शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
3
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
4
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
5
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
6
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
7
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
8
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
9
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
10
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
11
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
12
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
13
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
14
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
15
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
16
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
17
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
18
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
19
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
20
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला

आंबे खा! पण वृक्षारोपणासाठी कोया ठेवा जपून

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2019 00:47 IST

आंब्याच्या मौसमाला प्रारंभ झाला असून बाजारात विविध जातींचे आंबे उपलब्ध आहेत.

- अनिरुद्ध पाटील बोर्डी : आंब्याच्या मौसमाला प्रारंभ झाला असून बाजारात विविध जातींचे आंबे उपलब्ध आहेत. या वर्षी स्थानिक फळांची विक्र ी ६० ते ७० रु पये प्रतिकिलोच्या दराने सुरू आहे. खवय्यांकडून त्याला चांगला प्रतिसादही लाभतो आहे. दरम्यान फळ खाऊन झाल्यानंतर त्याची कोय फेकून न देता त्याची, लागवड केल्यास त्यापासून रोपे तयार करून वृक्षारोपण करून पर्यावरण चळवळीला हातभार लावा, असे आवाहन पर्यावरण प्रेमींनी केले आहे.महाराष्ट्र, गुजरात राज्याच्या किनारपट्टीवर आंबा लागवडीकरिता पोषक वातावरण असल्याने फळबागांची संख्या अधिक आहे. सध्या मे अखेर सुरू असून हा आंब्याचा मौसम समजाला जातो. स्थानिक फळं बाजारात दाखल झाली असून साधारणत: ६० ते ७० रुपये प्रतिकिलो दराने विक्री सुरू आहे. ग्राहकांचीही त्याला मोठी मागणी आहे. फळं खाऊन कोय फेकून दिली जाते. मात्र तिची लागवड केल्यास पंधरवडयातच रोपे तयार होतात. त्यानंतर त्यांच्यावर कोय कलम करून उत्तम प्रतीची कलमं तयार होतात. मात्र सर्वसामान्य नागरिकांना त्यांची माहिती नसते. शहरातील निवासी गृहसंकुलांमधून मोठ्या प्रमाणात कचऱ्यात ही कोय फेकली जाते. नर्सरी व्यवसाय करणाऱ्यांना कलमं बांधण्याकरिता त्याची आवश्यकता असल्याने, कचरा उचलणाºया सफाई कर्मचाºयांशी संपर्क साधून या कोया गोळा केल्या जातात, अशी माहिती समोर आली असून त्यांना प्रतिशेकड्यानुसार मोबदला दिला जातो. आंबा फळप्रक्रि या उद्योगकडूनही हा पुरवठा होत असल्याची माहिती नर्सरी व्यवसायिकांनी दिली.त्यामुळे शहरातील वा ग्रामीण भागातील नागरिकांनी या काळात कोया गोळा करून पावसाळ्यात त्याची रोपे आणि त्यानंतर कलमं बांधून घेतल्यास कमी खर्चात हे शक्य आहे. विविध शाळा, संस्था, ग्रामपंचायती आदींना कलमं भेट दिल्यास मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण मोहिमेला हातभार लागेल. हे स्थानिक झाड असल्याने सुरु वातीची दोन-तीन वर्ष त्याचे संगोपन योग्य पद्धतीने झाल्यास भविष्यात उत्पन्न तर मिळेलच त्यासह बागायतींचे क्षेत्र वाढेल. शिवाय या झाडांमध्ये कार्बन डाय आॅक्साइडचे शोषण करण्याची क्षमता अधिक असल्याने वातावरण शुद्धीकरण होण्यास मदत होईल.>कोयींची उगवण झाल्यानंतर, कोय कलम बांधता येतं. त्यासह भेट कलम, शेंडा कलम, खुंटी कलम आदी प्रकार आहेत. ग्रामीण भागात अनेक कारागीर आहेत. नागरिकांनी इच्छाशक्ती दाखवल्यास वृक्षारोपण चळवळीला हातभार तर लागेलच शिवाय कलमं बांधणाºया कारागिरांच्या हाताला रोजगार मिळेल’- नारायण पटलारी (कलमं बांधणारा कारागीर, डहाणू)>‘स्थानिक आंबा बाजारात दाखल झाला असून ६० ते ७० रुपये प्रतिकिलोच्या दराने विक्र ी सुरू असून ग्राहकांचा चांगला प्रतिसाद आहे.’- यज्ञेश सावे(आंबा बागायतदार)>‘गादीवाफ्यावर बी लागवडीनंतर, साधारणत: एक फुट उंचीची रोपे वाढल्यानंतर कलम तयार करण्यायोग्य होतात. ज्या आंब्याच्या जातीचे झाड हवे आहे, त्याचा परिपक्व शेंडा काडी रोपाच्या जाडीचा घेऊन त्यावर पाचर करुन प्लास्टिकच्या पट्टीने बांधावा, हे कलम सावलीत ठेवावे, त्यानंतरच्या काळात कलम लागवडीस तयार होते.’- उत्तम सहाणे(कृषी शास्त्रज्ञ, कोसबाड कृषी विज्ञान केंद्र)