शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

ई-पॉसने ११९८ मे. टन धान्याची, ५८८ कि. लीटर रॉकेलची बचत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2018 05:58 IST

पालघर जिल्ह्यातील वास्तव : रेशनच्या धान्याचा काळा बाजार थांबला

हितेन नाईकपालघर : ई-पॉस मशीनद्वारे धान्य विक्री केल्यामुळे जिल्ह्यात धान्याचे पूर्ण नियंत्रन पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात आणि धान्याच्या गैरव्यवहारास पूर्णत: आळा घालण्यात आल्याचे प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी विनोद खिरोळकर यांनी सांगितले. यामुळे जिल्ह्यात दरमहा १ हजार १९८ मेट्रिक टन धान्य तर ५८८ किलो लिटर्स रॉकेलची बचत करण्यात पुरवठा विभागाला यश आल्याने रेशन माफियांच्या घशात जाणारा साठा वाचवून त्यांनी शासनाचे लाखो रु पये वाचविण्यात यश मिळविले आहे.

सार्वजनिक वितरण प्रणालीच्या संगणकीकरण प्रकल्पांतर्गत शासनाने जिल्ह्यात मे २०१८ पासून ए ई पीडिएस लागू केली आहे. ती अंतर्गत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांची केवळ आधार पडताळणी झाल्या नंतरच ई-पॉस मशीनद्वारे शिधा पत्रिकाधारकांना धान्याची विक्री केली जाते. या प्रणालीच्या अंमलबजावणी मुळे पात्र शिधापत्रिकाधारकांना धान्याची विक्री करणे व धान्याच्या गैरव्यवहारास पूर्णत: आळा घालणे हे शासनाचे उद्दिष्ट यशस्वी होते आहे. या धोरणाची पालघर जिल्ह्यात काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येत असल्याचे त्यांनी लोकमतला सांगितले. एप्रिल २०१६ मध्ये जिल्ह्याचे १० हजार ५४१ मेट्रिक टन असलेले धान्य नियतन नोव्हेंबर २०१८ मध्ये ९ हजार ३४३ मेट्रिक टन म्हणजे ११९८ मेट्रिक टनाने कमी होऊन धान्याची बचत झाली आहे. तर दुसरी कडे जिल्ह्यात गॅस स्टॅम्पिंग मोहीम राबविल्याने एप्रिल २०१६ मध्ये ११८८ किलो लिटर्स केरोसीन ची गरज नोव्हेंबर २०१८ मध्ये कमी होत होत ६०० कि. ली. इतकी झाली आहे. ह्यात ५८८ कि.लि.ची बचत झाली आहे. शासनाने १ आॅगस्ट २०१८ च्या परिपत्रकान्वये गॅस जोडणी नसल्या बद्दल हमीपत्र सादर करणाऱ्या शिधा पत्रिकाधारकानाच केरोसीन चे वितरण करण्यात येत असल्याने त्याची मोठी बचत होत आहे.बोगस अथवा चुकीची हमीपत्रे सादर करून केरोसीन चा लाभ घेत असल्याचे आढळून आल्यास त्याच्या विरोधात फौजदारी कारवाईचा इशारा त्यांनी दिला आहे.जिल्ह्यात अंत्योदय अन्न योजने अंतर्गत प्रत्येक कुटुंबाला २५ किलो तांदूळ, १० किलो गहू असा ३५ किलो धान्यसाठा प्रति २ रुपये किलो दराने दिला जातो. त्यांना वितरित करण्यासाठी २३ हजार २५०.५० क्विंटल तांदूळ आणि ९ हजार ३००.२० क्विंटल गव्हाचा साठा नोव्हेंबर ते डिसेंबर या महिन्यात वितरणासाठी उपलब्ध झाला असून ते काम सुरू आहे. वसई तालुक्यातील १९ हजार ६४३ कुटुंबातील सदस्यांना ३ हजार ५९९ शिधापत्रिकांचे, जव्हार तालुक्यातील ६८ हजार १४ सदस्यांना १२ हजार ६२९ शिधापत्रिकांचे, डहाणू तालुक्यात १ लाख १ हजार २५ सदस्यांना २० हजार १८३ शिधा पत्रिकांचे, मोखाडा तालुक्यात ४७ हजार २२२ सदस्यांना ९ हजार ९५१ शिधा पत्रिकांची, पालघर तालुक्यात ६३ हजार ७२७ सदस्यांना १५ हजार ३५६ शिधा पत्रिका, तलासरी तालुक्यात ५५ हजार ५९२ सदस्यांना ८ हजार ९११ शिधापत्रिका, वाडा तालुक्यात ४९ हजार २९६ सदस्यांना ९ हजार ७४२ शिधापत्रिका, विक्र मगड तालुक्यात ८६ हजार ३३० सदस्यांना १५ हजार ६६० शिधा पत्रिका असे पूर्ण जिल्ह्यात ४ लाख ९० हजार ८४९ सदस्यांना ९६ हजार ७३ शिधापत्रिका चे वाटप करण्यात आलेले आहे.जिल्ह्यात २.८५ लाख शिधापत्रिकांचे वाटपवसई तालुक्यातील ५ लाख ९२ हजार ८५२ कुटुंबातील सदस्यांना १ लाख ३३ हजार ३३५ शिधापत्रिकां जव्हार तालुक्यात ५२ हजार १४७ सदस्यांना ९ हजार ५० शिधा पत्रिका, डहाणू तालुक्यात २ लाख ३७३ सदस्यांना ३५ हजार ६७० शिधा पत्रिका, मोखाडा तालुक्यात ३६ हजार ७१४ सदस्यांना ६ हजार ७२५ शिधापत्रिका, पालघर तालुक्यात ३ लाख ४७ हजार ६५७ सदस्यांना ६६ हजार ७९७ शिधापत्रिका, तलासरी तालुक्यात ६९ हजार ३०४ सदस्यांना १० हजार २३१ शिधापत्रिका, वाडा तालुक्यातील ९१ हजार ८७५ सदस्यांना १६ हजार ८३२ शिधापत्रिका, विक्रमगड तालुक्यात ३९ हजार ५८६ शिधापत्रिका असे जिल्ह्यातील एकूण १४ लाख ३३ हजार ३०६ सदस्यांना धान्य मिळविण्यासाठी २ लाख ८५ हजार ६८२ शिधापत्रिकांचे वाटप करण्यात आले आहे. 

टॅग्स :Vasai Virarवसई विरारpalgharपालघर