शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळी पावसामुळे शेतकरी, मच्छीमारांचे झाले मोठे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2023 10:39 IST

पाच तास धुमाकूळ घातल्याने साचली पाण्याची डबकी

पालघर - जिल्ह्यात पालकमंत्र्यांच्या हस्ते १ मे रोजी ध्वजारोहण सुरू असतानाच पावसाने पाच तास धुमाकूळ घातल्याने कार्यक्रम स्थळाजवळ पाण्याची डबकी निर्माण झाली, तर जिल्ह्यात पावसामुळे वीटभट्टी, सुके मासे यासह आंबा, जांभूळ, भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

पालघर जिल्ह्यातील एकूण आठ तालुक्यांत १ लाख ४७ हजार ४२५ हेक्टर लागवडीचे क्षेत्रफळ असून, त्यातील १ लाख ४ हजार क्षेत्रावर भात, नागली, वेलवर्गीय भाजीपाला, फळे आदींची लागवड केली जाते. रविवारी जिल्ह्यातील पालघर, डहाणू, विक्रमगड, जव्हार, मोखाडा येथे तासभर पाऊस कोसळला होता. तर १ मे रोजी पालघरच्या पोलिस परेड ग्राऊंडवर  ध्वजारोहण कार्यक्रमादरम्यान अचानक आकाशात काळे ढग जमून जोरदार पावसाला सुरुवात झाली होती. त्यामुळे पालकमंत्र्यांसह सर्व लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकाऱ्यांना सुमारे दीड तास अडकून पडावे लागले होते. दुसरीकडे मिरची, पडवळ, कारली, भोपळी मिरची या भाजीपाल्याचे तर आंबा, काजू, जांभूळ आदी पिकांचे मोठे नुकसान होत झाडाखाली आंबा, जांभूळ या फळांचा मोठा सडा पडला होता. पालघर, डहाणू, वसई तालुक्यातील फुल शेतीसह किनारपट्टीवर वाळत घातलेल्या बोंबील, मांदेली, करंदी आदींना मोठा फटाका बसला. त्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले.  

चिखलामुळे वाहनचालकांना करावी लागली कसरतकार्यक्रमाच्या ठिकाणी आलेल्या चारचाकी गाड्या चिखलात रुतून बसल्याने ही वाहने बाहेर काढताना वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागली. जिल्ह्यात ऑक्टोबर-नोव्हेंबरनंतर मार्च महिन्यात पडलेल्या पावसाने फळे, फुले आणि पिकांचे मोठे नुकसान झाले होते. त्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत उरलेल्या पिकाचे पुन्हा नुकसान झाल्याचे दिसून आले.