापासून मुख्यत: दारु होत असल्याने तसेच औषधी म्हणून तिचा उपयोग सर्वश्रुत असल्याने ती नगदी कमाई ठरत आहे.मोहाचे झाड म्हणजे शेतकरी मजुंराची पडती बाजुच समजली जाते़ ग्रामीण भागात आंब्यांच्या झाडानंतर दुसरा क्रमांक मोहाच्या झाडाचा लागतो़ मोहाच्या झाडापासून शेतकऱ्याला स्वत:चे उन, वारा, पाऊस यांपासून रक्षण करण्याकरीता लाकूड तर मिळतेच पण पावसाळयात नवीन फुटलेली पालवी उन्हाच्या तिव्र उष्णतेने सुकून जातात़ परिणामी वाऱ्यामुळे जमीनीवर पाला-पाचोळा तयार होतो़ व तो या दिवसांत शेतीची राबनी करण्याकरीता वापरला जातो़मोहाच्या झाडांच्या वाढत्या उपयोगामुळे गोरगरीब शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारी रासायनिक खते तर महागाईच्या भडक्याचा विचार केला तर बाजारात खाद्यतेलाला प्रतिकलो ७० तेक ८० रुपये भावाप्रमाणे शेतकऱ्यांची वार्षिक २० ते ३० हजार रुपये बचत होत असते़ तर फुलांपासून रोजगारही प्राप्त होतो़ यामुळे मोहाचे झाड आदिवासी गोरगरिब शेतकरी, मजुरांसाठी जणू फलदायीच बनले आहे़या झाला पिवळया रंगाची फुले येतात़ उष्णता फळास लागली की, ती फुले खाली पडतात़ ही फुले आदिवासी सकाळ, दुपारपर्यतच्या वेळेत वेचुन उन्हात सुकवतात़ कालातंराने या फुलांस भाव मिळाला तर २० ते ३५ रुपये किलोने विकून गावठी दारु बनविली जाते़ तसेच तिचा औषध म्हणून वापर होत असतो.फुलानंतर मोहाच्या झाडाला काही दिवसांनंतर फळे येतात. या भागात या फळांना दोडें (मोहटया) म्हणुन संबोधतात़ काही वेळेस कवळया दोडयापासून स्वादिष्ट भाजीचे साधन म्हणून मोहटया तयार केल्या जातात़ त्या सकवून बारमाही केव्हाही भाजीसाठी वापर केला जातो़ तर पिकलेल्या दोंडयामधून पाच ते सहा बिया मिळतात़आदिवासी दिवसभर २ ते ३ टोपल्या जमा करतो़ त्यानंतर त्या बिया फोडल्या असता यामधून दोन दले मिळतात़ त्यास आदिवासी लोक डाळिंब संबोधतात़ ही दले सुकवितात़ दरम्यानच्या मोसमात एक व्यक्ती प्रतिकुंटुंब एक क्विंटलच्या आसपास ही दले तेलाच्या कारखान्यात नेतात़ त्यापासून किमान ५० ते ६० किलो खाद्यतेल मिळते़फळ एक फायदे अनेकसुरुवातीला तेलाला तीव्र उष्णतेत कढवावे लागते़ तर कडूपणा काढण्यासाठी त्या तेलात नागलीच्या पिठाची छोटी भाकर टाकली जाते़ परिणामी त्यापासून तेलातील मैला व कडूपणा नष्ट होवुन तेल खाण्यास योग्य होते. रुग्ण चिकित्सा करतांना या कच्चा तेलाचा उपयोग होत असून थंडी ताप आल्यास कपाळावर रुमाल भिजवून ठेवला असाता आरोम मिळतो अशी मान्यता आहे. शिवाय, यातील फळांच्या टरफलांपासून शेतात खतही तयार होते़ फळ फोडल्यानंतरही टरफले शेतात टाकली जातात़ पाऊस पडल्यानंतर ही टरफले जमीनीत कुजली जातात़ त्यातून खतनिर्मीती होऊन पिकेही भरभरुन येत असतात़