शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: भगूर नगरपरिषदेत शिवसेनेची २५ वर्षांची सत्ता अजितदादांच्या राष्ट्रवादीने उलथवली; पहा लेटेस्ट अपडेट
2
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
3
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
4
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
5
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
6
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
7
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
8
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
9
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
10
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
11
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
12
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
13
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
14
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
15
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
16
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
17
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
18
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
19
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
20
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
Daily Top 2Weekly Top 5

विटभट्टीतून ‘त्यांना’ मिळतोय रोजगार, गणपती, दिवाळी सणासहीत इतर चार महिन्यांसाठी मिळते उचल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 05:45 IST

विटभट्टीचा व्यवसाय ग्रामीण भागामध्ये मोठया प्रमाणात केला जातो़ त्यांसाठी हजारो वीटभटटी कामगार-मजुर जिल्हयातील विविध भागातुन येत असतात. सध्यस्थितीमध्ये कामगारांनी (मजूर) वीटभट्टी शेजारीच राहाण्यासाठी बांबूंच्या झोपडया बांधण्यात आल्या आहेत.

तलवाडा : विटभट्टीचा व्यवसाय ग्रामीण भागामध्ये मोठया प्रमाणात केला जातो़ त्यांसाठी हजारो वीटभटटी कामगार-मजुर जिल्हयातील विविध भागातुन येत असतात. सध्यस्थितीमध्ये कामगारांनी (मजूर) वीटभट्टी शेजारीच राहाण्यासाठी बांबूंच्या झोपडया बांधण्यात आल्या आहेत. यांलाच आदिवाासी मजुर भोंगा असेही संबोधतात़ दिवसा विटा बनवून रात्री ते निवारा याच भोंग्यामध्ये करतात.ठाणे जिल्हा व मुंबई उनगरात दररोज उभ्या राहाणाºया टोलेजंग इमारती व कारखान्यासाठी लाखो विटांची गरज लागते. विक्रमगड तालुक्यातील या भट्टयांवर तयार झालेल्या विटा मोठया प्रमाणात इतर शहरात जात असतात. या विटा बनविण्यासाठी शेकडो मजूर वीटभट्टीच्या ठिकाणी दाखल होत आहेत. पावसाळा सुरु झाल्यानंतर हा वीट बनविण्याचा कारखाना बंद होतो. ़त्यानंतर तो व्यवसाय दिवाळीनंतर सुरु होतो़ दरम्यान गणपती, दिवाळी सणासहीत इतर चार महिन्यांसाठी लागणाºया खर्चासाठी वीटभटटी मालकांकडून हे कामगार, मजुर आगावू रक्कम उचल म्हणून घेऊन आपली उपजिवीका चालवितात. दिवाळी सरताच ते पुन्हा नव्या जोमाने कुटुंबासह वीटभट्टी मालकांकडे कामासाठी येत असतात़विक्रमगड तालुक्यातील सवादे, मलवाडा, पोचाडे, आंबेघर, आलोंडे, ओंदे, गडदे अशा विविध गावामध्ये विटा बनविण्याचे काम जोमात सुरु झाले आहे़ त्यामुळे वीटभटटी मालक काम करणाºया मजुरांना अधिक रक्कम खर्चासाठी देऊन बुक करुन ठेवत असतो़दरम्यान, कुणी वीटभट्टी मजुर कामगांराना जादा मजुरी देऊन पळवू नये यासाठी मालक स्वत:गाडी, ट्क, टेम्पो पाठवून मजुरांना घेऊन येतात़ अशी धावपळ असते.सवलतींचा भार वाढणारबहुसंख्य मजुर हे विक्रमगड व तालुक्याच्या बाजुंच्या गावातील व अन्य जवळच्या तालुक्यांतील आदिवासी भागात राहाणारे आहेत. त्यामुळे आदिवासी बांधवांची वीटभट्टी मजुर कामगारांमध्ये संख्या जास्त आहे. पती, पत्नी,भाऊ असे कामगार एकत्रपणे वीटभटटीवर काम करत असतात़कामासाठी आलेले हे कामगार थंडी व उन्हापासून संरक्षण व्हावे म्हणून वीटभट्टीजवळ असलेल्या मोकळया जागेचे मैदानात स्वत:बांबु लाऊन आपली झोपडी-घर उभे करुन आठ महिने तेथे राहत असतात़. ते मजुर हे दिवसाला सर्वसाधारणपणे १५०० ते २००० हजार विटा तयार करतात. कच्चा मातीने तयार केलेल्या विटा या लाखोंच्या संख्येने तयार करुन त्या भट्टीवर लाऊन लाल होईपर्यत तयार करुन विक्रीसाठी बाजारात पाठविल्या जात असतात़ याकरीता २० ते ३० दिवसांचा अवधी लगत असतो. मेहनतीच्या मानाने त्यांना येथे पुरेशा सुविधा नसतात हे वास्तव आहे.मजुरांना जेवण -पाण्याची सोय मालक वर्ग योग्यरित्या करीत असल्याने ते आनंदाने त्यांच्याकडे आठ महिने राहतात़ यातुन मजुरांना रोजगार उपलब्ध झालेला आहे़ पावसाळयात हे मजुर पुन्हा आपल्या घरी परतुन चार महिने शेतीवाडी करीतात. सणाच्या काळात ते हमखास आपल्या गावी परततात.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार