शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections: 'आप'ची १५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; आतापर्यंत ५१ शिलेदार मैदानात!
2
Mumbai: मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली डरकाळी; ३७ उमेदवारांची यादी जाहीर!
3
INDW vs SLW: Smriti Mandhana चा ऐतिहासिक पराक्रम! Team India ची लेक बनली '१० हजारी' मनसबदार
4
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
5
Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
6
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
7
Video: पाकिस्तानच्या हॅरिस रौफने कॅच पकडण्यासाठी उडी घेतली, समोरून कार्टराईटही आला अन् मग...
8
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
9
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
10
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
11
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
12
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
13
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
14
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
15
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
16
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
17
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
18
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
19
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
20
Giriraj Singh : "ममता बॅनर्जींनी बांगलादेशात जाऊन पंतप्रधान व्हावं"; घुसखोरांवरुन गिरिराज सिंह यांचा खोचक टोला
Daily Top 2Weekly Top 5

डहाणूत बंधारे पडले कोरडे

By admin | Updated: March 25, 2017 01:10 IST

डहाणू तालुक्यात पाण्याच्या टंचाईमुळे पावसाचे पाणी अडविण्यासाठी वन व जलसंधारण विभागाने बांधलेले बंधारे कोरडे पडले आहेत.

शशिकांत ठाकूर / कासाडहाणू तालुक्यात पाण्याच्या टंचाईमुळे पावसाचे पाणी अडविण्यासाठी वन व जलसंधारण विभागाने बांधलेले बंधारे कोरडे पडले आहेत. तालुक्याच्या कासा, वाणगाव भागातील काही गावांना उन्हाळयात सूर्या कालव्याअंतर्गत शेतीला पाणीपूरवठा होतो. त्याचा उन्हाळ्यात मोठा आधार असतो. परंतु डोंगराळ, धरण्याच्या वरच्या व धरणाच्या जवळील बऱ्याच गावांना कालव्यातून पाणी पूरवठा मार्चपासूनच बंद झाला आहे. या भागातील ओसरविरा, आवढाणी, करंजविरा, कांदरवाडी, धरमपूर, बापूगांव, गांगोडी, निंबापूर, सायवन, आष्टा, रायपूर, धुदलवाडी, आंबोली, शिसने, बहारे, गांगणगांव, आंबेसारी, नागझरी, गंजाड आदी ठिकाणी दरवर्षी मोठया प्रमाणात पाण्याची टंचाई असल्याने पक्के सिमेंटचे बंधारे बाधण्यात आले आहेत. तसेच, महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत ठिकठिकाणी पाणी अडविण्यासाठी वनराई बांधारेही बाधण्यात आले आहेत. मात्र मे महिन्याआधीच सारे बांधारे कोरडे पडले आहेत. त्यामुळे सूर्या धरण जवळ असूनही या गावपाडयांवरील नागरिकांना धावपळ करावी लागत आहे. बंधारे पक्के सिमेंट काँक्रिटचे बांधलेले असतांनाही त्याच्यातून निकृष्ट दर्जाच्या बांधकामामुळे पाण्याची गळती होते. त्यामुळे काही बंधाऱ्यात पावसाळयानंतर एक दोन महिन्यात पूर्णपणे कोरडे पडतात.मोखाड्यातील पळसपाडा धरणाला गळती; रोज हजारो लीटर पाणी वाया मोखाडा : मोखाडा तालुक्यात पाणी टंचाईने उग्र रूप धारण केले आहे. घोटभर पाण्यासाठी रणरणत्या उन्हाची परवा न करता आदिवासी महिला आपल्या कच्चाबच्च्यांसाठी मैलोंमैल भटकंती करतात. मात्र, पळसपाडा लगत असलेल्या वाघ धरणातून दुरूस्ती अभावी दररोज हजारो लीटर पाण्याची नासाडी होत आहे. दरवर्षी प्रमाणे यंदाही पाणी टंचाईने उग्र रूप धारण केले भीषण पाणी टंचाईने ग्रासलेल्या २९ गावपाड्यांना १९ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. तसेच दिवसा गणिक टंचाई ग्रस्त गावपाड्यांच्या संख्येत वाढ होत आहे. पळसपाडा धरणात मुबलक प्रमाणात पाणी असुनही दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याने मोखाड्याला पाणी पुरवठा करणाऱ्या पळसपाडा धरणातून हजारो लीटर पाणी वाया माती मोल झाले आहे. या प्रकारामुळे आहे त्या योजनांची दुरावस्था आणि नव्यांच्या उभारणीची घाई असे चित्र दिसत आहे.मोखाडावासीयांची तहान भागवण्यासाठी १९९२-९३ मध्ये वाघ नदीवर पळसपाड्या जवळ हे धरण बांधण्यात आले. मात्र, तेव्हापासून अनेकदा दुरुस्त्या झाल्या मात्र दरवर्षी होणारी गळती कायम असल्याने स्ट्रक्चरल आॅडिटची गरज निर्माण झाली आहे. मुळ बांधकाम व मेंटनन्सवर लाखो रुपये खर्च होऊनही परिस्थिती बदलत नसल्योन आश्चर्य व्यक्त होत आहे. काही ठिकाणी बंधाऱ्याचे बांधकाम तूटले आहेत. त्यामुळे योग्य प्रमाणात पाणीसाठा होत नाही अशीही परिस्थिती आहे.