शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

डहाणूच्या किनाऱ्यावर आढळली आठ जखमी कासवं

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2018 21:58 IST

पालघर जिल्ह्यातील डहाणू किनाऱ्यावर शनिवार, 7 जुलैच्या दुपारपर्यंत पारनाका (1), चिखले (3) आणि घोलवड (2) तसेच शुक्रवारी चिंचणी येथेही दोन अशी एकूण आठ जखमी समुद्री कासवं आढळली.

अनिरुद्ध पाटीलडहाणू/बोर्डी- पालघर जिल्ह्यातील डहाणू किनाऱ्यावर शनिवार, 7 जुलैच्या दुपारपर्यंत पारनाका (1), चिखले (3) आणि घोलवड (2) तसेच शुक्रवारी चिंचणी येथेही दोन अशी एकूण आठ जखमी समुद्री कासवं आढळली. ती ऑलिव्ह रिडले जातीची असून त्यांच्यावर पारनाका येथील कासव पुनर्वसन केंद्रात उपचार सुरू आहेत. सजग नागरिकांमुळे या जीवांना वाचविण्यात यश आले आहे.घोलवडच्या  किनाऱ्यावर जाळ्यात जिवंत कासवं आढळल्याची माहिती जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक दीपक देसले यांना पालकांनी दिल्यानंतर त्यांनी कासव पुनर्वसन केंद्राला कळविले. या संस्थेचे प्रतीक वाहूरवाघ आणि रेमंड डिसोझा हे सदस्य खास कासवांकरिता बनविण्यात आलेल्या अॅम्ब्युलन्सने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी  मासेमारीच्या नॉयलान जाळ्यात अडकलेल्या दोन कासवांना बाहेर काढून केंद्रात भरती केले. चिखले, मरवाडा किनाऱ्यावरही दोन कासवं असल्याची माहिती संतोष वरथाय  स्थानिकांनी दिल्यानंतर, टीमकडून रेक्यूचे काम सुरू असताना लगतच्या कांदळवनात भरत दुबळा या ग्रामस्थाला जाळ्यात अडकलेले कासव दिसले. या तिन्हीसह पारनाका किनाऱ्यावर आढळलेल्या अन्य एका कासवाला केंद्रात भरती करण्यात आले. तर शुक्रवारी चिंचणी किनाऱ्यावरून दोन कासवं रेस्क्यू केली होती. दरम्यान मागील एका महिन्याच्या कालावधीत एकूण पंचवीस जखमी कासवं आढळली असून त्यांच्या पंख, मान तसेच शरीराच्या अनेक भागावर गंभीर जखमा आहेत.हे  देशातील पहिले तसेच एकमेव पुनर्वसन व उपचार केंद्र उपवन संरक्षक कार्यालयाच्या आवारात चालविले जाते. मुंबईतील पशुवैद्य दिनेश विन्हेरकर येथे येऊन त्यांच्यावर उपचार करतात. त्यांची शुश्रूषा आणि आहाराचे  काम या प्राणीमित्र संस्थेकडून पहिले जाते. तंदुरुस्त झालेल्या कासवांना समुद्रात सोडण्यापूर्वी त्याची संपूर्ण लिखित नोंद ठेवली जाते. मागील एका महिन्यात 25 कासवं केंद्रात दाखल केली, त्या पैकी दोन मृत होती. प्रतिवर्षी हा आकडा वाढता असल्याचे या पुनर्वसन केंद्राचे म्हणणे आहे. त्यामुळे या सागरी जिवाच्या संवर्धनासाठी शासकीय पातळीवर ठोस पाऊल उचलणे गरजेचे आहे.