शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
4
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
5
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
7
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
8
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
9
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
10
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
11
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
12
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
13
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
14
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
15
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
16
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
17
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
18
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
19
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
20
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

पाणीटंचाईने चिंचणीत हाहाकार; योजनेच्या नूतनीकरणास चार वर्षांपूर्वी प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2018 02:22 IST

तालुक्यातील सर्वात मोठ्या चिंचणी ग्रामपंचायत हद्दीत गेल्या तीन, चार महिन्यापासून तीव्र पाणी टंचाई निर्माण झाल्याने नागरिकांत संताप व्यक्त केला जात आहे.

डहाणू : तालुक्यातील सर्वात मोठ्या चिंचणी ग्रामपंचायत हद्दीत गेल्या तीन, चार महिन्यापासून तीव्र पाणी टंचाई निर्माण झाल्याने नागरिकांत संताप व्यक्त केला जात आहे. डहाणूच्या साखरे, कवडास, धरणांत मुबलक पाणी साठा असतांनाही डहाणू पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाच्या निष्काळजीपणामुळे पाण्याचे योग्य नियोजन केले जात नसल्याने येथील ग्रामस्थांना तीन, चार, आठ दिवसांनी अपुरा पाणी पुरवठा केला जात असल्याने येथील महिलांवर ग्रामपंचायतवर मोर्चा काढण्याची वेळ आली आहे. मात्र जिल्हा परिषद तसेच पंचायत समिती प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे.डहाणूच्या सागरी किनारपट्टीवरील २६ गावांना तसेच पालघर बाडापोखरण प्रादेशिक नळपाणीपुरवठा योजनेअंतर्गत येथे साखरे धरणातून पाणी पुरवठा केला जातो, परंतु जीर्ण व जुनाट झालेल्या बाडापोखरण योजनेचा सर्वत्र बोजवारा उडाल्याने पुरवठा व्यवस्थीत होत नसल्याने येथील महिलांना दुसऱ्या प्रभागात जाऊन पाणी भरावे लागते आहे. वीस हजार लोकसंख्या असलेल्या चिंचणी गावात सुमारे पाच हजार नळ कनेक्शनधारक असून येथील शेवटच्या टोकावर असलेले मोरीपाडा, रिफाई नगरी, भाटीपाडा, बारवाडा, इत्यादी प्रभागात पाणी येत नसल्याने येथील महिला कमालीच्या त्रस्त झाल्या आहेत. विशेष म्हणजे चिंचणी गावात काही मोठमोठया लोकांनी बेकायदेशीरित्या तीन, चार नळ कनेक्शन घेऊन केवळ एकच कनेक्शनचे पैसे ग्रामपंचातीला भरणा करीत असल्याने शिवाय ते पाण्याचा दुरूपयोग करीत असल्याने इतर नळकनेक्शन धारकांना त्याचा फटका बसून त्यांच्यावर पाण्यापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.पाणीयोजना नूतनीकरणासाठी ४३ कोटी मंजूर करून ५ मार्च २०१४ ला या कामाची सुरूवात करण्यात आली. परंतु अनेक वेळा मुदतवाढ देऊनही ठेकेदार कंपनी कडून बाडापोखरण योजनेचे काम अपूर्णच राहिले.

टॅग्स :Waterपाणी