शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

वीस वर्षांपासून डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न प्रलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2018 03:02 IST

तारापूर एमआयडीसीच्या औद्योगिक क्षेत्रालगत असलेल्या बोईसरसह नऊ ग्रामपंचायतीची लोकसंख्या झपाट्याने वाढत असल्याने त्याच प्रमाणात घनकचराही प्रतिदिन तयार होत आहे.

- पंकज राऊत बोईसर : तारापूर एमआयडीसीच्या औद्योगिक क्षेत्रालगत असलेल्या बोईसरसह नऊ ग्रामपंचायतीची लोकसंख्या झपाट्याने वाढत असल्याने त्याच प्रमाणात घनकचराही प्रतिदिन तयार होत आहे. मात्र, तो टाकण्या करीता किंवा त्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी भूखंडाची मागणी एमआयडीसी कडे करून पाठपुरावा मागील वीस वर्षा पासून करण्यात येत असूनही या मागणीला अक्षरश: वाटण्याच्या अक्षता लावल्याने दोन तपासून हा गंभीर प्रश्न प्रलंबीत असून भिजत घोंगडे पडल्याने जागो जागी साठणाऱ्या कचºयामूळे आरोग्याचा प्रश्न गंभीर होत आहेतारापूर औद्योगिक क्षेत्राजवळ बोईसर, खैरपाडा, सरावली, कोलवडे, पास्थळ, सालवड, कुंभवली,पाम, टेम्भी अश्या एकूण नऊ ग्रामपंचायती असून सर्व ग्रामपंचायती मिळून आजच्या घडीला लोकसंख्या सुमारे अडीच लाखाच्या घरात आहे. त्या पैकी फक्त बोईसरची लोकसंख्या सुमारे एक लाख असल्याने बोईसर मधून प्रतिदिन सुमारे १० टन कचरा निघत आहे. एवढया मोठया प्रमाणात कचरा विल्हेवाटीचा प्रश्न या सर्व ग्रामपंचायतीसमोर आ वासून उभा आहे. त्यामुळे डिम्पंग ग्राउंडची जागेसाठी मागील वीस वर्षापासून पत्रव्यवहारा बरोबरच अर्ज, विनंत्या, मंत्रालयात व स्थानिक पातळीवर अनेक बैठकाही घेण्यात आल्या. मोर्चे, आंदोलनेही केली तर काही वर्षापासून सिटीझन फोरम आॅफ बोईसर तारापूर ही सामाजिक संघटना सर्व ग्रामपंचायतींना बरोबर घेऊन पाठपुरावा करीत आहे परंतु एमआयडीसीला अजून पाझर फुटत नाही.>गंभीर आजाराला आमंत्रणडम्पिंग ग्राऊंडच्या जागेवरून अनेक उद्रेक वादविवाद झाले डम्पिंग ग्राऊंडला भूखंड देता येणार नाही तशी एमआयडीसीचे संपूर्ण महाराष्ट्रात धोरणच नाही तसेच एकाच कुणाला देता येणार नाही. सोसायटी करा व त्यांच्या माध्यमातून घनकचरा व्यवस्थापन केंद्राचा प्रस्ताव सादर करा असे अनेक प्रश्न व त्रुटी समोर करून आज पर्यंत चालढकलच करण्यात आली परंतु मार्ग काढण्यासाठी ज्या मानिसकतेचि गरज होती ती कुठेच दिसली नाही परिणामी आज त्याचे दुष्परिणाम नागरिकांना सहन करावे लागत आहेत कारण काही प्लास्टिक युक्त कचरा तर रस्त्यावरच जाळून नष्ट केला जातो त्या मधुन निघणारा विषारी वायु गंभीर आजाराला निमंत्रण देत आहे.>घनकचरा व्यवस्थापन केंद्राचा प्रश्न सुटेलकेंद्र शासनाचा घनकचरा व्यवस्थापन कायदा २०१६ नुसार कमीत कमी पांच टक्के भूखंड औद्योगिक क्षेत्रात आरक्षित ठेवणे बंधनकारक आहे. त्यामुळे एम आय डी सी ने या कायद्याची अंमलबजावणी केल्यास घनकचरा व्यवस्थापन केंद्रास बोईसर सह समूह ग्रामपंचायतीना भूखंड मिळू शकतो.परंतु एम आय डी सी च्यासुधारित विकास नियंत्रण नियमावली २००९ नुसार केंद्र शासनाच्या धोरणा अंतर्गत घनकचरा व्यवस्थापना करीता प्रत्येक औद्योगिक क्षेत्रात कमीत कमी 5 टक्के किंवा कमीत कमी ५ भूखंड आरक्षित ठेवण्याचे धोरण अस्तित्वात नसल्याने सदर बाबतीत जर धोरणात्मक निर्णय एमआयडीसीच्या संचालक मंडळाने घेतल्यास भूखंडाचा प्रश्न मार्गी लागू शकतो.

टॅग्स :dumpingकचरा