शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
3
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
4
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
5
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
6
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
7
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
8
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
9
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
10
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
11
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
12
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
13
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
14
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
15
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
16
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
17
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
18
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
19
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
20
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या

वीस वर्षांपासून डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न प्रलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2018 03:02 IST

तारापूर एमआयडीसीच्या औद्योगिक क्षेत्रालगत असलेल्या बोईसरसह नऊ ग्रामपंचायतीची लोकसंख्या झपाट्याने वाढत असल्याने त्याच प्रमाणात घनकचराही प्रतिदिन तयार होत आहे.

- पंकज राऊत बोईसर : तारापूर एमआयडीसीच्या औद्योगिक क्षेत्रालगत असलेल्या बोईसरसह नऊ ग्रामपंचायतीची लोकसंख्या झपाट्याने वाढत असल्याने त्याच प्रमाणात घनकचराही प्रतिदिन तयार होत आहे. मात्र, तो टाकण्या करीता किंवा त्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी भूखंडाची मागणी एमआयडीसी कडे करून पाठपुरावा मागील वीस वर्षा पासून करण्यात येत असूनही या मागणीला अक्षरश: वाटण्याच्या अक्षता लावल्याने दोन तपासून हा गंभीर प्रश्न प्रलंबीत असून भिजत घोंगडे पडल्याने जागो जागी साठणाऱ्या कचºयामूळे आरोग्याचा प्रश्न गंभीर होत आहेतारापूर औद्योगिक क्षेत्राजवळ बोईसर, खैरपाडा, सरावली, कोलवडे, पास्थळ, सालवड, कुंभवली,पाम, टेम्भी अश्या एकूण नऊ ग्रामपंचायती असून सर्व ग्रामपंचायती मिळून आजच्या घडीला लोकसंख्या सुमारे अडीच लाखाच्या घरात आहे. त्या पैकी फक्त बोईसरची लोकसंख्या सुमारे एक लाख असल्याने बोईसर मधून प्रतिदिन सुमारे १० टन कचरा निघत आहे. एवढया मोठया प्रमाणात कचरा विल्हेवाटीचा प्रश्न या सर्व ग्रामपंचायतीसमोर आ वासून उभा आहे. त्यामुळे डिम्पंग ग्राउंडची जागेसाठी मागील वीस वर्षापासून पत्रव्यवहारा बरोबरच अर्ज, विनंत्या, मंत्रालयात व स्थानिक पातळीवर अनेक बैठकाही घेण्यात आल्या. मोर्चे, आंदोलनेही केली तर काही वर्षापासून सिटीझन फोरम आॅफ बोईसर तारापूर ही सामाजिक संघटना सर्व ग्रामपंचायतींना बरोबर घेऊन पाठपुरावा करीत आहे परंतु एमआयडीसीला अजून पाझर फुटत नाही.>गंभीर आजाराला आमंत्रणडम्पिंग ग्राऊंडच्या जागेवरून अनेक उद्रेक वादविवाद झाले डम्पिंग ग्राऊंडला भूखंड देता येणार नाही तशी एमआयडीसीचे संपूर्ण महाराष्ट्रात धोरणच नाही तसेच एकाच कुणाला देता येणार नाही. सोसायटी करा व त्यांच्या माध्यमातून घनकचरा व्यवस्थापन केंद्राचा प्रस्ताव सादर करा असे अनेक प्रश्न व त्रुटी समोर करून आज पर्यंत चालढकलच करण्यात आली परंतु मार्ग काढण्यासाठी ज्या मानिसकतेचि गरज होती ती कुठेच दिसली नाही परिणामी आज त्याचे दुष्परिणाम नागरिकांना सहन करावे लागत आहेत कारण काही प्लास्टिक युक्त कचरा तर रस्त्यावरच जाळून नष्ट केला जातो त्या मधुन निघणारा विषारी वायु गंभीर आजाराला निमंत्रण देत आहे.>घनकचरा व्यवस्थापन केंद्राचा प्रश्न सुटेलकेंद्र शासनाचा घनकचरा व्यवस्थापन कायदा २०१६ नुसार कमीत कमी पांच टक्के भूखंड औद्योगिक क्षेत्रात आरक्षित ठेवणे बंधनकारक आहे. त्यामुळे एम आय डी सी ने या कायद्याची अंमलबजावणी केल्यास घनकचरा व्यवस्थापन केंद्रास बोईसर सह समूह ग्रामपंचायतीना भूखंड मिळू शकतो.परंतु एम आय डी सी च्यासुधारित विकास नियंत्रण नियमावली २००९ नुसार केंद्र शासनाच्या धोरणा अंतर्गत घनकचरा व्यवस्थापना करीता प्रत्येक औद्योगिक क्षेत्रात कमीत कमी 5 टक्के किंवा कमीत कमी ५ भूखंड आरक्षित ठेवण्याचे धोरण अस्तित्वात नसल्याने सदर बाबतीत जर धोरणात्मक निर्णय एमआयडीसीच्या संचालक मंडळाने घेतल्यास भूखंडाचा प्रश्न मार्गी लागू शकतो.

टॅग्स :dumpingकचरा