शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हंटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
3
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
4
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
5
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
6
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
7
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
8
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
9
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
10
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
11
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
12
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
13
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
14
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
15
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
16
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
17
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
18
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
19
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?

वादळसदृश्य परिस्थितीमुळे मच्छिमार नौका किनाऱ्यावर, मच्छिमारांमध्ये चिंतेचं वातावरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2022 23:52 IST

समुद्रात ५ ते ९ ऑगस्ट ह्या चार दिवसात ६५ किलोमीटर प्रती तास वेगाने वारे वाहत मुसळधार पाऊस कोसळणार असल्याने प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई विभागाने मच्छीमाराना इशारा दिला होता.

- हितेंन नाईक पालघर -समुद्रात  ५ ते ९ ऑगस्ट ह्या चार दिवसात ६५किलोमीटर प्रती तास वेगाने वारे वाहत मुसळधार पाऊस कोसळणार असल्याने प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई विभागाने मच्छीमाराना इशारा दिला होता.किनारपट्टीवर जोरदार पाऊस आणि वारे अश्या वादलसदृश्य वातावरणात आजही पालघर,वसई,डहाणू तालुक्यातील सुमारे एक ते दीड हजार बोटी समुद्रात असल्याने मच्छीमारांच्या घरात चिंतेचे वातावरण पसरले आहे.

 १ जून ते ३१ जुलै असा ६१ दिवसाचा मासेमारी बंदी कालावधी संपला असला तरी समुद्रात निर्माण होणारी वादळे आणि तुफानी लाटांचे डोंगर अशी धोकादायक परिस्थिती अजूनही संपलेली नाही. त्यामुळे आजही मच्छीमारांच्या डोक्यावर समुद्रातील वादळी वारे आणि तुफानी लाटा रुपी धोक्याची घंटा घोंगावतच आहे.

क्यार,महा आदी वादळामुळे आधीच संकटात सापडलेला जिल्ह्यातील मच्छिमारांच्या दोन हजार बोटी १ऑगस्ट पासून समुद्रात गेल्या आहेत.समुद्रात वादळ सदृश्य परिस्थिती निर्माण होणार असल्याने सावधानतेचा इशारा मच्छिमार संस्थांना देण्यात आल्याची माहिती पालघरचे मत्स्यव्यवसाय विभागाचे सह आयुक्त दिनेश पाटील ह्यांनी लोकमत ला दिली.ह्या इशाऱ्या नंतर ही जिल्ह्यातील सुमारे दीड हजार बोटी आजही समुद्रात उभ्या असल्याची माहिती समोर आली आहे.

किनारपट्टीवरून सुमारे आठ ते दहा तास दूरवरून किनाऱ्यावर येणे आणि पुन्हा मासेमारीला जाणे डिझेल च्या वाढत्या भाववाढीमुळे आणि कामगारांच्या पगारामुळे परवडत नसल्याने धोकादायक परिस्थितीत ही ह्या सर्व बोटी समुद्रात ठाण मांडून उभ्या असल्याचे एका मच्छीमाराने लोकमत ला सांगितले.माश्याचे प्रमाण अत्यल्प असताना आम्हाला पुरेसे मासे मिळालेले नाही त्यामुळे कर्ज काढून पहिलीच फेरी मासेमारीला गेलेल्या बोटीला मासेच मिळाले नाहीत तर मग पुढच्या फेरीसाठी डिझेल,बर्फ,कामगारांच्या पगारासाठी पैसे कुठून आणायचे असा प्रश्न मच्छिमार रजनीकांत पाटील ह्यांनी उपस्थित केला आहे.

आजही जिल्ह्याच्या झाई - बोर्डी ते वसई दरम्यानच्या ११०किमी किनारपट्टीवरील सुमारे एक ते दीड हजार बोटी समुद्रात असून ह्या वादळाचा तडाखा बसल्यास मोठी गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार