शहरं
Join us  
Trending Stories
1
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
2
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
3
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
4
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
5
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
6
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
7
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
8
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
9
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
10
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
11
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
12
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
13
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
14
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
15
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
16
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
17
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
18
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
19
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
20
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी

साडेतीन हजार रॅलींचा धुरळा

By admin | Updated: October 6, 2014 03:58 IST

विधानसभा निवडणुकीचा प्रचार संपण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक असून जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रचारसभा, रॅलींचे येत्या आठवड्यात मोठ्या प्रमाणात नियोजन करण्यात आले

मुंबई : विधानसभा निवडणुकीचा प्रचार संपण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक असून जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रचारसभा, रॅलींचे येत्या आठवड्यात मोठ्या प्रमाणात नियोजन करण्यात आले आहे. रॅलींद्वारे तर राजकीय पक्ष मोठ्या प्रमाणात प्रचार करण्यात गुंतले आहेत. यंदा मुंबईतील वाहतूक पोलिसांकडे रॅलींसाठी तब्बल ३,५२४ अर्ज प्राप्त झाले आहेत. आघाडी आणि महायुती तुटल्याने रॅलींची संख्या यंदा वाढल्याचे सांगितले जात आहे.उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख २७ सप्टेंबर होती, तर १ आॅक्टोबर ही उमेदवारांसाठी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख होती. मात्र आघाडी आणि महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटण्यास बराच वेळ लागल्याने आणि त्यावर लक्ष ठेवून असलेल्या अन्य पक्षांकडूनही उमेदवारी अर्ज भरण्यास उशीर लागल्याने उमेदवारांना प्रचार करण्यास बराच कमी कालावधी मिळाला. त्यामुळे जास्तीत जास्त प्रचारासाठी उमेदवारांनी रॅली काढण्यावरच भर दिल्याचे दिसून आले आहे. राजकीय पक्षांना रॅली काढायची असल्यास त्यासाठी वाहतूक पोलिसांची परवानगी घेणेही आवश्यक असते. त्यानुसार मुंबई वाहतूक पोलिसांच्या २५ चौक्यांमध्ये ३६ मतदारसंघांतून तब्बल ३ हजार ५२४ अर्ज प्राप्त झाले आहेत. यात घाटकोपर, विक्रोळी, ट्रॉम्बे, मुलुंड, विमानतळ, वाकोला, डी. एन. नगर, पायधुनी चौक्यांमध्ये सर्वाधिक अर्ज प्राप्त झाल्याचे वाहतूक पोलिसांकडून सांगण्यात आले. घाटकोपरमधून ३८२, विक्रोळीतून ३५४ अर्ज प्राप्त झाले आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादी यांची आघाडी आणि शिवसेना-भाजपा याची महायुती तुटल्याने या रॅलींची संख्या वाढली आहे. (प्रतिनिधी)