शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर प्रदेशमध्ये मतदार यादीतून तब्बल २.८९ कोटी लोकांची नावं वगळणार, SIRबाबत धक्कादायक माहिती समोर 
2
‘सर्व भारतीयांना अमेरिकेतून बाहेर काढा, अन्यथा…’, अमेरिकन पत्रकाराचं वादग्रस्त विधान   
3
पळवा पळवी! पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमानंतर लोकांनी कुंड्या, होर्डिंग आणि पुतळे पळवले   
4
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
5
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
6
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
7
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
8
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
9
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
10
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
11
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
12
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
13
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
14
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
15
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
16
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
17
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
18
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
19
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
20
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

पाणीटंचाईने चिंचणीत हाहाकार; योजनेच्या नूतनीकरणास चार वर्षांपूर्वी प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2018 02:22 IST

तालुक्यातील सर्वात मोठ्या चिंचणी ग्रामपंचायत हद्दीत गेल्या तीन, चार महिन्यापासून तीव्र पाणी टंचाई निर्माण झाल्याने नागरिकांत संताप व्यक्त केला जात आहे.

डहाणू : तालुक्यातील सर्वात मोठ्या चिंचणी ग्रामपंचायत हद्दीत गेल्या तीन, चार महिन्यापासून तीव्र पाणी टंचाई निर्माण झाल्याने नागरिकांत संताप व्यक्त केला जात आहे. डहाणूच्या साखरे, कवडास, धरणांत मुबलक पाणी साठा असतांनाही डहाणू पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाच्या निष्काळजीपणामुळे पाण्याचे योग्य नियोजन केले जात नसल्याने येथील ग्रामस्थांना तीन, चार, आठ दिवसांनी अपुरा पाणी पुरवठा केला जात असल्याने येथील महिलांवर ग्रामपंचायतवर मोर्चा काढण्याची वेळ आली आहे. मात्र जिल्हा परिषद तसेच पंचायत समिती प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे.डहाणूच्या सागरी किनारपट्टीवरील २६ गावांना तसेच पालघर बाडापोखरण प्रादेशिक नळपाणीपुरवठा योजनेअंतर्गत येथे साखरे धरणातून पाणी पुरवठा केला जातो, परंतु जीर्ण व जुनाट झालेल्या बाडापोखरण योजनेचा सर्वत्र बोजवारा उडाल्याने पुरवठा व्यवस्थीत होत नसल्याने येथील महिलांना दुसऱ्या प्रभागात जाऊन पाणी भरावे लागते आहे. वीस हजार लोकसंख्या असलेल्या चिंचणी गावात सुमारे पाच हजार नळ कनेक्शनधारक असून येथील शेवटच्या टोकावर असलेले मोरीपाडा, रिफाई नगरी, भाटीपाडा, बारवाडा, इत्यादी प्रभागात पाणी येत नसल्याने येथील महिला कमालीच्या त्रस्त झाल्या आहेत. विशेष म्हणजे चिंचणी गावात काही मोठमोठया लोकांनी बेकायदेशीरित्या तीन, चार नळ कनेक्शन घेऊन केवळ एकच कनेक्शनचे पैसे ग्रामपंचातीला भरणा करीत असल्याने शिवाय ते पाण्याचा दुरूपयोग करीत असल्याने इतर नळकनेक्शन धारकांना त्याचा फटका बसून त्यांच्यावर पाण्यापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.पाणीयोजना नूतनीकरणासाठी ४३ कोटी मंजूर करून ५ मार्च २०१४ ला या कामाची सुरूवात करण्यात आली. परंतु अनेक वेळा मुदतवाढ देऊनही ठेकेदार कंपनी कडून बाडापोखरण योजनेचे काम अपूर्णच राहिले.

टॅग्स :Waterपाणी