शहरं
Join us  
Trending Stories
1
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
2
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
3
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
4
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
5
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
6
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
7
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
8
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
9
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
10
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
11
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
12
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
13
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
14
Triptii Dimri : "आयुष्यात रोमान्स करण्यासाठी..."; करोडपती बिझनेसमनच्या प्रेमात आहे अभिनेत्री, गुपचूप करतेय डेट?
15
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
16
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
17
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
18
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
19
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
20
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा

निवडणुकीमुळे रोजगाराचा प्रश्न मिटला, बेरोजगारांना रोज ५०० रुपयांचा दर?  जव्हारमध्ये राजकीय पक्षांनी जमवली बाहेरील गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2017 02:16 IST

नगरपरिषद निवडणुकीचे पडघम वाजल्यानंतर चौरंगी लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. मात्र, प्रभाग निहाय छोट्या निवडणूका असल्याने सर्व सामान्य मतदार मात्र सर्वांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करीत असून यामुळे उघडपणे कोणत्याच पक्षांच्या उमेदवाराबरोबर ते फिरत नसल्याने सध्या सर्वच पक्षाना कार्यकर्त्यांची चणचण भासू लागली आहे.

जव्हार : नगरपरिषद निवडणुकीचे पडघम वाजल्यानंतर चौरंगी लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. मात्र, प्रभाग निहाय छोट्या निवडणूका असल्याने सर्व सामान्य मतदार मात्र सर्वांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करीत असून यामुळे उघडपणे कोणत्याच पक्षांच्या उमेदवाराबरोबर ते फिरत नसल्याने सध्या सर्वच पक्षाना कार्यकर्त्यांची चणचण भासू लागली आहे.यातुनच राजकीय नेत्यांना रोजंदारीवर माणसे मिळवण्याची वेळ आली आहे. यामुळे येथील बेरोजगाराना रोजगारही मिळू लागला आहे. तर वरिष्ठ नेत्याना गर्दी दाखिवण्यासाठी बाहेरूनही गर्दी आयात केली जात असल्याने गर्दी जमविताना उमेदवारांची दमछाक होत आहे.एकुण १७ उमेदवार आणि एक नगराध्यक्षपदासाठीचा उमेदवार असे गणित असल्याने जव्हार मध्ये आजघडीला जव्हार प्रतिष्ठान, कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना अशी चौरंगी लढत होत आहे. याशिवाय नगराध्यक्ष पदाचे सर्व उमेदवार मातब्बर असल्याने सध्या नेमके वारे कुणाच्या दिशेने वाहते हे ही सांगणे कठीण बनले आहे. त्यातूनच आरोप प्रत्यारोप, सोशल मिडियावरुन डावपेच सुरु आहेत. मात्र, कार्यकर्ते आणायचे कुठून हा मोठा प्रश्न असून यासाठी आता चक्क रोजंदारी वर माणस घेतली जात आहेत. त्यासाठी सुरवातीला ३०० रु पये रोज दिला गेला मात्र आता ५०० रु पये असा दरही सुरु असल्याची चर्चा आहे.या भागात शासनाची रोजगार हमीची योजना सर्वांनाच चांगला रोजगार देण्यात अपयशी ठरत असतांना हा राजकीय रोजगार सर्वांनाच परवडणारा ठरत आहे. दरम्यान, जमणाºया गर्दीमध्ये अनेक हवशे, नवशे व गवशे असल्याने निष्ठावंताचा टक्का घसरला आहे.गाव लहान आणि पक्ष जास्त दिसत असल्यामुळे स्थानिक तरुण संधीची वाट पाहत आहेत. कारण निवडणूक एका दिवसाची मग उगाच शत्रुत्व का घ्यायचे असा एक विचार पुढे येत आहे. दरम्यान, निवडणूक प्रचारा निमित्त जिल्हा पातळीवचे नेते जव्हार मध्ये दाखल होत असल्याने स्थानिक पुढाºयांची प्रतिष्ठा जपण्यासाठी विकतचे कार्यकर्ते हाच एक पर्याय त्यांना सोपा वाटत आहे.वाड्यामध्ये बविआचा विकासाचा मुद्दा; राष्टÑवादीसोबत मैत्रीपूर्ण लढतीवाडा : येथील नगरपंचायत निवडणुकीत बहुजन विकास आघाडीने राष्ट्रवादी कॉंग्रेस व रिपब्लिकन पक्ष (ए) सोबत आघाडी केली असून शहराच्या सर्वागीण विकासाच्या मुद्द्यावरच निवडणूक लढणार असल्याचा दावा बहुजन विकास आघाडीचे माजी खासदार बळीराम जाधव यांनी केला आहे. वाडा नगरपंचायतीची निवडणूक येत्या १३ डिसेंबर रोजी होत आहे.या निवडणुकीत बहुजन विकास आघाडीने नगराध्यक्षपदाकरीता अमृता मोरे यांना उमेदवारी दिली असून नगरसेवक पदाकरिता ११ प्रभागात आपले उमेदवार उभे केलेत तर प्रभाग क्रं. १४ हा अनुसूचित जातीकरिता राखीव असलेला प्रभाग मधून आरपीआय चा उमेदवार दिला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने नगराध्यक्षपदाकरीता बहुजन विकास आघाडीसोबत आघाडी केली आहे.असे असले तरी अनेक प्रभागांमध्ये त्यांच्यात मैत्रीपूर्ण लढती होत आहेत. बहुजन विकास आघाडीने शनिवारी माजी खासदार बळीराम जाधव, ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रचाराचा शुभारंभ केला. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी विकासाच्या मुद्यावरच निवडणूक लढणार असल्याचे सांगितले.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार