शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
2
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
3
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
4
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
5
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
6
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
7
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
8
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
9
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
10
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
11
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
12
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
13
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
14
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
15
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
16
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
17
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
18
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
19
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
20
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!

विटभट्टीतून ‘त्यांना’ मिळतोय रोजगार, गणपती, दिवाळी सणासहीत इतर चार महिन्यांसाठी मिळते उचल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 05:45 IST

विटभट्टीचा व्यवसाय ग्रामीण भागामध्ये मोठया प्रमाणात केला जातो़ त्यांसाठी हजारो वीटभटटी कामगार-मजुर जिल्हयातील विविध भागातुन येत असतात. सध्यस्थितीमध्ये कामगारांनी (मजूर) वीटभट्टी शेजारीच राहाण्यासाठी बांबूंच्या झोपडया बांधण्यात आल्या आहेत.

तलवाडा : विटभट्टीचा व्यवसाय ग्रामीण भागामध्ये मोठया प्रमाणात केला जातो़ त्यांसाठी हजारो वीटभटटी कामगार-मजुर जिल्हयातील विविध भागातुन येत असतात. सध्यस्थितीमध्ये कामगारांनी (मजूर) वीटभट्टी शेजारीच राहाण्यासाठी बांबूंच्या झोपडया बांधण्यात आल्या आहेत. यांलाच आदिवाासी मजुर भोंगा असेही संबोधतात़ दिवसा विटा बनवून रात्री ते निवारा याच भोंग्यामध्ये करतात.ठाणे जिल्हा व मुंबई उनगरात दररोज उभ्या राहाणाºया टोलेजंग इमारती व कारखान्यासाठी लाखो विटांची गरज लागते. विक्रमगड तालुक्यातील या भट्टयांवर तयार झालेल्या विटा मोठया प्रमाणात इतर शहरात जात असतात. या विटा बनविण्यासाठी शेकडो मजूर वीटभट्टीच्या ठिकाणी दाखल होत आहेत. पावसाळा सुरु झाल्यानंतर हा वीट बनविण्याचा कारखाना बंद होतो. ़त्यानंतर तो व्यवसाय दिवाळीनंतर सुरु होतो़ दरम्यान गणपती, दिवाळी सणासहीत इतर चार महिन्यांसाठी लागणाºया खर्चासाठी वीटभटटी मालकांकडून हे कामगार, मजुर आगावू रक्कम उचल म्हणून घेऊन आपली उपजिवीका चालवितात. दिवाळी सरताच ते पुन्हा नव्या जोमाने कुटुंबासह वीटभट्टी मालकांकडे कामासाठी येत असतात़विक्रमगड तालुक्यातील सवादे, मलवाडा, पोचाडे, आंबेघर, आलोंडे, ओंदे, गडदे अशा विविध गावामध्ये विटा बनविण्याचे काम जोमात सुरु झाले आहे़ त्यामुळे वीटभटटी मालक काम करणाºया मजुरांना अधिक रक्कम खर्चासाठी देऊन बुक करुन ठेवत असतो़दरम्यान, कुणी वीटभट्टी मजुर कामगांराना जादा मजुरी देऊन पळवू नये यासाठी मालक स्वत:गाडी, ट्क, टेम्पो पाठवून मजुरांना घेऊन येतात़ अशी धावपळ असते.सवलतींचा भार वाढणारबहुसंख्य मजुर हे विक्रमगड व तालुक्याच्या बाजुंच्या गावातील व अन्य जवळच्या तालुक्यांतील आदिवासी भागात राहाणारे आहेत. त्यामुळे आदिवासी बांधवांची वीटभट्टी मजुर कामगारांमध्ये संख्या जास्त आहे. पती, पत्नी,भाऊ असे कामगार एकत्रपणे वीटभटटीवर काम करत असतात़कामासाठी आलेले हे कामगार थंडी व उन्हापासून संरक्षण व्हावे म्हणून वीटभट्टीजवळ असलेल्या मोकळया जागेचे मैदानात स्वत:बांबु लाऊन आपली झोपडी-घर उभे करुन आठ महिने तेथे राहत असतात़. ते मजुर हे दिवसाला सर्वसाधारणपणे १५०० ते २००० हजार विटा तयार करतात. कच्चा मातीने तयार केलेल्या विटा या लाखोंच्या संख्येने तयार करुन त्या भट्टीवर लाऊन लाल होईपर्यत तयार करुन विक्रीसाठी बाजारात पाठविल्या जात असतात़ याकरीता २० ते ३० दिवसांचा अवधी लगत असतो. मेहनतीच्या मानाने त्यांना येथे पुरेशा सुविधा नसतात हे वास्तव आहे.मजुरांना जेवण -पाण्याची सोय मालक वर्ग योग्यरित्या करीत असल्याने ते आनंदाने त्यांच्याकडे आठ महिने राहतात़ यातुन मजुरांना रोजगार उपलब्ध झालेला आहे़ पावसाळयात हे मजुर पुन्हा आपल्या घरी परतुन चार महिने शेतीवाडी करीतात. सणाच्या काळात ते हमखास आपल्या गावी परततात.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार