शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

ई-पॉसने ११९८ मे. टन धान्याची, ५८८ कि. लीटर रॉकेलची बचत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2018 05:58 IST

पालघर जिल्ह्यातील वास्तव : रेशनच्या धान्याचा काळा बाजार थांबला

हितेन नाईकपालघर : ई-पॉस मशीनद्वारे धान्य विक्री केल्यामुळे जिल्ह्यात धान्याचे पूर्ण नियंत्रन पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात आणि धान्याच्या गैरव्यवहारास पूर्णत: आळा घालण्यात आल्याचे प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी विनोद खिरोळकर यांनी सांगितले. यामुळे जिल्ह्यात दरमहा १ हजार १९८ मेट्रिक टन धान्य तर ५८८ किलो लिटर्स रॉकेलची बचत करण्यात पुरवठा विभागाला यश आल्याने रेशन माफियांच्या घशात जाणारा साठा वाचवून त्यांनी शासनाचे लाखो रु पये वाचविण्यात यश मिळविले आहे.

सार्वजनिक वितरण प्रणालीच्या संगणकीकरण प्रकल्पांतर्गत शासनाने जिल्ह्यात मे २०१८ पासून ए ई पीडिएस लागू केली आहे. ती अंतर्गत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांची केवळ आधार पडताळणी झाल्या नंतरच ई-पॉस मशीनद्वारे शिधा पत्रिकाधारकांना धान्याची विक्री केली जाते. या प्रणालीच्या अंमलबजावणी मुळे पात्र शिधापत्रिकाधारकांना धान्याची विक्री करणे व धान्याच्या गैरव्यवहारास पूर्णत: आळा घालणे हे शासनाचे उद्दिष्ट यशस्वी होते आहे. या धोरणाची पालघर जिल्ह्यात काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येत असल्याचे त्यांनी लोकमतला सांगितले. एप्रिल २०१६ मध्ये जिल्ह्याचे १० हजार ५४१ मेट्रिक टन असलेले धान्य नियतन नोव्हेंबर २०१८ मध्ये ९ हजार ३४३ मेट्रिक टन म्हणजे ११९८ मेट्रिक टनाने कमी होऊन धान्याची बचत झाली आहे. तर दुसरी कडे जिल्ह्यात गॅस स्टॅम्पिंग मोहीम राबविल्याने एप्रिल २०१६ मध्ये ११८८ किलो लिटर्स केरोसीन ची गरज नोव्हेंबर २०१८ मध्ये कमी होत होत ६०० कि. ली. इतकी झाली आहे. ह्यात ५८८ कि.लि.ची बचत झाली आहे. शासनाने १ आॅगस्ट २०१८ च्या परिपत्रकान्वये गॅस जोडणी नसल्या बद्दल हमीपत्र सादर करणाऱ्या शिधा पत्रिकाधारकानाच केरोसीन चे वितरण करण्यात येत असल्याने त्याची मोठी बचत होत आहे.बोगस अथवा चुकीची हमीपत्रे सादर करून केरोसीन चा लाभ घेत असल्याचे आढळून आल्यास त्याच्या विरोधात फौजदारी कारवाईचा इशारा त्यांनी दिला आहे.जिल्ह्यात अंत्योदय अन्न योजने अंतर्गत प्रत्येक कुटुंबाला २५ किलो तांदूळ, १० किलो गहू असा ३५ किलो धान्यसाठा प्रति २ रुपये किलो दराने दिला जातो. त्यांना वितरित करण्यासाठी २३ हजार २५०.५० क्विंटल तांदूळ आणि ९ हजार ३००.२० क्विंटल गव्हाचा साठा नोव्हेंबर ते डिसेंबर या महिन्यात वितरणासाठी उपलब्ध झाला असून ते काम सुरू आहे. वसई तालुक्यातील १९ हजार ६४३ कुटुंबातील सदस्यांना ३ हजार ५९९ शिधापत्रिकांचे, जव्हार तालुक्यातील ६८ हजार १४ सदस्यांना १२ हजार ६२९ शिधापत्रिकांचे, डहाणू तालुक्यात १ लाख १ हजार २५ सदस्यांना २० हजार १८३ शिधा पत्रिकांचे, मोखाडा तालुक्यात ४७ हजार २२२ सदस्यांना ९ हजार ९५१ शिधा पत्रिकांची, पालघर तालुक्यात ६३ हजार ७२७ सदस्यांना १५ हजार ३५६ शिधा पत्रिका, तलासरी तालुक्यात ५५ हजार ५९२ सदस्यांना ८ हजार ९११ शिधापत्रिका, वाडा तालुक्यात ४९ हजार २९६ सदस्यांना ९ हजार ७४२ शिधापत्रिका, विक्र मगड तालुक्यात ८६ हजार ३३० सदस्यांना १५ हजार ६६० शिधा पत्रिका असे पूर्ण जिल्ह्यात ४ लाख ९० हजार ८४९ सदस्यांना ९६ हजार ७३ शिधापत्रिका चे वाटप करण्यात आलेले आहे.जिल्ह्यात २.८५ लाख शिधापत्रिकांचे वाटपवसई तालुक्यातील ५ लाख ९२ हजार ८५२ कुटुंबातील सदस्यांना १ लाख ३३ हजार ३३५ शिधापत्रिकां जव्हार तालुक्यात ५२ हजार १४७ सदस्यांना ९ हजार ५० शिधा पत्रिका, डहाणू तालुक्यात २ लाख ३७३ सदस्यांना ३५ हजार ६७० शिधा पत्रिका, मोखाडा तालुक्यात ३६ हजार ७१४ सदस्यांना ६ हजार ७२५ शिधापत्रिका, पालघर तालुक्यात ३ लाख ४७ हजार ६५७ सदस्यांना ६६ हजार ७९७ शिधापत्रिका, तलासरी तालुक्यात ६९ हजार ३०४ सदस्यांना १० हजार २३१ शिधापत्रिका, वाडा तालुक्यातील ९१ हजार ८७५ सदस्यांना १६ हजार ८३२ शिधापत्रिका, विक्रमगड तालुक्यात ३९ हजार ५८६ शिधापत्रिका असे जिल्ह्यातील एकूण १४ लाख ३३ हजार ३०६ सदस्यांना धान्य मिळविण्यासाठी २ लाख ८५ हजार ६८२ शिधापत्रिकांचे वाटप करण्यात आले आहे. 

टॅग्स :Vasai Virarवसई विरारpalgharपालघर