शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

पाणीटंचाई ठरणार उमेदवारांची डोकेदुखी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2019 06:16 IST

वसई पूर्व भागातील स्थिती : अनेक गावांत पाण्याचा प्रश्न बिकट

पारोळ : वसई पूर्व भागाला पाणी टंचाईचा तीव्र सामना करावा लागत असल्याने येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत प्रचारादरम्यान ग्रामस्थ जाब विचारण्याच्या तयारीत असल्याने पाणीटंचाई ही उमेदवारांसाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. शिरवली, पारोळ, उसगाव, शिवणसई, इ गावातील नागरिकांना भीषण पाणीटंचाई चा सामना करावा लागत आहे. काही गावांमध्ये टँकर ने पाणी पुरवठा होत असून शिरवली येथे ग्रामस्थानवर पैसे गोळा करून विहिरीत टँकर टाकण्याची वेळ आली आहे. या भागातील गावांची लोकसंख्याही मोठी असून त्या तुलनेत पाण्याचा मुबलक पुरवठा नसल्याने पाण्यासाठी ग्रामस्थांना भटकंती करावी लागते.

शासनाकडून टँकरने पाणीपुरवठा होत नाही. यामुळे प्रशासनाने कायमस्वरूपी उपाययोजना न राबवल्याने नागरिकांमध्ये रोष आहे. तसेच वसई विरार ला पाणी पुरवठा करणाऱ्या उसगाव धरणाच्या जलवाहिनीतून दिवसाआड ७ एम एल डी पाणी सोडले जात असल्याने तो पाणी पुरवठा अपुरा पडत आहे. तसेच या भागातून बेसुमार टँकर उपसा होत असल्याने भूजल पातळी घटली असल्याने गावांना पाणीपुरवठा करण्यार्या विहिरींनी तळ गाठला आहे.उन्हाळा वाढल्याने झळा नागरिकांना बसण्यास सुरु वात झाली असून एप्रिल मे महिन्यात पाणी समश्या आणखी बिकट होणार आहे.तसेच याच दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी असल्याने प्रचारात दरम्यान उमेदवाराला पाणी प्रश्नावर नागरिकांना उत्तर दयावे लागणार आहे.जनता जाब विचारणारतीव्र पाणीटंचाई असताना विविध उपाययोजना राबविणे गरजेचे होते. यासाठी पंचायत समिती व ग्रामपंचायत प्रशासनाने याकडे लक्ष का दिले नाही. या गावांमध्ये मंजूर झालेल्या बोरवेल का मारल्या नाहीत, शासनाचा टँकर ने पाणीपुरवठा का होत नाही.या बाबत उमेदवाला जाब विचारण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारWaterपाणी