शहरं
Join us  
Trending Stories
1
अकरावीसाठी १२.२ लाख अर्ज; आज शेवटचा दिवस; ९०० तक्रारी प्रलंबित असल्याची माहिती
2
दहिसर ते अंधेरी मेट्रो २ अ आणि दहिसर ते गुंदवली मेट्रो ७ मार्गिका ठरल्या कार्बन न्युट्रल कॉरिडॉर
3
एनएमएमटीच्या चार बस जळून खाक; घणसोली आगारात आणखी तीन ते चार बसचे नुकसान
4
बंगळुरुच्या जल्लोषात चेंगराचेंगरी, अतिउत्साह बेतला जिवावर; ११ ठार, ३३ जण जखमी
5
"शब्दच नाही, अस्वस्थ झालोय..." ; चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेवर विराट कोहली भावूक
6
नवी मुंबईची बस अंधेरीत जळाली; प्रवाशांची सुखरूप सुटका; शॉर्टसर्किटचा संशय
7
अमरावतीच्या धारणी तालुक्यात भूकंपाचा सौम्य धक्का; ३.८ रिक्टर स्केलची नोंद
8
"माझी जगायची इच्छा संपली..."; आयटी अभियंता तरुणीने २१व्या मजल्यावरून मारली उडी
9
कराड-लातूर एसटी बस उलटली, १७ प्रवाशी जखमी; ५३ जण सुखरुप, लातूर-मुरुड मार्गावरील घटना
10
"तामिळ माझं जीवन, माझं अस्तित्व..."; मी माफी मागणार नाही, 'त्या' विधानावर कमल हासन ठाम
11
"३५ हजार क्षमता, ३ लाख लोक आले...": चेंगराचेंगरीच्या घटनेवर कर्नाटकचे मुख्यमंत्री काय बोलले?
12
स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरीत लोकांचा जीव गेला, आतमध्ये १० मिनिटांत RCB खेळाडूंचा सत्कार उरकला
13
IPL चॅम्पियन्सना बघण्याच्या नादात रक्त सांडलं! RCB च्या विजयी मिरवणुकीदरम्यान नेमकं काय घडलं? VIDEO
14
चायनामन प्रेमात पडला अन् गुपचूप साखरपुडा उरकला; कुलदीप यादवची होणारी पत्नी LIC कर्मचारी...  
15
Video: अख्ख बंगळुरू 'हाऊसफुल', मेट्रो स्टेशनवर प्रचंड गर्दी; पाय ठेवायलाही जागा नाही
16
Bengaluru stampede: बंगळुरू चेंगराचेंगरीत आरसीबीच्या चाहत्यांचा मृत्यू, पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक
17
Bengaluru Stampede: आरसीबीच्या विजयी मिरवणुकीदरम्यान बंगळुरूत चेंगराचेंगरी; ११ जण ठार, ३३ जखमी!
18
₹350 पार जाणार अंबानींचा हा शेअर! कंपनीनं नव्या उद्योगात केलीय 'एंट्री'
19
Mumbai Fire: शॉर्ट सर्किटमुळे झेप्टोच्या गोदामात भीषण आग, सर्व सामान जळून खाक! 
20
एकतर्फी प्रेमात वेडसर झाला युवक; युवतीच्या हत्येनंतर प्रायव्हेट पार्टसह शरीरावर ४५ चाकूचे वार

साडेतीन हजार रॅलींचा धुरळा

By admin | Updated: October 6, 2014 03:58 IST

विधानसभा निवडणुकीचा प्रचार संपण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक असून जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रचारसभा, रॅलींचे येत्या आठवड्यात मोठ्या प्रमाणात नियोजन करण्यात आले

मुंबई : विधानसभा निवडणुकीचा प्रचार संपण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक असून जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रचारसभा, रॅलींचे येत्या आठवड्यात मोठ्या प्रमाणात नियोजन करण्यात आले आहे. रॅलींद्वारे तर राजकीय पक्ष मोठ्या प्रमाणात प्रचार करण्यात गुंतले आहेत. यंदा मुंबईतील वाहतूक पोलिसांकडे रॅलींसाठी तब्बल ३,५२४ अर्ज प्राप्त झाले आहेत. आघाडी आणि महायुती तुटल्याने रॅलींची संख्या यंदा वाढल्याचे सांगितले जात आहे.उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख २७ सप्टेंबर होती, तर १ आॅक्टोबर ही उमेदवारांसाठी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख होती. मात्र आघाडी आणि महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटण्यास बराच वेळ लागल्याने आणि त्यावर लक्ष ठेवून असलेल्या अन्य पक्षांकडूनही उमेदवारी अर्ज भरण्यास उशीर लागल्याने उमेदवारांना प्रचार करण्यास बराच कमी कालावधी मिळाला. त्यामुळे जास्तीत जास्त प्रचारासाठी उमेदवारांनी रॅली काढण्यावरच भर दिल्याचे दिसून आले आहे. राजकीय पक्षांना रॅली काढायची असल्यास त्यासाठी वाहतूक पोलिसांची परवानगी घेणेही आवश्यक असते. त्यानुसार मुंबई वाहतूक पोलिसांच्या २५ चौक्यांमध्ये ३६ मतदारसंघांतून तब्बल ३ हजार ५२४ अर्ज प्राप्त झाले आहेत. यात घाटकोपर, विक्रोळी, ट्रॉम्बे, मुलुंड, विमानतळ, वाकोला, डी. एन. नगर, पायधुनी चौक्यांमध्ये सर्वाधिक अर्ज प्राप्त झाल्याचे वाहतूक पोलिसांकडून सांगण्यात आले. घाटकोपरमधून ३८२, विक्रोळीतून ३५४ अर्ज प्राप्त झाले आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादी यांची आघाडी आणि शिवसेना-भाजपा याची महायुती तुटल्याने या रॅलींची संख्या वाढली आहे. (प्रतिनिधी)